ETV Bharat / state

"देव तारी त्याला कोण मारी"; देवाच्या आळंदीत इंद्रायणीच्या पाण्यात वारकरी रात्रभर राहूनही वाचला...

संजय इंद्रायणीच्या पुरात वाहून गेले होते. मात्र, नदीच्या घाटावरील समाधीला अडकून बसल्याने त्यांचा जीव वाचला.

author img

By

Published : Jul 28, 2019, 12:55 PM IST

संजय कांदरकर यांचे छायाचित्र

पुणे- इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रात्रीच्या सुमाराम एक भाविक वाहून गेल्याची घटना घडली होती. मात्र "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा या घटनेतून प्रत्यय आला. पाण्यात वाहून गेलेला व्यक्ती रात्रभर घाटावर असणाऱ्या एका समाधीला अडकून पाण्यातच बसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले.

संजय कांदरकर यांच्या सोबत स्थानिक

संजय कांदरकर असे पुरात वहालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माऊलींच्या दारात भक्ताला भीती नाही, असे प्रत्येक वारकरी सांगत असतात. त्याचे उत्तम उदाहरण आज लोकांपूढे आले. संजय इंद्रायणीच्या पुरात वाहून गेले होते. मात्र, नदीच्या घाटावरील समाधीला अडकून बसल्याने त्यांचा जीव वाचला. यावेळी घटनेत बचावलेल्या संजय कांदरकर यांनी ही माऊलींची कृपा असल्याचे सांगत जीव वाचविल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले.

देवाच्या आळंदीत आषाढी वारीवरुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरवरुन आळंदी नगरीत दाखल होते. यावेळी वारकरी देवाच्या नगरीत माऊलींच्या स्वागतासाठी येत असतात. मात्र दोन दिवसांपासून इंद्रायणी नदीला महापूर आल्याने वारकरी व भाविकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

पुणे- इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रात्रीच्या सुमाराम एक भाविक वाहून गेल्याची घटना घडली होती. मात्र "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा या घटनेतून प्रत्यय आला. पाण्यात वाहून गेलेला व्यक्ती रात्रभर घाटावर असणाऱ्या एका समाधीला अडकून पाण्यातच बसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले.

संजय कांदरकर यांच्या सोबत स्थानिक

संजय कांदरकर असे पुरात वहालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माऊलींच्या दारात भक्ताला भीती नाही, असे प्रत्येक वारकरी सांगत असतात. त्याचे उत्तम उदाहरण आज लोकांपूढे आले. संजय इंद्रायणीच्या पुरात वाहून गेले होते. मात्र, नदीच्या घाटावरील समाधीला अडकून बसल्याने त्यांचा जीव वाचला. यावेळी घटनेत बचावलेल्या संजय कांदरकर यांनी ही माऊलींची कृपा असल्याचे सांगत जीव वाचविल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले.

देवाच्या आळंदीत आषाढी वारीवरुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरवरुन आळंदी नगरीत दाखल होते. यावेळी वारकरी देवाच्या नगरीत माऊलींच्या स्वागतासाठी येत असतात. मात्र दोन दिवसांपासून इंद्रायणी नदीला महापूर आल्याने वारकरी व भाविकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Intro:Anc_इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रात्रीच्या सुमाराम एक भाविक वाहुन गेल्याची घटना घडली होती मात्र "देव तारी त्याला कोन मारी" या म्हणीप्रमाणे इंद्रायणीच्या पाण्यात वाहुन गेलेला व्यक्ती घाटावर असणा-या एका समाधीला अडकुन रात्रीभर पाण्यातच बसला असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले आहे संजय कांदरकर असे पाण्यात पडलेल्या व्यक्तीचे नाव.

माऊलींच्या दारात भक्ताला भिती नाही असं प्रत्येक वारकरी सांगत असतात त्याचं उत्तम उदाहरण आज इंद्रायणीला आलेल्या महापुरात संजय कांदरकर वाहुन जात असताना नदीच्या घाटावरील समाधीला अडकुन बसल्याने जीव वाचला ही माऊलींजी कृपा आहे असे म्हणत संजय कांदरकर यांनी स्थानिकांचे आभार मानले .


देवाच्या आळंदीत आषाढी वारीवरुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपुरवरुन आळंदी नगरीत दाखल होत असताना वारकरी देवाच्या नगरीत माऊलींच्या स्वागतासाठी येत असतात मात्र दोन दिवसांपासुन इंद्रायणी नदीला महापुर आल्याने वारकरी व भाविकांसमोर मोठं संकट उभं आहेBody:.. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.