ETV Bharat / state

लोकसभेत महाविकास आघाडी 40 ते 41 जागा जिंकणार - नाना पटोले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 8:20 PM IST

Nana Patole : यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात (Nana Patole Pune PC) महायुतीच्या 45 जागा आम्ही जिंकू असा विश्वास भाजपाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, आमचा जागा वाटपाच्या संदर्भात फार्मूला ठरलेला आहे, तो तयार देखील आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. राज्यात महाविकास आघाडी 40 ते 41 जागा जिंकणार आहे, असा विश्वास यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला. (Nana Patole On Central Govt)

Nana Patole
नाना पटोले
नाना पटोले राज्य आणि केंद्राच्या विविध प्रश्नांवर बोलताना

पुणे Nana Patole : पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाना पटोले म्हणाले की, सध्या राज्यात नव्हे तर देशात ट्रक ड्रायव्हरचं आंदोलन सुरू आहे. (MVA) हे आंदोलन फक्त ट्रक ड्रायव्हरचं नव्हे तर जे जे लोक वाहनं चालवतात त्यांच्यासाठी आहे. केंद्र सरकारनं हुकूमशाही पद्धतीनं खासदारांना निलंबित केलं आणि हा कायदा केला. या कायद्यात 7 लाख रु. दंड आणि 10 वर्ष शिक्षा आहे. आज अनेक लोक हे स्वतःची गाडी चालवतात. सरकारचं कायदा आणण्याचं उद्दिष्ट काय आहे. राज्य सरकार समृध्दी महामार्गाचा गौरव करतय, तर त्या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. समृध्दी मार्गामध्ये फॉल्ट आहे. त्यात केमिकल वापरण्यात आलं नाही. कारण ते महाग होतं. सरकारमध्ये बसलेल्या लोकांची समृध्दी झाली आहे आणि लोकांचा मृत्यू होत आहे, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली.


लोकशाही वाचली पाहिजे : नाना पटोले पुढे म्हणाले की, आज तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. पेपर फुट होत आहे. राजस्थान सरकारने जो कायदा केला होता तसा कायदा राज्यात करण्यात यावा. सरकार मुलांची चेष्टा करत आहे. त्यांना कुठेही नोकरी देणार नाही. अनेक मुलं-मुली रडत आहेत. पीएचडी करणाऱ्या मुलांच्या परीक्षा होत नाहीत. राज्याचे एक उपमुख्यमंत्री सांगत आहेत की, पीएचडी करून काय दिवे लावणार आहे? या राज्यात काय चाललं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अनेक लोक हे आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. आज राजस्थानमध्ये 450 रुपयाला सिलेंडर देण्यात आला आहे. राज्यात का देत नाहीत. सरकार कोणाच्या म्हणण्यावर काम करत आहे. मूठभर लोकांसाठी केंद्र सरकार काम करत आहे. आज देशात लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लढा देत आहोत.

माणूस मोठा की देव, कळत नाही : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या बाबतीत नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू होत आहे. मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा असणार आहे. हे वर्ष लोकशाही पर्वाचं आहे. यात सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. आमचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. ज्यांच्यात वाद नाही, ते काहीही बोलू शकतात. राज्यात महाविकास आघाडी 40 ते 41 जागा जिंकणार आहे असं यावेळी नाना पटोले म्हणाले. तसंच राम मंदिराच्या बाबतीत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, सरकार आज भगवान श्रीरामाने काँट्रॅक्ट दिल्या प्रमाणे निमंत्रण देत आहे. जे आज फोटो दिसत आहेत, त्यात भगवान श्रीराम यांना छोटेसे दाखवण्यात आलं आहे आणि पंतप्रधानांना मोठं दाखवत आहेत. आता राम मोठा की मोदी मोठे. माणूस मोठा आहे की देव मोठा हेच कळत नाही.

वंचितबाबत नाना पटोले स्पष्टच म्हणाले : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत नाना पटोले म्हणाले की, मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. वंचित बहुजन आघाडी बाबत नाना पटोले म्हणाले की, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. आपण बसू आणि चर्चा करू. आम्ही याबाबत दिल्लीत बसून निर्णय घेणार आहोत. आम्ही सकारात्मक आहोत. जे कोणी भाजपा बरोबर नसेल त्यांनी आमच्या बरोबर यावं असं आमचं म्हणणं आहे, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा:

  1. खोके सरकारला अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी काही नाही - उद्धव ठाकरे
  2. अल्पवयीन मुलीवर ऑनलाईन गेममध्ये बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल
  3. बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून 400 ग्राहकांची 1 कोटींची फसवणूक, संचालकाला अटक

नाना पटोले राज्य आणि केंद्राच्या विविध प्रश्नांवर बोलताना

पुणे Nana Patole : पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाना पटोले म्हणाले की, सध्या राज्यात नव्हे तर देशात ट्रक ड्रायव्हरचं आंदोलन सुरू आहे. (MVA) हे आंदोलन फक्त ट्रक ड्रायव्हरचं नव्हे तर जे जे लोक वाहनं चालवतात त्यांच्यासाठी आहे. केंद्र सरकारनं हुकूमशाही पद्धतीनं खासदारांना निलंबित केलं आणि हा कायदा केला. या कायद्यात 7 लाख रु. दंड आणि 10 वर्ष शिक्षा आहे. आज अनेक लोक हे स्वतःची गाडी चालवतात. सरकारचं कायदा आणण्याचं उद्दिष्ट काय आहे. राज्य सरकार समृध्दी महामार्गाचा गौरव करतय, तर त्या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. समृध्दी मार्गामध्ये फॉल्ट आहे. त्यात केमिकल वापरण्यात आलं नाही. कारण ते महाग होतं. सरकारमध्ये बसलेल्या लोकांची समृध्दी झाली आहे आणि लोकांचा मृत्यू होत आहे, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली.


लोकशाही वाचली पाहिजे : नाना पटोले पुढे म्हणाले की, आज तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. पेपर फुट होत आहे. राजस्थान सरकारने जो कायदा केला होता तसा कायदा राज्यात करण्यात यावा. सरकार मुलांची चेष्टा करत आहे. त्यांना कुठेही नोकरी देणार नाही. अनेक मुलं-मुली रडत आहेत. पीएचडी करणाऱ्या मुलांच्या परीक्षा होत नाहीत. राज्याचे एक उपमुख्यमंत्री सांगत आहेत की, पीएचडी करून काय दिवे लावणार आहे? या राज्यात काय चाललं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अनेक लोक हे आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. आज राजस्थानमध्ये 450 रुपयाला सिलेंडर देण्यात आला आहे. राज्यात का देत नाहीत. सरकार कोणाच्या म्हणण्यावर काम करत आहे. मूठभर लोकांसाठी केंद्र सरकार काम करत आहे. आज देशात लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लढा देत आहोत.

माणूस मोठा की देव, कळत नाही : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या बाबतीत नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू होत आहे. मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा असणार आहे. हे वर्ष लोकशाही पर्वाचं आहे. यात सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. आमचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. ज्यांच्यात वाद नाही, ते काहीही बोलू शकतात. राज्यात महाविकास आघाडी 40 ते 41 जागा जिंकणार आहे असं यावेळी नाना पटोले म्हणाले. तसंच राम मंदिराच्या बाबतीत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, सरकार आज भगवान श्रीरामाने काँट्रॅक्ट दिल्या प्रमाणे निमंत्रण देत आहे. जे आज फोटो दिसत आहेत, त्यात भगवान श्रीराम यांना छोटेसे दाखवण्यात आलं आहे आणि पंतप्रधानांना मोठं दाखवत आहेत. आता राम मोठा की मोदी मोठे. माणूस मोठा आहे की देव मोठा हेच कळत नाही.

वंचितबाबत नाना पटोले स्पष्टच म्हणाले : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत नाना पटोले म्हणाले की, मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. वंचित बहुजन आघाडी बाबत नाना पटोले म्हणाले की, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. आपण बसू आणि चर्चा करू. आम्ही याबाबत दिल्लीत बसून निर्णय घेणार आहोत. आम्ही सकारात्मक आहोत. जे कोणी भाजपा बरोबर नसेल त्यांनी आमच्या बरोबर यावं असं आमचं म्हणणं आहे, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा:

  1. खोके सरकारला अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी काही नाही - उद्धव ठाकरे
  2. अल्पवयीन मुलीवर ऑनलाईन गेममध्ये बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल
  3. बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून 400 ग्राहकांची 1 कोटींची फसवणूक, संचालकाला अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.