ETV Bharat / state

मुसळधार पावसाने रायगडात पूरस्थिती; तब्बल ७० गावांचा संपर्क तुटला

author img

By

Published : Jul 27, 2019, 7:45 AM IST

Updated : Jul 27, 2019, 11:44 AM IST

रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पेण तालुक्यात अनेक पूल आणि रस्त्यात पाणी साचल्याने सुमारे 70 गावांचा संपर्क तुटला आहे. तर, पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटला आहे.

Heavy rain in raigad district all the rivers are overflowing

रायगड - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाने रायगडात पूरस्थिती; तब्बल ७० गावांचा संपर्क तुटला


महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात घुसले असून पाली आणि जांभुळपाडा पुलांवरून पाणी जात आहे. त्यामुळे वाकण मार्गे पाली, खोपोली जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.


कर्जतमधील उल्हास नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. पेण तालुक्यातील जोहे-तांबडशेत रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे ७0 गावांचा संपर्क तुटला आहे. कळंब राज्य मार्गावरील दहिवली पूल आणि वांगणी पाषाने पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटला आहे.


जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना तसेच शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाने रायगडात पूरस्थिती; तब्बल ७० गावांचा संपर्क तुटला


महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात घुसले असून पाली आणि जांभुळपाडा पुलांवरून पाणी जात आहे. त्यामुळे वाकण मार्गे पाली, खोपोली जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.


कर्जतमधील उल्हास नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. पेण तालुक्यातील जोहे-तांबडशेत रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे ७0 गावांचा संपर्क तुटला आहे. कळंब राज्य मार्गावरील दहिवली पूल आणि वांगणी पाषाने पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटला आहे.


जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना तसेच शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Intro:जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर

जिल्ह्यातील अंबा, सावित्री, कुंडलिका, उल्हास नदीना पूर

पाली वाकण रस्ता वाहतुकीस बंद

जिल्ह्यात पूरपरिस्थिती, प्रशासनाकडून सर्कतेचा इशारा

रायगड : जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर अंबा नदीला पूर आल्याने पाली वाकण रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. महाड शहरातही पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाकडून नदी किनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.Body:जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तर अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात घुसले असून पाली, जांभुळपाडा पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे वाकण मार्गे पाली, खोपोली जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.Conclusion:कर्जतमधील उल्हास नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे 50 गावांचा संपर्क तुटला आहे. तर
कळंब राज्य मार्गावरील दहिवली पूल, वांगणी पाषाने पूल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने 26 जुलै सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाकडून नदी किनारी गावांना तसेच शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.


Last Updated : Jul 27, 2019, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.