ETV Bharat / state

पावसाचा तडाखा : 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याण-बदलापूर लोकल सेवा सुरू

author img

By

Published : Jul 28, 2019, 1:44 AM IST

Updated : Jul 28, 2019, 3:18 AM IST

मुंबई उपनगरामध्ये 25 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बदलापूर स्थानकाचे रुळ जलमय झाले होते. परिणामी रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत/ खोपोली मार्गावरीस सेवा स्थगित केली होती.

पावसाचा तडाखा : 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याण-बदलापूर लोकल सेवा सुरू

रायगड - तब्बल 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याणहून बदलापूरसाठी पाहिली लोकल धावली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यातच मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली. त्यामुळे कल्याण ते बदलापूर आणि बदलापूर ते कल्याण या मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पण काही वेळापूर्वी कल्याण ते बदलापूर मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या आहेत.

पावसाचा तडाखा : 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याण-बदलापूर लोकल सेवा सुरू

मुंबई उपनगरामध्ये 25 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बदलापूर स्थानकाचे रुळ जलमय झाले होते. परिणामी रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत/ खोपोली मार्गावरीस सेवा स्थगित केली होती.

पावसाचा फटका कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांनाही बसला आणि एक्सप्रेस पाण्यामध्ये अडकली. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी म्हणजे तब्बल 17 तासानंतर बदलापूरवरून सीएसटीएमकडे पहिली लोकल रवाना झाली. त्यांनतर रात्री 10.06 मिनिटांनी कल्याणहून बदलापूरकडे जाणारी पहिली लोकल धावली.

पावसामुळे कर्जतकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यामुळे सकाळी मिळेल त्या वाहनांनी चाकरमान्यांना कामावर पोहोचावे लागले होते. त्यानंतर सायंकाळी पहिली लोकल पकडून लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी प्लॅटफॉर्मवर महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती.

रायगड - तब्बल 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याणहून बदलापूरसाठी पाहिली लोकल धावली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यातच मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली. त्यामुळे कल्याण ते बदलापूर आणि बदलापूर ते कल्याण या मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पण काही वेळापूर्वी कल्याण ते बदलापूर मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या आहेत.

पावसाचा तडाखा : 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याण-बदलापूर लोकल सेवा सुरू

मुंबई उपनगरामध्ये 25 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बदलापूर स्थानकाचे रुळ जलमय झाले होते. परिणामी रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत/ खोपोली मार्गावरीस सेवा स्थगित केली होती.

पावसाचा फटका कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांनाही बसला आणि एक्सप्रेस पाण्यामध्ये अडकली. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी म्हणजे तब्बल 17 तासानंतर बदलापूरवरून सीएसटीएमकडे पहिली लोकल रवाना झाली. त्यांनतर रात्री 10.06 मिनिटांनी कल्याणहून बदलापूरकडे जाणारी पहिली लोकल धावली.

पावसामुळे कर्जतकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यामुळे सकाळी मिळेल त्या वाहनांनी चाकरमान्यांना कामावर पोहोचावे लागले होते. त्यानंतर सायंकाळी पहिली लोकल पकडून लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी प्लॅटफॉर्मवर महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती.

Intro:बातमीला बाईट आणि व्हिडीओ सोबत जोडले आहेत

कल्याण
तब्बल 22 तासांच्या खोळंब्यानंतर कल्याणहून बदलापूर साठी पाहिली लोकल धावली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यातच मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली. त्यामुळे कल्याण ते बदलापुर आणि बदलापूर ते कल्याण या मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. पण नुकतंच कल्याण ते बदलापूर मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या आहेत . Body:२५ आणि २६ जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास बदलापूर स्ठानकात पाणी भरले. परिणामी रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत / खोपोली मार्गावरीस सेवा स्थगित केली. त्याचा फटका कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांंनाही बसला. अखेर शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी म्हणजे तब्बल १७ तासानंतर बदलापूरवरून सीएसटीएमकडे पहिली लोकल रवाना झाली. त्यांनतर रात्री 10.06 वाजता कल्याणहुन बदलापूर कडे जाणारी पहिली लोकल धावली. Conclusion:त्याच्या दुरूस्तीसाठी कर्जतकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळी मिळेल त्या वाहनांनी चाकरमान्यांना कामावर पोहोचावे लागले होते. त्यामुळे पहिली लोकल पकडून लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी प्लॅटफॉर्मवर महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली. या सगळ्या चित्रावरून पुन्हा एकदा 26 जुलैची आठवण आली, अशा प्रतिक्रिया इथल्या प्रवाशांनी दिल्या.
Last Updated : Jul 28, 2019, 3:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.