ETV Bharat / state

ऐरोलीतून गणेश नाईकांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

author img

By

Published : Oct 4, 2019, 3:15 PM IST

एरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

ऐरोलीतून गणेश नाईक दाखल उमेदवारी अर्ज

नवी मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उर्वरित दिग्गज नेते आणि उमेदवारांची रीघ लागलेली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईकांनी आपला अर्ज दाखल केला. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांची उसळलेल्या गर्दीमुळे संपूर्ण नवी मुंबई भाजपमय झाले होते. दोन तासांपेक्षा अधिक वेळ भर उन्हात प्रचाररथावर गणेश नाईक यांच्यासह नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी स्वार झाले होते.

ऐरोलीतून गणेश नाईक दाखल उमेदवारी अर्ज

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासाठी अखेर त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गणेश नाईक यांना एबी फॉर्म देण्यात आला असून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मी निवडणूकीत लढणार नाही, तर त्यानेही निवडणूक न लढवण्याचे ठरवले होते, मुलाच्या हट्टापायीच मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश नाईक यांनी दिली. विषेश म्हणजे काल बेलापूर मतदारसंघातुन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या मंदा म्हात्रेंच्या शक्तिप्रदर्शनात गणेश नाईक दिसून आले नव्हते. त्यानंतर आज गणेश नाईक यांच्या रॅलीत ही मंदा म्हात्रे कुठेच दिसल्या नाहीत. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील दरी अजूनही स्पष्टपणे जाणून येत आहे.

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992ला नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999ला शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली. त्यानंतर आता त्यांनी महापालिकेतील नगरसेवकांसह भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीला वेगळंच वळण लागले आहे. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजली जाणाऱ्या नवी मुंबईत भाजपचे कमळ फुलणार का? हे आता येत्या निकालात दिसून येईल.

नवी मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उर्वरित दिग्गज नेते आणि उमेदवारांची रीघ लागलेली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईकांनी आपला अर्ज दाखल केला. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांची उसळलेल्या गर्दीमुळे संपूर्ण नवी मुंबई भाजपमय झाले होते. दोन तासांपेक्षा अधिक वेळ भर उन्हात प्रचाररथावर गणेश नाईक यांच्यासह नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी स्वार झाले होते.

ऐरोलीतून गणेश नाईक दाखल उमेदवारी अर्ज

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासाठी अखेर त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गणेश नाईक यांना एबी फॉर्म देण्यात आला असून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मी निवडणूकीत लढणार नाही, तर त्यानेही निवडणूक न लढवण्याचे ठरवले होते, मुलाच्या हट्टापायीच मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश नाईक यांनी दिली. विषेश म्हणजे काल बेलापूर मतदारसंघातुन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या मंदा म्हात्रेंच्या शक्तिप्रदर्शनात गणेश नाईक दिसून आले नव्हते. त्यानंतर आज गणेश नाईक यांच्या रॅलीत ही मंदा म्हात्रे कुठेच दिसल्या नाहीत. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील दरी अजूनही स्पष्टपणे जाणून येत आहे.

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992ला नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999ला शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली. त्यानंतर आता त्यांनी महापालिकेतील नगरसेवकांसह भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीला वेगळंच वळण लागले आहे. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजली जाणाऱ्या नवी मुंबईत भाजपचे कमळ फुलणार का? हे आता येत्या निकालात दिसून येईल.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे।

नवी मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उर्वरित दिग्गज नेते आणि उमेदवारांची रीघ लागलेली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईकांनी आपला अर्ज दाखल केला. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांची उसळलेल्या गर्दीमुळे संपूर्ण नवी मुंबई भाजपमय झाले होते. दोन तासांपेक्षा अधिक वेळ भर उन्हात प्रचाररथावर गणेश नाईक यांच्यासह नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी स्वार झाले होते. Body:नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासाठी अखेर त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गणेश नाईक यांना एबी फॉर्म देण्यात आला असून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.मी निवडणूकीत लढणार नाही, तर त्यानेही निवडणूक न लढवण्याचं ठरवलं होतं, मुलाच्या हट्टापायीच मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश नाईक यांनी दिली. विषेश म्हणजे काल बेलापूर मतदारसंघातुन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या मंदा म्हात्रेंच्या शक्तिप्रदर्शनात गणेश नाईक दिसून आले नव्हते. त्यानंतर आज गणेश नाईक यांच्या रॅलीत ही मंदा म्हात्रे कुठेच दिसल्या नाहीत. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील दरी अजूनही स्पष्टपणे जाणून येत आहे.


गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली. त्यानंतर आता त्यांनी महापालिकेतील नगरसेवकांसह भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीला वेगळंच वळण लागले आहे.

Conclusion:त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजली जाणारी नवी मुंबईत भाजपचं कमळ फुलणार का? हे आता येत्या निकालात दिसून येईल.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.