ETV Bharat / state

शेतकऱ्यानंतर आता कामगारावरही आत्महत्येची वेळ - मारुती भापकर

सरकारने वेळीच कामगारांवरील होणारे अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा तुम्हालाही सत्तेवरुन पायउतार व्हावे लागणार असल्याची टीका भापकर यांनी केली.

author img

By

Published : Feb 17, 2019, 11:15 PM IST

कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

पुणे - शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगारांनी आपल्यावर होत असलेले अन्यायावर चिंता व्यक्त केली. प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे ते आत्महत्येला प्रवृत्त होत असल्याचा आरोप कामगार नेते मारुती भापकर यांनी केला.


कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
शिरुर आणि खेड तालुक्यात रांजणगाव आणि चाकण अशा दोन ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत उभी राहिली आहेत. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, याच स्थानिक तरुणांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. तसेच, या कामगारांवर अन्याय करून त्यांना कामावरून बडतर्फ केले जात आहे. विविध प्रकरणातून कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप मेळाव्यात कामगार नेत्यांनी केला.
undefined

कामगारांना कामावरून काढल्यानंतर कामगाराचे कुटुंब मोठ्या संकटात सापडते. त्याचे कुटूंब महागाईच्या काळात बेघर होते. अशावेळी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. याचा कंपनी व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. कामगारांवरील अन्याय रोखण्यासाठी कामगारांनी एक होण्याची गरज आहे, अशी आवाहन कामगार नेते मारुती भापकर यांनी यावेळी केले.

सध्याच्या मोठ्या प्रमाणात कामगारांचे शोषण होत असून हे भाजप सरकार हे भांडवलदार उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करत आहे. पुर्वी शेतकरी आत्महत्या करत होते. आता कामगार आत्महत्या करायला लागला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच कामगारांवरील होणारे अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा तुम्हालाही सत्तेवरुन पायउतार व्हावे लागणार असल्याची टीका भापकर यांनी केली.

पुणे - शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगारांनी आपल्यावर होत असलेले अन्यायावर चिंता व्यक्त केली. प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे ते आत्महत्येला प्रवृत्त होत असल्याचा आरोप कामगार नेते मारुती भापकर यांनी केला.


कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
शिरुर आणि खेड तालुक्यात रांजणगाव आणि चाकण अशा दोन ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत उभी राहिली आहेत. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, याच स्थानिक तरुणांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. तसेच, या कामगारांवर अन्याय करून त्यांना कामावरून बडतर्फ केले जात आहे. विविध प्रकरणातून कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप मेळाव्यात कामगार नेत्यांनी केला.
undefined

कामगारांना कामावरून काढल्यानंतर कामगाराचे कुटुंब मोठ्या संकटात सापडते. त्याचे कुटूंब महागाईच्या काळात बेघर होते. अशावेळी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. याचा कंपनी व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. कामगारांवरील अन्याय रोखण्यासाठी कामगारांनी एक होण्याची गरज आहे, अशी आवाहन कामगार नेते मारुती भापकर यांनी यावेळी केले.

सध्याच्या मोठ्या प्रमाणात कामगारांचे शोषण होत असून हे भाजप सरकार हे भांडवलदार उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करत आहे. पुर्वी शेतकरी आत्महत्या करत होते. आता कामगार आत्महत्या करायला लागला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच कामगारांवरील होणारे अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा तुम्हालाही सत्तेवरुन पायउतार व्हावे लागणार असल्याची टीका भापकर यांनी केली.

Intro:Anc__शिरुर व खेड तालुक्यात रांजणगाव, व चाकण अशा दोन ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत उभी राहिली आहे यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या मात्र याच स्थानिक शेतकऱ्यांच्या तरुणांना नोक-या दिल्या जात नाही तर दुसरीकडे कामगारांवर अन्याय करुन त्यांना कामावरुन बडतर्फ केलं जाते अशी चिंता आज कामगार मेळाव्यात कामगारांनी व्यक्त केली

Vo__शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कामगार मेळाव्यात हजारोंच्या संख्येने कंपनी कामगार उपस्थित होते. यावेळी कामगारांनी आपल्यावर होत असलेले अन्याय,हक्कासाठी लढा दिलं तर कामावरुन बडतर्फ केलं जात आहे अशा विविध प्रकरातुन कामगारांना वेटीस धरले जाते हा कामगारांवर अन्याय असल्याचे कामगार सांगत आहे

Byte: राजेंद्र देकर(कामगार)

Byte: प्रियंका खोत. :- कामगार मुलगी

Vo__कामगारांना कामावरून काढल्या नंतर कामगाराचे कुटूंब मोठ्या संकटात सापडते त्याचे कुटूंब महागाईच्या काळात बेघर होते असे मत त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो याचा हि कंपनी व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे.कामगारांवरील अन्याय रोखण्यासाठी कामगारांनी एक होण्याची गरज आहे. सध्याच्या पुर्वीच्या आघाडी सरकारच्या काळापेक्षाही जास्त प्रमाणात कामगारांचे शोषन होत असुन हे भाजप सरकार हे भांडवलदार उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करत आहे पुर्वी शेतकरी आत्महत्या करत होते आता कामगार आत्महत्या करायला लागला त्यामुळे सरकारने वेळीच कामगारांवरील होणारे अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा तुम्हालाही सत्तेवरुन पायउतार व्हावे लागणार असल्याची टिका कामगारनेते मारुती भापकर यांनी कामगार मेळाव्यात केली

Byte:मारूती भापकर :- कामगार नेते

End vo__कामगार आपल्या कष्टातुन प्रामाणिकपणे काम करत असताना त्याच्यावर होणारे अन्याय कुठंतरी त्याला आत्महत्येला प्रवृत्त करत असल्याच्या भावना आता कामगार व्यक्त करु लागले आहे त्यामुळे आता तरी या भांडवलदारांनी हि दडपशी थांबली पाहिजे. Body:Byte __03Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.