ETV Bharat / state

माझ्या कामाची पोचपावती मिळाली - सय्यद मेहबूब

author img

By

Published : Jan 26, 2020, 8:59 PM IST

Updated : Jan 26, 2020, 9:33 PM IST

सरकारने मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळामार्फत केलेल्या कामाची दखल घेत मला पोच पावती दिली, अशी प्रतिक्रिया पुण्यातील सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाई यांनी दिली.

पद्मश्री सय्यद मेहबूब
पद्मश्री सय्यद मेहबूब

पुणे - सरकारने मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळामार्फत केलेल्या कामाची दखल घेत मला पोच पावती दिली, अशी प्रतिक्रिया पुण्यातील सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाई यांनी दिली. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया देताना पद्मश्री विजेते सय्यद मेहबूब


त्यांनी मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळ स्थापन करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून समाज नागरी हक्क कायदा व्हावा, तिहेरी तलाक पद्धत बंद व्हावी, महिलांनाही पुरुषांप्रमाणे सर्व अधिकार मिळावे, लग्न व घटस्फोट हे न्यायालयातच व्हावे, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्यास पुरुषांना मज्जाव असावा. यासाठी त्यांनी लढा दिला.

हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

ते म्हणाले, सध्या गोमांसच्या नवाने मुस्लिमांची प्रतिमा मलीन करण्याचे घातक कार्य काही बुद्धीजीवींकडून केले जात आहे. गोमांसच्या नावाने मॉब लिचिंग सारखे प्रकार देशात घडत असल्याने देशात असंतोषाची लाट पसरली आहे. हे देशात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. मुस्लीमही देशाचे नागरिक असून ते भूमीपुत्र आहेत. राष्ट्रवादासाठी ते कुठे कमी पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा - पुण्यातील ४ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत साकारला तिरंगा, पाहा व्हिडिओ

यावेळी ते सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याबाबत बोलताना म्हणाले, कोणाताही कायदा हा केवळ एकाच धर्माला लागू नसावा, तो सर्वांना समान करावा यासाठीच आम्ही समान नागरी हक्कची करत आहोत.पण, सीएए,एनआरसी व एनपीआर यात केवळ ठराविक समाजाला उद्देशले जात आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे योग्यच आहे. समाजाला विश्वासात घेऊन कायदे बदलले पाहिजेत. सामाजिक कायदे हे धर्माशी जोडू नये ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजे, असेही सय्यद मेहबूब म्हणाले.

हेही वाचा - नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

पुणे - सरकारने मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळामार्फत केलेल्या कामाची दखल घेत मला पोच पावती दिली, अशी प्रतिक्रिया पुण्यातील सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाई यांनी दिली. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया देताना पद्मश्री विजेते सय्यद मेहबूब


त्यांनी मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळ स्थापन करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून समाज नागरी हक्क कायदा व्हावा, तिहेरी तलाक पद्धत बंद व्हावी, महिलांनाही पुरुषांप्रमाणे सर्व अधिकार मिळावे, लग्न व घटस्फोट हे न्यायालयातच व्हावे, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्यास पुरुषांना मज्जाव असावा. यासाठी त्यांनी लढा दिला.

हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

ते म्हणाले, सध्या गोमांसच्या नवाने मुस्लिमांची प्रतिमा मलीन करण्याचे घातक कार्य काही बुद्धीजीवींकडून केले जात आहे. गोमांसच्या नावाने मॉब लिचिंग सारखे प्रकार देशात घडत असल्याने देशात असंतोषाची लाट पसरली आहे. हे देशात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. मुस्लीमही देशाचे नागरिक असून ते भूमीपुत्र आहेत. राष्ट्रवादासाठी ते कुठे कमी पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा - पुण्यातील ४ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत साकारला तिरंगा, पाहा व्हिडिओ

यावेळी ते सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याबाबत बोलताना म्हणाले, कोणाताही कायदा हा केवळ एकाच धर्माला लागू नसावा, तो सर्वांना समान करावा यासाठीच आम्ही समान नागरी हक्कची करत आहोत.पण, सीएए,एनआरसी व एनपीआर यात केवळ ठराविक समाजाला उद्देशले जात आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे योग्यच आहे. समाजाला विश्वासात घेऊन कायदे बदलले पाहिजेत. सामाजिक कायदे हे धर्माशी जोडू नये ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजे, असेही सय्यद मेहबूब म्हणाले.

हेही वाचा - नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

Intro:पुरस्कार मिळाल्यनंतर पुण्याच्या सय्यद भाई मेहबूब यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारनं माझ्या कामाची दखल घेतल्यान मला आनंद वाटला. मी मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळाचा संस्थापक सदस्य आहे. समाजात समान नागरी कायदा झाला पाहिजे, सर्व लग्न नोंदणी पद्धतीनं झाली पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. पती पत्नीच वाद न्यायालयात सोडवावे, पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करायला विरोध हवाय, त्याचबरोबर ट्रिपल तलाक रद्द केले हे योग्य असून तलाक देण्यापूर्वी तलाक योग की अयोग्य हे न्यायालयानं ठरवावं, महिलांना मुल दत्तक घेण्याचा कायदा असावा, अशी सत्यशोधक मंडळाची भूमिका आहे.

तर सीएए वर बोलताना हे तपासून पाहिले पाहिजे. मुस्लिमांची वंशपरंपरा पहिली जातीय. माञ फक्त मुस्लिमांची नव्हे तर सर्वांची वंशपरंपरा पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माझे पूर्वज हिंदू होते. इथ जमलेल्या मुसलमानाचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे ते बाहेरून कसे आले, असा सवाल त्यांनी केला.

या संदर्भात हुसेन दलवाई यांच्याबरोबर राज्यभरात प्रचार केला. त्यावेळी समाजात हा धार्मिक कायदा असल्यानं बदलता येणार नसल्याची भूमिका होती. माञ आम्ही ही महिलांवर अन्याय होत असल्याची भूमिका घेऊन पुण्याला परिषद घेतली होती. माञ काही संघटनांनी याला विरोध ही केला.

माञ सध्या म्हटलं वेगळे इमेज तयार केली जाते. गोमांसच्या नावानं इमेज तयार करणं हे घातक असून देशाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. काही लोक काही तरी खुसपट काढतात माञ तो डाग लागला जात असून हाणामाऱ्या होतात. देशात असंतोषाचे वातावरण तयार होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मुसलमान देशाचे नागरिक असून ते भूमीपुत्र आहेत. राष्ट्रवादासाठी ते कुठे कमी पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल थ्री सेवन हटवणे योग्यच आहे. समाजाला विश्वासात घेऊन कायदे बदलले पाहिजेत. समाजिक कायदे हे धर्माशी जोडू नये ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजे असं ही सय्यद भाई यांनी म्हटलंय.Body:।।Conclusion:।।
Last Updated : Jan 26, 2020, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.