ETV Bharat / state

'ते तोडायचे काम करतील, आम्ही जोडायचे काम करु'

पंतप्रधान सीएएवर स्पष्टतेने बोलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बोलण्यास तयार नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे, हा सर्वात मोठा देशद्रोह आहे, अशी टीका स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

author img

By

Published : Feb 17, 2020, 9:41 PM IST

Yogendra Yadav
योगेंद्र यादव

पुणे - राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध करण्यासाठी 'हम भारत के लोग' ही चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदोलन झाले आहे. याचे आता 'भारत जोडो' या आंदोलनात आम्ही रुपांतर करत आहोत. ते तोडायचे काम करतील, आम्ही जोडायचे काम करु, अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात भारत जोडो आंदोलन करण्यात येणार आहे. 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. यादव म्हणाले, एनपीआरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सीएए कायद्याच्या अंतर्गत येते.

हेही वाचा - बीएसएनएलमधून 78 हजार 500 कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती

पंतप्रधान सीएएवर स्पष्टतेने बोलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बोलण्यास तयार नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे, हा सर्वात मोठा देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे खरे तुकडे-तुकडे गँगचे प्रमुख आहेत. श्रीलंकेचे अनेक तमिळ हिंदू नागरिकत्व मागतायेत त्यांना सरकार का नागरिकत्व देत नाही ? असा प्रश्न देखील यादव यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारचे चारित्र्य पडताळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र सराकरचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यासोबत मंचावर येत सीएए, एनआरसीला विरोध केला. परंतु, राज्य सरकारने सीएएच्या बाजूने परिपत्रक काढले. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तसे परिपत्रक काढावे, अशी मागणी यादव यांनी केली.

हेही वाचा - ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

पुणे - राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध करण्यासाठी 'हम भारत के लोग' ही चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदोलन झाले आहे. याचे आता 'भारत जोडो' या आंदोलनात आम्ही रुपांतर करत आहोत. ते तोडायचे काम करतील, आम्ही जोडायचे काम करु, अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात भारत जोडो आंदोलन करण्यात येणार आहे. 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. यादव म्हणाले, एनपीआरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सीएए कायद्याच्या अंतर्गत येते.

हेही वाचा - बीएसएनएलमधून 78 हजार 500 कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती

पंतप्रधान सीएएवर स्पष्टतेने बोलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बोलण्यास तयार नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे, हा सर्वात मोठा देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे खरे तुकडे-तुकडे गँगचे प्रमुख आहेत. श्रीलंकेचे अनेक तमिळ हिंदू नागरिकत्व मागतायेत त्यांना सरकार का नागरिकत्व देत नाही ? असा प्रश्न देखील यादव यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारचे चारित्र्य पडताळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र सराकरचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यासोबत मंचावर येत सीएए, एनआरसीला विरोध केला. परंतु, राज्य सरकारने सीएएच्या बाजूने परिपत्रक काढले. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तसे परिपत्रक काढावे, अशी मागणी यादव यांनी केली.

हेही वाचा - ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.