ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू; जनजीवन विस्कळीत

author img

By

Published : Jun 9, 2021, 9:45 AM IST

Updated : Jun 9, 2021, 5:10 PM IST

जिल्ह्यात १०, ११ जून हे दोन दिवस धोक्याचे आहे. दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

rain
rain

रायगड - केरळात मान्सुनचे आगमन झाले असून राज्यातही मान्सूनचे आगमन झाले आहे. रायगड जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटेपासून पावसाला सुरुावत झाली. गेली दोन दिवस रिमझिम पाऊस जिल्ह्यात पडत आहे. १०,११ जून रोजी अतिवृष्टी दिली असल्याने त्यापूर्वीच पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू;
रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू;
जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम सुरू७ जूनपासून पावसाळा हंगाम हा राज्यासह जिल्ह्यात दाखल होतो. यावेळीही ७ जूनला जिल्ह्यात काही भागात हजेरी लावली. त्यानंतर दोन दिवस रिमझिम पाऊस पडत आहे. आजही पहाटेपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, उरण, खालापूर, रोहा या तालुक्यात पावसाने सुरुवात केली आहे. तर काही सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या हजेरीनंतर आता शेतीच्या कामांना वेग येईल.


१०, ११ जून दोन दिवस धोक्याचे
जिल्ह्यात १०, ११ जून हे दोन दिवस धोक्याचे आहे. दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावलेही आहेत.

रेनकोट, छत्र्या पडल्या बाहेर
पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी वर्षाभर जतन करून ठेवण्यात आलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढण्यात आले आहेत. तर नवीन खरेदीसाठी नागरीक दुकानात गर्दी करीत आहेत.

रायगड - केरळात मान्सुनचे आगमन झाले असून राज्यातही मान्सूनचे आगमन झाले आहे. रायगड जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटेपासून पावसाला सुरुावत झाली. गेली दोन दिवस रिमझिम पाऊस जिल्ह्यात पडत आहे. १०,११ जून रोजी अतिवृष्टी दिली असल्याने त्यापूर्वीच पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू;
रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू;
जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम सुरू७ जूनपासून पावसाळा हंगाम हा राज्यासह जिल्ह्यात दाखल होतो. यावेळीही ७ जूनला जिल्ह्यात काही भागात हजेरी लावली. त्यानंतर दोन दिवस रिमझिम पाऊस पडत आहे. आजही पहाटेपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, उरण, खालापूर, रोहा या तालुक्यात पावसाने सुरुवात केली आहे. तर काही सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या हजेरीनंतर आता शेतीच्या कामांना वेग येईल.


१०, ११ जून दोन दिवस धोक्याचे
जिल्ह्यात १०, ११ जून हे दोन दिवस धोक्याचे आहे. दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावलेही आहेत.

रेनकोट, छत्र्या पडल्या बाहेर
पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी वर्षाभर जतन करून ठेवण्यात आलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढण्यात आले आहेत. तर नवीन खरेदीसाठी नागरीक दुकानात गर्दी करीत आहेत.

Last Updated : Jun 9, 2021, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.