ETV Bharat / state

अलिबागेत शासकीय वसाहतीला दुरावस्थेचे ग्रहण; शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात

शासकीय वसाहत नव्याने वसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे 2018 मध्ये 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही. मात्र, तूर्तास तरी येथे राहणारे रहिवासी पडझड होत असलेल्या इमारतीमध्ये आपला आलेला दिवस ढकलत आहेत.

author img

By

Published : Jul 18, 2019, 7:48 PM IST

अलिबागेत शासकीय वसाहतीला दुरवस्थेचे ग्रहण

रायगड - जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग शहरातील शासकीय वसाहतीची दुरावस्था झालेली आहे. येथे राहणारे कुटूंब जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. शासकीय वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्या असून त्या कधी पडतील याचा नेम नाही. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे कुटूंब जीव मुठीत धरून राहत आहेत.

अलिबागेत शासकीय वसाहतीला दुरवस्थेचे ग्रहण

शासकीय वसाहत नव्याने वसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे 2018 मध्ये 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही. मात्र, तूर्तास तरी येथे राहणारे रहिवासी पडझड होत असलेल्या इमारतीमध्ये आपला आलेला दिवस ढकलत आहेत.

अलिबाग शहर जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व मुख्य कार्यालय याठिकाणी आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या, इतर जिल्ह्यातून येणारे कर्मचारी, अधिकारी यांना राहण्याची सोय व्हावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 1976 ते 84 दरम्यानच्या काळात शहरातील चेंढरे मध्यवर्ती भागात शासकीय वसाहतीची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये अडीच एकर शासकीय जमिनीवर प्रथम वर्ग अधिकारी यांच्यासाठी 3 इमारती, वर्ग 2 च्या कर्मचाऱ्यांसाठी 3 इमारती, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांसाठी 7 इमारती आणि वर्ग 4 साठी 2 इमारती अशा एकूण 15 इमारतीमध्ये 121 सदनिका बांधल्या होत्या. वसाहतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कुटूंबासह येथे गुण्यागोविंदाने नांदत होती. त्यामुळे शासकीय वसाहत ही एकेकाळी अलिबागची शान होती. मात्र, गेल्या ७-८ वर्षांपासून शासकीय वसाहत खंडर बनलेली आहे.

आज या शासकीय वसाहतीला 40 वर्ष पूर्ण झाली असून ७-८ वर्षांपासून एक एक कुटूंब वसाहतीमधून जाऊ लागले आहे. आता या 8 इमारतीमधील 4 इमारतींमध्ये सध्या एकोणीस कुटूंब राहत आहेत. तर 11 इमारती पूर्णपणे बंद आहेत. या इमारतींचे स्लॅब पडून सळ्या बाहेर आल्या आहेत, तर काही इमारतींना झाडाझुडपानी आपले घर बनवले आहे. त्यामुळे या इमारती कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत.

चार इमारतींमध्ये कर्मचाऱ्यांचे कुटूंब तसेच क्वार्टरमध्ये एका अधिकाऱ्याचे कुटूंब सध्या वास्तव्यास आहेत. मात्र, या इमारतीही धोकादायक असून स्लॅब पडणे, गळणे, जनावरे घरात येणे असे प्रकार घडत आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी वास्तव्यास असून त्यांच्या पगारातून मेंटनस खर्च कापला जात आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीची देखभाल, दुरुस्ती केली जात नसल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या वसाहतीकडे लक्ष देऊन पुन्हा तिला गतवैभव मिळवून देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या वसाहतींसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 7 हजार 106.42 चौ. मी. बांधकामाचा 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे उपकार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण यांनी सांगितले आहे.

रायगड - जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग शहरातील शासकीय वसाहतीची दुरावस्था झालेली आहे. येथे राहणारे कुटूंब जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. शासकीय वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्या असून त्या कधी पडतील याचा नेम नाही. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे कुटूंब जीव मुठीत धरून राहत आहेत.

अलिबागेत शासकीय वसाहतीला दुरवस्थेचे ग्रहण

शासकीय वसाहत नव्याने वसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे 2018 मध्ये 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही. मात्र, तूर्तास तरी येथे राहणारे रहिवासी पडझड होत असलेल्या इमारतीमध्ये आपला आलेला दिवस ढकलत आहेत.

अलिबाग शहर जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व मुख्य कार्यालय याठिकाणी आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या, इतर जिल्ह्यातून येणारे कर्मचारी, अधिकारी यांना राहण्याची सोय व्हावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 1976 ते 84 दरम्यानच्या काळात शहरातील चेंढरे मध्यवर्ती भागात शासकीय वसाहतीची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये अडीच एकर शासकीय जमिनीवर प्रथम वर्ग अधिकारी यांच्यासाठी 3 इमारती, वर्ग 2 च्या कर्मचाऱ्यांसाठी 3 इमारती, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांसाठी 7 इमारती आणि वर्ग 4 साठी 2 इमारती अशा एकूण 15 इमारतीमध्ये 121 सदनिका बांधल्या होत्या. वसाहतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कुटूंबासह येथे गुण्यागोविंदाने नांदत होती. त्यामुळे शासकीय वसाहत ही एकेकाळी अलिबागची शान होती. मात्र, गेल्या ७-८ वर्षांपासून शासकीय वसाहत खंडर बनलेली आहे.

आज या शासकीय वसाहतीला 40 वर्ष पूर्ण झाली असून ७-८ वर्षांपासून एक एक कुटूंब वसाहतीमधून जाऊ लागले आहे. आता या 8 इमारतीमधील 4 इमारतींमध्ये सध्या एकोणीस कुटूंब राहत आहेत. तर 11 इमारती पूर्णपणे बंद आहेत. या इमारतींचे स्लॅब पडून सळ्या बाहेर आल्या आहेत, तर काही इमारतींना झाडाझुडपानी आपले घर बनवले आहे. त्यामुळे या इमारती कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत.

चार इमारतींमध्ये कर्मचाऱ्यांचे कुटूंब तसेच क्वार्टरमध्ये एका अधिकाऱ्याचे कुटूंब सध्या वास्तव्यास आहेत. मात्र, या इमारतीही धोकादायक असून स्लॅब पडणे, गळणे, जनावरे घरात येणे असे प्रकार घडत आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी वास्तव्यास असून त्यांच्या पगारातून मेंटनस खर्च कापला जात आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीची देखभाल, दुरुस्ती केली जात नसल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या वसाहतीकडे लक्ष देऊन पुन्हा तिला गतवैभव मिळवून देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या वसाहतींसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 7 हजार 106.42 चौ. मी. बांधकामाचा 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे उपकार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण यांनी सांगितले आहे.

Intro:शासकीय वसाहतीला दुरावस्थेचे ग्रहण

शासकीय कर्मचारी कुटूंब राहत आहेत जीव मुठीत घेऊन

शासकीय वसाहतीला गत वैभव प्राप्त करून देण्याची राहिवाशाची मागणी

42 कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी खितपत


रायगड : जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग शहरातील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली असून येथे राहणारे कुटूंब आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. शासकीय वसाहतीतील इमारती या पडझडीला आल्या असून कधीही पडण्याची दुरवस्था झालेली आहे. शासकीय वसाहत नव्याने बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारीमार्फत शासनाकडे 2018 साली 42 कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही आहे. मात्र तूर्तास तरी येथे राहणारे रहिवाशी पडझड होत असलेल्या इमारतीमध्ये आपला आलेला दिवस ढकलत आहेत.


Body:अलिबाग शहर जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व मुख्य कार्यालय याठिकाणी आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या परजिल्ह्यातून येणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी 1976 ते 84 दरम्यान काळात शहरातील चेंढरे मध्यवर्ती भागात शासकीय वसाहतीची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली होती.

अलिबाग शहरातील चेंढरे परिसरात अडीच एकर शासकीय जमिनीवर प्रथम वर्ग अधिकारी यांच्यासाठी 3 इमारत, बर्ग 2 च्या कर्मचाऱ्यांसाठी 3 इमारत, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यासाठी 7 इमारत व वर्ग 4 साठी 2 इमारती अशा एकूण 15 इमारतीमध्ये 121 सदनिका बांधल्या आहेत. वसाहतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कुटूंबासह येथे गुण्यागोविंदाने नांदत होती. त्यामुळे शासकीय वसाहत ही एकेकाळी अलिबागची शान होती. मात्र गेल्या सात आठ वर्षांपासून शासकीय वसाहत म्हणजे एक खंडर झाल्यासारखी झाली आहे.


Conclusion:आज या शासकीय वसाहतीला 40 वर्ष पूर्ण झाली असून सात आठ वर्षांपासून एक एक कुटूंब वसाहतीमधून जाऊ लागले. आता या आठ इमारतीमधील चार इमारतीमध्ये सध्या एकोणीस कुटूंब राहत आहेत. तर 11 इमारती पूर्ण भग्नावस्थेत झाल्या असून बंद आहेत. या इमारतीचे स्लॅब पडून सळ्या बाहेर आल्या आहेत. तर इमारतीला झाडाझुडपानी आपले घर बनविले आहे. त्यामुळे या इमारती कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत.

चार इमारती कर्मचारी कुटूंब व क्वार्टर मध्ये एक अधिकारी यांचं कुटूंब सध्या वास्तव्यास आहेत. मात्र या इमारतीही धोकादायक झाल्या असून स्लॅब पडणे, गळणे, जन जनावर घरात येणे असे प्रकार घडत आहेत. शासकीय कर्मचारी राहत असून त्याच्या पगारातून मेंटनस खर्च कापला जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीची देखबाल दुरुस्ती केली जात नसल्याची खंत येथील रहिवासी करीत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या वसाहतीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 7 हजार 106.42 चौ मी. बांधकामाचा 42 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे उपकार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण यांनी सांगितले आहे.

शासकीय वसाहती कडे शासनाने लक्ष देऊन पुन्हा तिला गतवैभव मिळवून देण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.