ETV Bharat / state

सायकल इंडिया ग्रूप खोपोलीने केला एक दिवसात केली 100 किलोमीटर सायकलिंग - सायकल रॅली खोपोली

'आपण निरोगी तर आपले कुटुंब निरोगी' या धरतीवर खोपोली शहरात 2 वर्षापूर्वी सायकल इंडिया या नावाने समूह स्थापन झाला. त्यानंतर या समूहाच्या माध्यमातून खोपोली शहरासह खालापूर व कर्जत तालुक्यात सायकल चालवण्याचे फायदे पटवून देत सायकल मोठ्या प्रमाणात चालवा, अशी जनजागृती वेळोवेळी करण्यात आली. या समूहाच्या माध्यमातून 21 मार्च रोजी 100 व्या सायकल जनजागृती रॅली निमित्ताने 100 किलोमीटर अंतराचा पल्ला पार केला.

सायकल इंडिया ग्रूप खोपोली, cycle india group khopoli
सायकल इंडिया ग्रूप
author img

By

Published : Mar 23, 2021, 4:41 PM IST

रायगड - आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सवड मिळत नसते. 'आपण निरोगी तर आपले कुटुंब निरोगी' या धरतीवर खोपोली शहरात 2 वर्षापूर्वी सायकल इंडिया या नावाने समूह स्थापन झाला. त्यानंतर या समूहाच्या माध्यमातून खोपोली शहरासह खालापूर व कर्जत तालुक्यात सायकल चालवण्याचे फायदे पटवून देत सायकल मोठ्या प्रमाणात चालवा, अशी जनजागृती वेळोवेळी करण्यात आली. या समूहाच्या माध्यमातून 21 मार्च रोजी 100 व्या सायकल जनजागृती रॅली निमित्ताने 100 किलोमीटर अंतराचा पल्ला पार केला.

सायकल चालवा आणि निरोगी आयुष्य मिळवा -
सायकल इंडिया खोपोली या समूहाचा मुख्य उद्देश म्हणजे बहुतेक करून दैनंदिन जीवनात सायकलचाच वापर करणे. सायकल चालवल्यामुळे आपण स्वतः तंदुरुस्त राहतो तसेच पर्यावरणाचे समतोल राखण्यास सुध्दा मदत मिळेल, हा आहे. या समुहाला गेल्या दोन वर्षाच्या काळात नागरिकांकडून चांगला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अजून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वसंत सणस व संदीप ढवळे यांनी केले.

सायकल इंडिया ग्रूप खोपोलीने केला एक दिवसात केली 100 किलोमीटर सायकलिंग..
सायकल रॅलीतून नागरिकांना पटवून दिले सायकल चालविण्याचे फायदे -या समुहाने खोपोली शहरासह खालापूर व कर्जत तालुक्यात सायकल चालवण्याचे फायदे पटवून दिले. 21 मार्च रोजी या समूहाच्या माध्यमातून 100 वी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी वसंत सणस, संदीप ढवळे, सचिन बोराना, भूषण गानू, संतोष पाटील, मितेश शाह, देवेंद्र टिळक, संजय पोरवाल, कुलदीप पवार, संदिप भस्मे, चंद्रशेखर शिंदे, रोहिणी टिळक, मिलिंद बोधनकर, रघुनाथ पाटील, प्रणय नाईक, प्रसन्ना वाघ आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने सायकल चालक उपस्थित होते.

हेही वाचा - नाशिकमध्ये महिला सावकाराची दंबंगिरी; आदिवासी दाम्पंत्यास अमानुष मारहाण

रायगड - आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सवड मिळत नसते. 'आपण निरोगी तर आपले कुटुंब निरोगी' या धरतीवर खोपोली शहरात 2 वर्षापूर्वी सायकल इंडिया या नावाने समूह स्थापन झाला. त्यानंतर या समूहाच्या माध्यमातून खोपोली शहरासह खालापूर व कर्जत तालुक्यात सायकल चालवण्याचे फायदे पटवून देत सायकल मोठ्या प्रमाणात चालवा, अशी जनजागृती वेळोवेळी करण्यात आली. या समूहाच्या माध्यमातून 21 मार्च रोजी 100 व्या सायकल जनजागृती रॅली निमित्ताने 100 किलोमीटर अंतराचा पल्ला पार केला.

सायकल चालवा आणि निरोगी आयुष्य मिळवा -
सायकल इंडिया खोपोली या समूहाचा मुख्य उद्देश म्हणजे बहुतेक करून दैनंदिन जीवनात सायकलचाच वापर करणे. सायकल चालवल्यामुळे आपण स्वतः तंदुरुस्त राहतो तसेच पर्यावरणाचे समतोल राखण्यास सुध्दा मदत मिळेल, हा आहे. या समुहाला गेल्या दोन वर्षाच्या काळात नागरिकांकडून चांगला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अजून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वसंत सणस व संदीप ढवळे यांनी केले.

सायकल इंडिया ग्रूप खोपोलीने केला एक दिवसात केली 100 किलोमीटर सायकलिंग..
सायकल रॅलीतून नागरिकांना पटवून दिले सायकल चालविण्याचे फायदे -या समुहाने खोपोली शहरासह खालापूर व कर्जत तालुक्यात सायकल चालवण्याचे फायदे पटवून दिले. 21 मार्च रोजी या समूहाच्या माध्यमातून 100 वी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी वसंत सणस, संदीप ढवळे, सचिन बोराना, भूषण गानू, संतोष पाटील, मितेश शाह, देवेंद्र टिळक, संजय पोरवाल, कुलदीप पवार, संदिप भस्मे, चंद्रशेखर शिंदे, रोहिणी टिळक, मिलिंद बोधनकर, रघुनाथ पाटील, प्रणय नाईक, प्रसन्ना वाघ आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने सायकल चालक उपस्थित होते.

हेही वाचा - नाशिकमध्ये महिला सावकाराची दंबंगिरी; आदिवासी दाम्पंत्यास अमानुष मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.