ETV Bharat / state

उत्तर पुणे जिल्ह्यात धुक्याची चादर, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

author img

By

Published : Jan 3, 2021, 12:04 PM IST

पुण्यात धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दाट धुक्यांमुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगर माळरानांसह शहरी भागातील परिसरात थंडी व धुक्यांची वाढ झाली आहे.

fog concerns among farmers
धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता

पुणे - गेल्या महिन्याभरापासून पुण्याच्या ग्रामीण भागात भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत पांढऱ्याशुभ्र धुक्यांची चादर पसरलेली दिसून येतेय. मात्र या धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दाट धुक्यांमुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगर माळरानांसह शहरी भागातील परिसरात थंडी व धुक्यांची वाढ झाली आहे. वाढती थंडी व वातावरणातील पसरलेले धुके शेतीवर रोगराई पसरवत आहे.

पुणे जिल्ह्यात धुक्याची चादर
साथीचे आजार बळावण्याची भितीहवेत गारवा वाढल्याने पहाटे व्यायाम करण्यासाठी तसेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरी भागातील लोकांची झुंबड उडाली आहे. इतके दिवस कोरोनामुळे घरात असलेले नागरिक आता पहाटे बाहेर पडत आहेत. मात्र यापुढील काळात हे वातावरण असेच राहिले तर साथीच्या आजार बळावण्याची भिती व्यक्त केली जात आहे.आंबा उत्पादक संकटात

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहेत. दाट धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आहे. बदलत्या हवामानामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. या वातावरणाच्या लहरीपणाचा प्रमुख फळपिक असलेल्या आंब्याला सर्वाधिक फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर औषधे फवारण्याची आवश्यकता भासणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे औषध फवारणीमुळे आंबा उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच मोहोरावर करपा रोग पडण्याची शक्यताही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा संकटात सापडला आहे.

हेही वाचा - '१७ वर्षीय पाकिस्तानी खेळाडू प्रत्यक्षात २८ वर्षांचे', आसिफचा खळबळजनक खुलासा

पुणे - गेल्या महिन्याभरापासून पुण्याच्या ग्रामीण भागात भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत पांढऱ्याशुभ्र धुक्यांची चादर पसरलेली दिसून येतेय. मात्र या धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दाट धुक्यांमुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगर माळरानांसह शहरी भागातील परिसरात थंडी व धुक्यांची वाढ झाली आहे. वाढती थंडी व वातावरणातील पसरलेले धुके शेतीवर रोगराई पसरवत आहे.

पुणे जिल्ह्यात धुक्याची चादर
साथीचे आजार बळावण्याची भितीहवेत गारवा वाढल्याने पहाटे व्यायाम करण्यासाठी तसेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरी भागातील लोकांची झुंबड उडाली आहे. इतके दिवस कोरोनामुळे घरात असलेले नागरिक आता पहाटे बाहेर पडत आहेत. मात्र यापुढील काळात हे वातावरण असेच राहिले तर साथीच्या आजार बळावण्याची भिती व्यक्त केली जात आहे.आंबा उत्पादक संकटात

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहेत. दाट धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आहे. बदलत्या हवामानामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. या वातावरणाच्या लहरीपणाचा प्रमुख फळपिक असलेल्या आंब्याला सर्वाधिक फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर औषधे फवारण्याची आवश्यकता भासणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे औषध फवारणीमुळे आंबा उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच मोहोरावर करपा रोग पडण्याची शक्यताही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा संकटात सापडला आहे.

हेही वाचा - '१७ वर्षीय पाकिस्तानी खेळाडू प्रत्यक्षात २८ वर्षांचे', आसिफचा खळबळजनक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.