ETV Bharat / state

पुण्यातील कडुस येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा

बिबट्याचा खेड तालुक्यातील वावर वाढल्याने नागरिकांसह चिमुकली मुले आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

author img

By

Published : May 7, 2019, 12:13 PM IST

बिबट्याने फडशा पाडलेला कुत्रा

पुणे - गेल्या अनेक दिवसापासून खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारासदेखील कडुस येथील आगारमाथा वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजगुरुनगरचा वनविभाग

बिबट्याचा खेड तालुक्यातील वावर वाढल्याने नागरिकांसह चिमुकली मुले आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी बिबट्याने सातकरस्थळ येथे पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. तसेच त्याचा सांगाडा झाडावर ठेवला होता. तेव्हापासून परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून वनविभाग कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

पुणे - गेल्या अनेक दिवसापासून खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारासदेखील कडुस येथील आगारमाथा वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजगुरुनगरचा वनविभाग

बिबट्याचा खेड तालुक्यातील वावर वाढल्याने नागरिकांसह चिमुकली मुले आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी बिबट्याने सातकरस्थळ येथे पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. तसेच त्याचा सांगाडा झाडावर ठेवला होता. तेव्हापासून परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून वनविभाग कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

Intro:Anc__गेल्या अनेक दिवसांपासुन खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली असुन आज रात्रीच्या सुमारास कडुस येथील आगारमाथावर बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करुन कुत्र्याचा फडशा पाडला असल्याची घटना घडली असुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील पंधरा दिवसांपुर्वी बिबट्याने सातकरस्थळ येथे पाळीव कुत्र्याची शिकार करुन झाडावर शिकार ठेवल्याची घटना घडली होती तेव्हापासुनच या परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली असुन वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी असतानाही याकडे दुर्लक्ष होत असुन वनविभाग कर्मचारी बघ्याची भुमिका घेत असल्याचे चित्र आहे

बिबट्याचा खेड तालुक्यातील वावर वाढल्याने नागरिकांसह चिमुकली मुले ,पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असुन वनविभागाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे..Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.