ETV Bharat / state

बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याने मावळमध्ये साडेतीन हजार पक्षी केले नष्ट

author img

By

Published : Jan 28, 2021, 5:08 PM IST

Updated : Jan 28, 2021, 5:31 PM IST

डॉ. शिवाजी विधाटे म्हणाले, की मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगावल्या होत्या. त्याचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

bird flu
bird flu

पुणे - राज्यात काही भागांमध्ये घोंगावणाऱ्या बर्ड फ्लूने पुणे जिल्ह्यात शिरकाव केला असून मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावातील अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगवल्या होत्या. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तेथील साडेतीन हजार पक्षी नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, आणखी 26 हजार 500 पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

कोंबड्या दगावल्याने बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न

डॉ. शिवाजी विधाटे म्हणाले, की मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगावल्या होत्या. त्याचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. येथील परिसरातील पक्षी नष्ट करण्याची परवानगी जिल्ह्याधिकारी यांनी दिली आहे. त्यानुसार साडेतीन हजार पक्षी नष्ट केले आहेत. पक्षी गाडण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ती शोधली असून खड्डा करण्याचे काम सुरू आहे, अे ते म्हणाले.

'अफवांवर विश्वास ठेवू नये, मांसाहार करावा'

शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार पन्नास, पन्नास टक्के मदत देणार आहे. इतर शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. ज्यांना बर्ड फ्लू आढळला आहे, तेच पक्षी नाहीसे केले जात आहेत. जे नागरिक मांसाहार करतात, त्यांनी मांसाहार करावा.

'70 अंश सेल्सिअसमध्ये नष्ट होतो विषाणू'

आपण मांसाहार, चिकन अर्धा तास उकळतो. त्यामुळे त्यात विषाणू राहात नाहीत. बाधित पक्षापासून मनुष्याला आजार होत नाही. अफवावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

'आर्थिक मदत करावी'

पोल्ट्रीमालक सगुणा अशोक राक्षे म्हणाल्या, की पोल्ट्रीमध्ये साडेतीन हजार कोंबड्या होत्या. सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना बर्ड फ्लू असल्याचे आढळे. कोंबड्या नष्ट करण्यासाठी आम्ही सहमती दिली आहे. आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी, दहा वर्षे झाली पोल्ट्री आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुणे - राज्यात काही भागांमध्ये घोंगावणाऱ्या बर्ड फ्लूने पुणे जिल्ह्यात शिरकाव केला असून मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावातील अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगवल्या होत्या. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तेथील साडेतीन हजार पक्षी नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, आणखी 26 हजार 500 पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

कोंबड्या दगावल्याने बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न

डॉ. शिवाजी विधाटे म्हणाले, की मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगावल्या होत्या. त्याचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. येथील परिसरातील पक्षी नष्ट करण्याची परवानगी जिल्ह्याधिकारी यांनी दिली आहे. त्यानुसार साडेतीन हजार पक्षी नष्ट केले आहेत. पक्षी गाडण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ती शोधली असून खड्डा करण्याचे काम सुरू आहे, अे ते म्हणाले.

'अफवांवर विश्वास ठेवू नये, मांसाहार करावा'

शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार पन्नास, पन्नास टक्के मदत देणार आहे. इतर शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. ज्यांना बर्ड फ्लू आढळला आहे, तेच पक्षी नाहीसे केले जात आहेत. जे नागरिक मांसाहार करतात, त्यांनी मांसाहार करावा.

'70 अंश सेल्सिअसमध्ये नष्ट होतो विषाणू'

आपण मांसाहार, चिकन अर्धा तास उकळतो. त्यामुळे त्यात विषाणू राहात नाहीत. बाधित पक्षापासून मनुष्याला आजार होत नाही. अफवावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

'आर्थिक मदत करावी'

पोल्ट्रीमालक सगुणा अशोक राक्षे म्हणाल्या, की पोल्ट्रीमध्ये साडेतीन हजार कोंबड्या होत्या. सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना बर्ड फ्लू असल्याचे आढळे. कोंबड्या नष्ट करण्यासाठी आम्ही सहमती दिली आहे. आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी, दहा वर्षे झाली पोल्ट्री आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Last Updated : Jan 28, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.