ETV Bharat / state

कमी जागांमध्ये सत्ता आणण्याचा चमत्कार पवारांनी केला- मुख्यमंत्री

author img

By

Published : Dec 25, 2019, 9:47 PM IST

उद्धव ठाकरे हे आज (बुधवारी) पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

uddhav-thackeray
मुख्यमंत्री

"वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या कार्यक्रमात पूर्वी कोणीतरी, 'पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो,' असे बोलले होते. त्यामुळे पवार साहेबांनी एक चूक केली. आता दुसरी चूक केली असे मी म्हणणार नाही," अशी अप्रत्यक्ष टीका मोदींवर नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच कमी जागांवर सत्ता आणण्याचा चमत्कार पवारांनी केला असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री

हेही वाचा- कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई

उद्धव ठाकरे हे आज (बुधवारी) पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, साखर क्षेत्रातले आपल्याला फारसे कळत नाही. पण या क्षेत्रातील दिग्गज माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबतीने या क्षेत्रातील समस्या सोडवल्या जातील, माझे नवे सहकारी अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि इतरही मान्यवर लवकरच सोबत येतील. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात सुरू करण्यासाठी जालना जिल्ह्यात जागा देण्याचे मागील सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र, आम्ही दिलेले शब्द पाळतो, असा चिमटा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेतला.

शेतकऱ्यांनी कमीतकमी जागेत जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेतले म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिले. पूर-दुष्काळ यावर मात करत तुम्ही शेतकऱ्यांनी हे यश मिळवले. शरद पवारांनीही असाच चमत्कार करून दाखवला आहे. कमीत-कमी जागांमध्ये त्यांनी सत्ता आणून दाखवली. मागील वेळी सरकारने काही आश्वासने दिली होती. आम्ही देखील सत्तेत होतो. पण अर्धवट होतो. म्हणजे आम्ही अर्धवट नव्हतो तर आमचा सहभाग अर्धवट होता. असे म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना आपल्या कॅबीनेटमधे त्या जालन्यातील जागेची फाईल घेवून मंजूर करायला सांगितली.

"वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या कार्यक्रमात पूर्वी कोणीतरी, 'पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो,' असे बोलले होते. त्यामुळे पवार साहेबांनी एक चूक केली. आता दुसरी चूक केली असे मी म्हणणार नाही," अशी अप्रत्यक्ष टीका मोदींवर नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच कमी जागांवर सत्ता आणण्याचा चमत्कार पवारांनी केला असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री

हेही वाचा- कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई

उद्धव ठाकरे हे आज (बुधवारी) पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, साखर क्षेत्रातले आपल्याला फारसे कळत नाही. पण या क्षेत्रातील दिग्गज माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबतीने या क्षेत्रातील समस्या सोडवल्या जातील, माझे नवे सहकारी अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि इतरही मान्यवर लवकरच सोबत येतील. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात सुरू करण्यासाठी जालना जिल्ह्यात जागा देण्याचे मागील सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र, आम्ही दिलेले शब्द पाळतो, असा चिमटा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेतला.

शेतकऱ्यांनी कमीतकमी जागेत जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेतले म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिले. पूर-दुष्काळ यावर मात करत तुम्ही शेतकऱ्यांनी हे यश मिळवले. शरद पवारांनीही असाच चमत्कार करून दाखवला आहे. कमीत-कमी जागांमध्ये त्यांनी सत्ता आणून दाखवली. मागील वेळी सरकारने काही आश्वासने दिली होती. आम्ही देखील सत्तेत होतो. पण अर्धवट होतो. म्हणजे आम्ही अर्धवट नव्हतो तर आमचा सहभाग अर्धवट होता. असे म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना आपल्या कॅबीनेटमधे त्या जालन्यातील जागेची फाईल घेवून मंजूर करायला सांगितली.

Intro:मला न कळणाऱ्या विषयात मी काही चुकीचं बोललो तर त्याला शरद पवारच जबाबदार , वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची राजकीय टोलेबाजी Body:mh_pun_vsi_cm_program_avb_7201348

anchor
राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी या विषयातलं आपल्याला फारसं काही कळत नाही असे सांगत या विषयातील दिग्गज मात्र माझ्यासोबत आहे त्यामुळे त्यांच्या सोबतीने या क्षेत्रातील समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी देखील केली, साखर संघाचे पदाधिकारी असलेले हर्षवर्धन पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यानी भाजप मध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांना देखील चुचकरल,
भाषणाची सुरुवात करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे नवे सहकारी अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि इतरही मान्यवर आहेत ते ही लवकरच सोबत येतील असे वक्तव्य त्यांनी केले...वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात सुरू करण्यासाठी जालना जिल्ह्यात जागा देण्याच मागील वर्षी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून संघर्षाची भूमिका घेतली असा टोला लगावत हे सरकार दिलेलं आश्वासन पाळेल अस उद्धव म्हणाले, साखरेच्या विषयावर मी जास्त बोलणार नाही अशी आणि जर काही चुकीचं माझ्याकडून बोललं गेलं किंवा तुम्हाला अपेक्षित ते मी बोललो नाही तर त्याला जबाबदार मला मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे आदेश देणारे शरद पवार असतील हे आधीच सांगतो अशी मिश्कील टोलेबाजी देखील त्यांनी केली याच संस्थेच्या कार्यक्रमात पूर्वी कोणीतरी पवारांनी मला बोट धरून राजकारणात आणलं असं बोललं होतं त्यामुळे पवार साहेबांनी एक चूक केली आणि आता दुसरी चूक केली असं मी म्हणणार नाही अशी कोपरखळी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावली, शेतकर्यांनी कमीतकमी जागेत जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेतले म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिले. पुर- दुष्काळ यावर मात करत तुम्ही शेतकऱ्यांनी हे यश मिळवलं. शरद पवारांनीही असाच चमत्कार करून दाखवला आहे. कमीतकमी जागांमध्ये सत्ता आणून दाखवलीय..मागील वेळी सरकारनं काही आश्वासनं दिली होती. आम्ही देखील सत्ते होतो पण् अर्धवट होतो. म्हणजे आम्ही अर्धवट नव्हतो तर आमचा सहभाग अर्धवट होता. पण् जयंतराव आपल्या कॅबीनेटमधे त्या जालन्यातील जागेची फाईल घ्या. आपण ती मंजूर करु. मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी आपण हे करायला हवं.
सध्या मी सगळे विषय समजून घेतोय. मंत्रीमंडळात एफ आर पी चा विषय आला की मी जयंतराव पाटील यांच्याकडे पहातो... आणखी कोणता आला की मी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहतो. ते मला समजावून सांगतात. असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले
Byte उद्धव ठाकरे , मुख्यमंत्रीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.