ETV Bharat / state

'केंद्र सरकारकडून राज्य सरकारने  गडकिल्ले आपल्या अखत्यारित घ्यावे'

author img

By

Published : Feb 19, 2020, 11:35 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिव जन्मोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विनायक मेटे येथे आले होते. यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारला बोलून त्यांच्या अखत्यारितील गड किल्ले राज्य सरकारच्या अखत्यारित आणावे, अशी विनंती मेटे यांनी राज्य सरकारला केली आहे.

vinayak mete on shivneri
आमदार विनायक मेटे

पुणे- राज्यातील अनेक किल्ले हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. या गडकिल्यावर राज्य सरकार किवा इतर संस्थांना काम करायचे असल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, केंद्र सरकर लवकर परवानगी देत नसल्याने गड किल्ल्यांची डागडुजी रखडली आहे, असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर केला आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार विनायक मेटे

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिव जन्मोत्सव साजरा होत आहे. यावेळी आमदार विनायक मेटे येथे आले होते. यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारला बोलून त्यांच्या अखत्यारितील गड किल्ले राज्य सरकारच्या अखत्यारित आणावे, अशी विनंती मेटे यांनी राज्या सरकारला केली. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हाणून तर अभिवादन करावेच त्याचबरोबर शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून देखील अभिवादन करावे. सोबत आपल्या कार्यकर्त्यांना देखील तारखेनुसारच अभिवादन करायला लावावे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा दोन भूमिका निभावत असताना त्यांनी महाराजांप्रती दुजाभाव ठेवू नये, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी दिली.

त्याचबरोबर, शिवस्मारकाबाबत बोलताना मेटे म्हणाले की, मागील ५ वर्षात शिवस्मारक बनू शकले नाही याची मला खंत आहे. या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालायाने फक्त तोंडी स्थगिती दिली आहे. मात्र, तोंडी स्थगितीवरच शिवस्मारकाचे काम रखडले आहे. हा देशातील पहिलाच प्रकार असावा. राज्यातील काही लोकांना शिवस्मारक नको आहे. यासाठी ते उचापती करत आहे. मात्र, उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे. उद्या शिवस्मारकावरील सुनावणी उठल्यास शिवस्मारकाचे काम सुरू होण्यास अडचण येणार नाही, असेही आमदार विनायक मेटे म्हणाले.

हेही वाचा- बारामतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकतर्फी प्रेमातून केले गैरवर्तन

पुणे- राज्यातील अनेक किल्ले हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. या गडकिल्यावर राज्य सरकार किवा इतर संस्थांना काम करायचे असल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, केंद्र सरकर लवकर परवानगी देत नसल्याने गड किल्ल्यांची डागडुजी रखडली आहे, असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर केला आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार विनायक मेटे

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिव जन्मोत्सव साजरा होत आहे. यावेळी आमदार विनायक मेटे येथे आले होते. यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारला बोलून त्यांच्या अखत्यारितील गड किल्ले राज्य सरकारच्या अखत्यारित आणावे, अशी विनंती मेटे यांनी राज्या सरकारला केली. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हाणून तर अभिवादन करावेच त्याचबरोबर शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून देखील अभिवादन करावे. सोबत आपल्या कार्यकर्त्यांना देखील तारखेनुसारच अभिवादन करायला लावावे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा दोन भूमिका निभावत असताना त्यांनी महाराजांप्रती दुजाभाव ठेवू नये, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी दिली.

त्याचबरोबर, शिवस्मारकाबाबत बोलताना मेटे म्हणाले की, मागील ५ वर्षात शिवस्मारक बनू शकले नाही याची मला खंत आहे. या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालायाने फक्त तोंडी स्थगिती दिली आहे. मात्र, तोंडी स्थगितीवरच शिवस्मारकाचे काम रखडले आहे. हा देशातील पहिलाच प्रकार असावा. राज्यातील काही लोकांना शिवस्मारक नको आहे. यासाठी ते उचापती करत आहे. मात्र, उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे. उद्या शिवस्मारकावरील सुनावणी उठल्यास शिवस्मारकाचे काम सुरू होण्यास अडचण येणार नाही, असेही आमदार विनायक मेटे म्हणाले.

हेही वाचा- बारामतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकतर्फी प्रेमातून केले गैरवर्तन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.