ETV Bharat / state

पनवेलहुन गाठली थेट 'मातोश्री'; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 'त्या' शेतकऱ्याच्या पदरी निराशाच! - मातोश्रीला गेला शेतकरी

पनवेलमधील एक शेतकरी मधुकर देशमुख शेती आणि बँकेच्या कर्जामुळे त्रस्त होते. याबद्दल सरकारला मदतीच्या अपेक्षेत सोमवारी त्यांनी मातोश्री गाठत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी त्यांची मुख्यमंत्रीकडुन उद्धव ठाकरेंकडुन दखल घेण्यात आली. या संदर्भात तहसीलदांरासह कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. मात्र,या बैठकीत बँकेच्याच बाजूने चर्चा झाली असून आपले म्हणणे कोणी ऐकून घ्यायला तयार नाही अशी तक्रार त्यांनी केली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी..

afer-despiting-the-orders-of-the-chief-minister-farmer-get-nothing
पनवेलहुन गाठली थेट मातोश्री; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 'त्या' शेतकऱ्याच्या पदरी निराशाच
author img

By

Published : Jan 7, 2020, 2:07 AM IST

रायगड - शेती आणि बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या पनवेलमधल्या एका शेतकऱ्याने सोमवारी थेट 'मातोश्री' गाठत आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडुन दखल घेण्यात आली. या संदर्भात तहसीलदांरासह कृषिमंत्र्यांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र, या बैठकीत चर्चा की केवळ बँकेच्याच बाजूने झाली असून, आपले म्हणणे कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

पनवेलहुन गाठली थेट मातोश्री; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 'त्या' शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल; अखेर 'त्या' चिमुकल्यांची थंडीपासून सुटका

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी मधुकर देशमुख हे आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत मातोश्रीवर आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात नेले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: दखल घेत, त्यांना सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी बँकेच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांची आणि देशमुख यांच्यासोबत समोरासमोर चर्चा घडवून आणली. त्यानंतर सायंकाळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबतही एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र, यावेळी बैठकीत केवळ बँकेच्या बाजूनेच चर्चा करण्यात आली असा आरोप यावेळी देशमुख यांनी केला आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी.

रायगड - शेती आणि बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या पनवेलमधल्या एका शेतकऱ्याने सोमवारी थेट 'मातोश्री' गाठत आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडुन दखल घेण्यात आली. या संदर्भात तहसीलदांरासह कृषिमंत्र्यांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र, या बैठकीत चर्चा की केवळ बँकेच्याच बाजूने झाली असून, आपले म्हणणे कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

पनवेलहुन गाठली थेट मातोश्री; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 'त्या' शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल; अखेर 'त्या' चिमुकल्यांची थंडीपासून सुटका

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी मधुकर देशमुख हे आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत मातोश्रीवर आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात नेले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: दखल घेत, त्यांना सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी बँकेच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांची आणि देशमुख यांच्यासोबत समोरासमोर चर्चा घडवून आणली. त्यानंतर सायंकाळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबतही एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र, यावेळी बैठकीत केवळ बँकेच्या बाजूनेच चर्चा करण्यात आली असा आरोप यावेळी देशमुख यांनी केला आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी.

Intro:सोबत 121 जोडला आहे. कृपया Exclusive चा टॅग द्यावा.

पनवेल


शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी पनवेलहुन थेट मातोश्री गाठलेल्या पनवेलमधल्या शेतकऱ्याची दखल काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आज तरी आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्याच्या पदरी अखेर निराशाच पडली. सकाळपासून पनवेल तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अमित सानप यांच्यासोबत चर्चा आणि त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. परंतु या बैठकीत चर्चा की केवळ बँकेच्याच बाजूने झाली, आपलं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही अशी तक्रार या शेतकऱ्याने केलीये. Body:बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले पनवेलमधील शेतकरी मधुकर देशमुख हे आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत मातोश्रीवर आले होते. . मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या शेतकऱ्याची स्वत: दखल घेतली आणि त्याला सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आज पनवेलमध्ये सकाळपासूनच या शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सकाळी पनवेल तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अमित सानप यांनी बँकेचे प्रतिनिधी यांना बोलावुन त्यांची आणि शेतकरी देशमुख यांची समोरासमोर चर्चा केली. Conclusion:त्यानंतर सायंकाळी मुंबईत कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबत एक बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत केवळ बँकेच्या बाजूनेच चर्चा घेण्यात आल्या, असा आरोप यावेळी शेतकरी देशमुख यांनी केलाय. त्यांच्याशी सविस्तर बातचीत केलीये आमची प्रतिनिधी प्रमिला पवार हिने...

121:- मधुकर देशमुख, पीडित शेतकरी
प्रमिला पवार, प्रतिनिधी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.