ETV Bharat / state

रायगड जिल्हा पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी सुरक्षित

author img

By

Published : Jan 25, 2020, 4:51 PM IST

जिल्ह्यात समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे ही मुख्य पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांच्या आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा पोलीस दलावर असते. जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी, अधिकारी हे आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याचा प्रतिसाद नागरिक आणि पर्यटकांनी दिला.

पर्यटक
पर्यटक

रायगड - जिल्ह्यातील विविध नागरिक, महिला आणि जिल्ह्यात येणारे पर्यटक यांचा पोलिसांविषयी असणारा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. जिल्हा पोलिसांच्या हातात जिल्हा सुरक्षित असल्याचा अहवाल समोर आला आहे. सतरंगी सामाजिक गटातर्फे 15 विद्यार्थ्यांनी हे अभ्यास संशोधन केले. सतरंगी सामाजिक संस्थेने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे हा अहवाल सादर केला.

रायगड पोलिसांच्या हातात जिल्हा सुरक्षित


जिल्ह्यात समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे ही मुख्य पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांच्या आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा पोलीस दलावर असते. राजकीय परिस्थिती, गुन्हेगारी यांचाही भार पोलिसांवर असतो. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, पेण, कर्जत, खोपोली या सात तालुक्यातील स्थानिक नागरिकांना भेटून विद्यार्थ्यांनी माहिती गोळा केली. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडूनही पोलिसांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी, अधिकारी हे आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याचा प्रतिसाद त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत कला संगीत महोत्सवाला दिमाखात सुरूवात

स्थानिक पातळीवर कायदा सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा सुचवणे हे, या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या उपक्रमात रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे सुरक्षेविषयी असलेले मत जाणून घेतले, अशी माहिती अभ्यास संशोधन प्रकल्पाचे प्रमुख प्राध्यापक अमेय महाजन यांनी दिली.

थेट सामान्य नागरिकांचा रायगड पोलिसांबद्दल असलेला दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या अभ्यास गटाने पोलीस दलाला काही शिफारशी सुचवल्या आहेत. सुचवलेल्या शिफारसी भविष्यात सामान्य नागरिक आणि रायगड पोलीस यांच्यात सुसंवाद वाढवण्यास निश्चित फायद्याच्या ठरतील, असा विश्वास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केला.

रायगड - जिल्ह्यातील विविध नागरिक, महिला आणि जिल्ह्यात येणारे पर्यटक यांचा पोलिसांविषयी असणारा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. जिल्हा पोलिसांच्या हातात जिल्हा सुरक्षित असल्याचा अहवाल समोर आला आहे. सतरंगी सामाजिक गटातर्फे 15 विद्यार्थ्यांनी हे अभ्यास संशोधन केले. सतरंगी सामाजिक संस्थेने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे हा अहवाल सादर केला.

रायगड पोलिसांच्या हातात जिल्हा सुरक्षित


जिल्ह्यात समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे ही मुख्य पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांच्या आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा पोलीस दलावर असते. राजकीय परिस्थिती, गुन्हेगारी यांचाही भार पोलिसांवर असतो. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, पेण, कर्जत, खोपोली या सात तालुक्यातील स्थानिक नागरिकांना भेटून विद्यार्थ्यांनी माहिती गोळा केली. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडूनही पोलिसांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी, अधिकारी हे आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याचा प्रतिसाद त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत कला संगीत महोत्सवाला दिमाखात सुरूवात

स्थानिक पातळीवर कायदा सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा सुचवणे हे, या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या उपक्रमात रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे सुरक्षेविषयी असलेले मत जाणून घेतले, अशी माहिती अभ्यास संशोधन प्रकल्पाचे प्रमुख प्राध्यापक अमेय महाजन यांनी दिली.

थेट सामान्य नागरिकांचा रायगड पोलिसांबद्दल असलेला दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या अभ्यास गटाने पोलीस दलाला काही शिफारशी सुचवल्या आहेत. सुचवलेल्या शिफारसी भविष्यात सामान्य नागरिक आणि रायगड पोलीस यांच्यात सुसंवाद वाढवण्यास निश्चित फायद्याच्या ठरतील, असा विश्वास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केला.

Intro:रायगड जिल्हा पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी सुरक्षित

सतरंगी सामाजिक गटातर्फे जिल्हा पोलिसांबाबत केले होते अभ्यास संशोधन

जिल्हा पोलिस जिल्ह्याची सुरक्षा करण्यात आग्रही


रायगड : जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, जिल्ह्यात येणारे पर्यटक यांचा जिल्हा पोलिसांविषयी असणारा दृष्टीकोन काय आहे याबाबत सतरंगी सामाजिक गटातर्फे विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यास संशोधनात जिल्हा पोलीसांच्या हातात जिल्हा सुरक्षित असल्याचा अहवाल समोर आला आहे. जिल्हा पोलिसांच्या करड्या सुरक्षेमुळे जिल्हा सुरक्षित असल्याचा अहवाल सामाजिक संस्थेने जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे सादर केला आहे. स्थानिक पातळीवर कायदा सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा सुचविणे हे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट्ये होता असे प्रा. अमेय महाजन यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांमधून रायगड हा जिल्हा पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचा महत्वाचा प्रतिसाद मिळाला आहे.

Body:रायगड हा पर्यटन जिल्हा असून लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असतात. तसेच रायगड हा मुंबईपासून जवळ आहे. जिल्ह्यात समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे ही मुख्य पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांच्या तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा ताण हा नेहमी जिल्हा पोलिस दलावर पडत असतो. तसेच येथील राजकीय परिस्थिती, गुन्हेगारी यांचाही ताण असतो. जिल्हा पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी, अधिकारी हे ताण असूनही आपले कर्तव्य योग्य जबाबदारीने करीत आहे.

पोलिसांबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, पर्यटक, महिला याचा कसा दृष्टिकोन आहे. याबाबत सतरंगी सामाजिक गटातर्फे अभ्यास संशोधन करण्यात आले. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, पेण, कर्जत, खोपोली या सात तालुक्यात स्थानिक नागरिकांशी भेटून पोलिसांबाबत आपला काय दृष्टिकोन आहे याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती गोळा केली. तसेच स्थानिक पोलिसांद्वारे सामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती घेण्यात आली. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही पोलिसांबाबत दृष्टिकोन विचारण्यात आला होता. या संशोधनावेळी महिला आणि पर्यटकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Conclusion:पर्यटकांनी आणि नागरिकांनी पोलीस आपले काम चोख बजावत असून आम्हाला सुरक्षित भावना जिल्ह्यात वाटते असा प्रतिसाद दिला आहे. सतरंगी सामाजिक गटाच्या 15 विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. पोलिसांना या उपक्रमातून अभ्यास गटाने काही शिफारशी ही सुचविलेल्या आहेत.

---------------------------

या उपक्रमात रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांमधून रायगड हा जिल्हा पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचा प्रतिसाद आला. या उपक्रमांद्वारे थेट सामान्य नागरिकांकडून रायगड पोलिसांबद्दलचा दृष्टीकोन समजण्यास मदत झाली असून या अभ्यास समितीने सुचविलेल्या अनेक शिफारसी भविष्यात सामान्य नागरिक आणि रायगड पोलीस यांच्यात सुसंवाद वाढविण्यास निश्चित मदत करतील असा आत्मविश्वास रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केला.

बाईट 1 : प्रा. अमेय महाजन

बाईट 2 : अनिल पारस्कर, जिल्हा पोलिस अधीक्षक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.