ETV Bharat / state

रायगड : श्रमदानातून खर्डी गावातील विहीर आणि बंधारा केला स्वच्छ - कोरोना बातमी

महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावातील तरुणांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन नदीपात्रातील विहीरीची स्वच्छता तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. श्रमदानातून तरुणाईने एकत्रित काम केल्याने खर्डी गावातील पाणीटंचाई समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

विहिर स्वच्छ करताना युवक
विहिर स्वच्छ करताना युवक
author img

By

Published : Apr 30, 2020, 5:36 PM IST

रायगड - कोरोनाचे संकट सर्वांच्या डोक्यावर घोंघावत असताना जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या ही उन्हाळ्यात नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व घरी असल्याने कामधंदा बंद आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावातील तरुणांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन नदीपात्रातील विहीरीची स्वच्छता तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. श्रमदानातून तरुणाईने एकत्रित काम केल्याने खर्डी गावातील पाणी टंचाई समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

माहिती देताना ग्रामस्थ
रायगड जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असते. जिल्ह्यात पेण, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर या तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे. या गावात रोज एक दिवस आड टँकरने पाणी येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे पाण्याचे हाल होत आहेत.

पाणीटंचाईचे हे संकट दूर करण्यासाठी गावातील तरुणांनी पाऊल उचलले असून गावात वाहणाऱ्या नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतील गाळ काढून, नैसर्गिक झरे उघडे केल्याने विहिरीत पाणी वाढण्यास मदत झाली आहे. तसेच नदीत बांधलेल्या बंधाऱ्यात साचलेला गाळ ही काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या बंधाऱ्यात मुबलक पाणी साचण्यास मदत मिळणार आहे. कोरोनामुळे सर्वच जण घरी असल्याने गावातील तरुणांनाही पुढाकार घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गावकऱ्यांनी हे काम सुरू केले आहे. श्रमदानातून कोरोना काळात संचारबंदीचा योग्य उपयोग करून गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी तरुणाईने पाऊल उचलले असल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा - सायबांचा वाढदिवस अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रंगली मटणाची पार्टी; अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची हजेरी

रायगड - कोरोनाचे संकट सर्वांच्या डोक्यावर घोंघावत असताना जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या ही उन्हाळ्यात नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व घरी असल्याने कामधंदा बंद आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावातील तरुणांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन नदीपात्रातील विहीरीची स्वच्छता तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. श्रमदानातून तरुणाईने एकत्रित काम केल्याने खर्डी गावातील पाणी टंचाई समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

माहिती देताना ग्रामस्थ
रायगड जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असते. जिल्ह्यात पेण, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर या तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे. या गावात रोज एक दिवस आड टँकरने पाणी येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे पाण्याचे हाल होत आहेत.

पाणीटंचाईचे हे संकट दूर करण्यासाठी गावातील तरुणांनी पाऊल उचलले असून गावात वाहणाऱ्या नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतील गाळ काढून, नैसर्गिक झरे उघडे केल्याने विहिरीत पाणी वाढण्यास मदत झाली आहे. तसेच नदीत बांधलेल्या बंधाऱ्यात साचलेला गाळ ही काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या बंधाऱ्यात मुबलक पाणी साचण्यास मदत मिळणार आहे. कोरोनामुळे सर्वच जण घरी असल्याने गावातील तरुणांनाही पुढाकार घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गावकऱ्यांनी हे काम सुरू केले आहे. श्रमदानातून कोरोना काळात संचारबंदीचा योग्य उपयोग करून गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी तरुणाईने पाऊल उचलले असल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा - सायबांचा वाढदिवस अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रंगली मटणाची पार्टी; अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.