ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा : वयोवृद्ध भाऊ-बहीण झाले बेघर; शासनाला दिली मदतीची हाक

author img

By

Published : Jun 17, 2020, 11:10 AM IST

Updated : Jun 17, 2020, 11:44 AM IST

दुपारनंतर वादळाचे रुद्ररूप धारण केले. सोसाट्याचा वारा त्यात मुसळधार पाऊस, यामुळे झाडे जोराने हलू लागली. तेव्हा ओटीत बसलेल्या बहिणीला मी घरात बोलावलो. त्यानंतर मी खाटेवर झोपण्यास गेलो त्याचवेळी मोठा आवाज झाला. पाहिलं तर आंब्याचे झाड घरावर पडून विटा, माती खाटेवर कोसळली. यात सुदैवाने मला कोणतीही हानी झाली नाही आणि आमचे प्राण वाचले, अशी माहिती जनार्दन पटवर्धन यांनी दिली.

Nisarg cyclone damages aged brother and sister house in nagaon alibaug
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा : वयोवृद्ध भाऊ-बहिण झाले बेघर; शासनाला दिली मदतीची हाक

रायगड - निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका बसला. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. तर महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर अनेकांचे संसार उघड्यावर आणणाऱ्या ३ जूनला दुपारी आलेले या चक्रीवादळाने एका वयोवृद्ध भाऊ-बहिणीला बेघर केले आहे. या वादळात वाडवडिलांनी बांधलेले जमीनदोस्त झाले. शासनाकडून घराच्या नुकसानीचे एक लाख साठ हजार रुपयांची मदत देण्यात आली. ती तुटपुंजी ठरली. आता पुन्हा उद्ध्वस्त झालेले जीवनचक्र कसे सुरू करायचे? हा प्रश्न या वृद्धांसमोर उभा ठाकला आहे. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा...

माहिती देताना पटवर्धन...

अलिबाग तालुक्यातील नागाव सिद्धिविनायक परिसरात जनार्दन पटवर्धन आणि त्याची बहिण लीला हे सव्वाशे वर्षांपूर्वी वाडवडिलांनी बांधलेल्या घरात राहत होते. जनार्दन यांचे वय ८० तर लीला या ७३ वर्षाच्या आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या नारळ, फोफळी, आंबा, फणस यांची छोटी बागायत आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ येणार म्हणून दोघेही बहीण-भाऊ प्रशासनाच्या आदेशानुसार घरातच होते.

या वादळाबद्दल सांगताना पटवर्धन म्हणाले, 'दुपारनंतर वादळाने रौद्ररूप धारण केले. सोसाट्याचा वारा त्यात मुसळधार पाऊस, यामुळे झाडे जोराने हलू लागली. तेव्हा ओटीत बसलेल्या बहिणीला मी घरात बोलावलो. त्यानंतर मी खाटेवर झोपण्यास गेलो, त्याचवेळी मोठा आवाज झाला. पाहिलं तर आंब्याचे झाड घरावर पडून विटा, मातीची भिंत खाटेवर कोसळली. यात सुदैवाने मला कोणतीही हानी झाली नाही आणि आमचे प्राण वाचले '

वादळात पटवर्धन यांचे जुने मातीचे बांधकाम असलेले घर हे कोलमडून गेले आहे. घरातील पावसाळ्यासाठी भरून ठेवलेली बेगमी साहित्य भिजून गेले, कपडे भिजले आहेत. आता हे वृद्ध बहीण-भाऊ नातेवाईकांच्या घरातील एका खोलीत राहत आहेत. वादळात घराचे 15 ते वीस लाखाचे नुकसान झाले असून शासनाने दिलेली मदत ही तुटपूंजी असून यामध्ये घर उभे राहणार नाही. तरी शासनाने आम्हाला अधिक मदत मिळावी, अशी मागणी जनार्दन पटवर्धन आणि त्यांच्या बहिणीने केली आहे.

हेही वाचा - 'आम्हालाही मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगायचंय'

हेही वाचा - केंद्रीय पथक रायगडमध्ये दाखल, वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू

रायगड - निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका बसला. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. तर महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर अनेकांचे संसार उघड्यावर आणणाऱ्या ३ जूनला दुपारी आलेले या चक्रीवादळाने एका वयोवृद्ध भाऊ-बहिणीला बेघर केले आहे. या वादळात वाडवडिलांनी बांधलेले जमीनदोस्त झाले. शासनाकडून घराच्या नुकसानीचे एक लाख साठ हजार रुपयांची मदत देण्यात आली. ती तुटपुंजी ठरली. आता पुन्हा उद्ध्वस्त झालेले जीवनचक्र कसे सुरू करायचे? हा प्रश्न या वृद्धांसमोर उभा ठाकला आहे. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा...

माहिती देताना पटवर्धन...

अलिबाग तालुक्यातील नागाव सिद्धिविनायक परिसरात जनार्दन पटवर्धन आणि त्याची बहिण लीला हे सव्वाशे वर्षांपूर्वी वाडवडिलांनी बांधलेल्या घरात राहत होते. जनार्दन यांचे वय ८० तर लीला या ७३ वर्षाच्या आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या नारळ, फोफळी, आंबा, फणस यांची छोटी बागायत आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ येणार म्हणून दोघेही बहीण-भाऊ प्रशासनाच्या आदेशानुसार घरातच होते.

या वादळाबद्दल सांगताना पटवर्धन म्हणाले, 'दुपारनंतर वादळाने रौद्ररूप धारण केले. सोसाट्याचा वारा त्यात मुसळधार पाऊस, यामुळे झाडे जोराने हलू लागली. तेव्हा ओटीत बसलेल्या बहिणीला मी घरात बोलावलो. त्यानंतर मी खाटेवर झोपण्यास गेलो, त्याचवेळी मोठा आवाज झाला. पाहिलं तर आंब्याचे झाड घरावर पडून विटा, मातीची भिंत खाटेवर कोसळली. यात सुदैवाने मला कोणतीही हानी झाली नाही आणि आमचे प्राण वाचले '

वादळात पटवर्धन यांचे जुने मातीचे बांधकाम असलेले घर हे कोलमडून गेले आहे. घरातील पावसाळ्यासाठी भरून ठेवलेली बेगमी साहित्य भिजून गेले, कपडे भिजले आहेत. आता हे वृद्ध बहीण-भाऊ नातेवाईकांच्या घरातील एका खोलीत राहत आहेत. वादळात घराचे 15 ते वीस लाखाचे नुकसान झाले असून शासनाने दिलेली मदत ही तुटपूंजी असून यामध्ये घर उभे राहणार नाही. तरी शासनाने आम्हाला अधिक मदत मिळावी, अशी मागणी जनार्दन पटवर्धन आणि त्यांच्या बहिणीने केली आहे.

हेही वाचा - 'आम्हालाही मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगायचंय'

हेही वाचा - केंद्रीय पथक रायगडमध्ये दाखल, वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू

Last Updated : Jun 17, 2020, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.