ETV Bharat / state

लाडक्या बैलाच्या मृत्यूनंतर समाधी बांधून केला दशक्रिया विधी; 'खंड्या'ला अखेरचा निरोप देताना जाधव कुटुंबाला अश्रू अनावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 4:29 PM IST

Dashakriya Rituals Of Bull : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एका शेतकऱ्यानं आपल्या जीवाभावाच्या बैलाला (खंड्या) त्याच्या मृत्यूनंतर अनोख्या पद्धतीनं अखेरचा निरोप दिला. (Tomb of Bull) बैलगाडा शर्यतीत रुबाबदार असणाऱ्या खंड्याला (Bull named Khandya) भावपूर्ण निरोप देत घरासमोर त्याची समाधी उभारली आहे. एवढचं नाही तर त्याचा दशक्रिया विधीही केला. ज्यामध्ये गावकऱ्यांनी हजेरी लावली.

Dashakriya Rituals Of Bull
जाधव कुटुंबाला अश्रू अनावर
लाडक्या खंड्याविषयी संवेदना व्यक्त करताना राहुल जाधव

मावळ (पुणे) Dashakriya Rituals Of Bull : मावळ तालुक्यातील नाणोली गावात जाधव परिवारात खंड्या नावाचा बैल गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी दाखल झाला. जाधव कुटुंबीयांनी आपल्या मुलाप्रमाणं खंड्याचा सांभाळ करून मोठा केला. (Maval Taluka) गेली अनेक वर्षे त्यानं बैलगाडा शर्यतीत आपला आणि मालकाचा नावलौकीक केला. अनेक पुरस्कार मिळवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानं शर्यतीत कामी येणारे हे बैल बिनकामी झाले होते. परंतु, तरीही जाधव कुटुंबीयांनी अशा बैलांना सोडून न देता त्यांचं संगोपन सुरू ठेवलं. अनेक वर्षांत शर्यतीत उतरला नसल्यानं खंड्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं होतं. खंड्या या बैलानं बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमी अव्वल स्थान प्राप्त करून 'घाटाचा राजा' हा मान मिळून दिला आहे आणि सर्वांचीच मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. (Jadhav Family)


अन् मालक ढसाढसा रडायला लागले : अचानक 7 जानेवारी रोजी या खंड्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मालक गोठ्यामध्ये खंड्याला चारा देण्यासाठी आले. तो मृत अवस्थेत पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली अन् मालक ढसाढसा रडायला लागले. त्यानंतर घरातील प्रत्येकानं अगदी कुटुंबामधील सदस्याप्रमाणे खंड्याला भावपूर्ण निरोप दिला आणि घराबाहेरच त्याचा अंत्यविधी करून समाधी बनविण्यात आली. त्याचबरोबर घरातल्या सदस्याप्रमाणं त्याचा आज 17 जानेवारी रोजी नाणोली गावात दशक्रिया विधी पार पडला. यावेळी शोकसभा आणि प्रवचन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

8 महिन्यांचा असताना केला होता खरेदी : खंड्याला भावपूर्ण निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याच्या आठवणीत अनेक जन दशक्रिया विधीला आले आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली. मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्यानं त्याच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे. जाधव कुटुंबीयांनी 8 महिन्याचा असताना खंड्या हा बैल अंकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर 5 वर्ष त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे.

पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती : बैलगाडा शर्यतीत खंड्यानं अनेक विक्रम केले. तर रांजणगाव, लोहगाव, चऱ्होली, सारख्या 65 हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या. तसंच महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणून नाव लौकिक मिळवला होता. या बैलानं केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर जाधव कुटुंबीयांनं आपल्या घराशेजारीच त्याचा दफन विधी केली. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

बैलगाडा शर्यतीत मिळवून दिले पुरस्कार : जाधव कुटुंबीयांनी खंड्याला एखाद्या मुलाप्रमाणं जोपासलं, त्याचा सांभाळ केला. खंड्यानं बैलगाडा शर्यत असो किंवा शेतात शेती कसायला जोतला असता त्यानं कधीच मान खाली जाऊ दिली नाही. बैलगाडा शर्यतीत अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्याचबरोबर त्यानं 'घाटाचा राजा' हा मान जाधव कुटुंबीयांना मिळवून दिला; मात्र अचानक त्याच्या जाण्यानं सर्वत्र शोक पसरला असून तो पुन्हा कोणत्यातरी रूपानं आमच्या घरात यावा अशा भावना माजी महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

  1. पंजाबमध्ये धुक्याचा कहर! रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसची धडक ; चार पोलिसांचा मृत्यू
  2. 'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे
  3. शिंदे गटाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; 'हे' दिले महत्त्वाचे निर्देश

लाडक्या खंड्याविषयी संवेदना व्यक्त करताना राहुल जाधव

मावळ (पुणे) Dashakriya Rituals Of Bull : मावळ तालुक्यातील नाणोली गावात जाधव परिवारात खंड्या नावाचा बैल गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी दाखल झाला. जाधव कुटुंबीयांनी आपल्या मुलाप्रमाणं खंड्याचा सांभाळ करून मोठा केला. (Maval Taluka) गेली अनेक वर्षे त्यानं बैलगाडा शर्यतीत आपला आणि मालकाचा नावलौकीक केला. अनेक पुरस्कार मिळवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानं शर्यतीत कामी येणारे हे बैल बिनकामी झाले होते. परंतु, तरीही जाधव कुटुंबीयांनी अशा बैलांना सोडून न देता त्यांचं संगोपन सुरू ठेवलं. अनेक वर्षांत शर्यतीत उतरला नसल्यानं खंड्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं होतं. खंड्या या बैलानं बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमी अव्वल स्थान प्राप्त करून 'घाटाचा राजा' हा मान मिळून दिला आहे आणि सर्वांचीच मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. (Jadhav Family)


अन् मालक ढसाढसा रडायला लागले : अचानक 7 जानेवारी रोजी या खंड्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मालक गोठ्यामध्ये खंड्याला चारा देण्यासाठी आले. तो मृत अवस्थेत पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली अन् मालक ढसाढसा रडायला लागले. त्यानंतर घरातील प्रत्येकानं अगदी कुटुंबामधील सदस्याप्रमाणे खंड्याला भावपूर्ण निरोप दिला आणि घराबाहेरच त्याचा अंत्यविधी करून समाधी बनविण्यात आली. त्याचबरोबर घरातल्या सदस्याप्रमाणं त्याचा आज 17 जानेवारी रोजी नाणोली गावात दशक्रिया विधी पार पडला. यावेळी शोकसभा आणि प्रवचन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

8 महिन्यांचा असताना केला होता खरेदी : खंड्याला भावपूर्ण निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याच्या आठवणीत अनेक जन दशक्रिया विधीला आले आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली. मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्यानं त्याच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे. जाधव कुटुंबीयांनी 8 महिन्याचा असताना खंड्या हा बैल अंकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर 5 वर्ष त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे.

पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती : बैलगाडा शर्यतीत खंड्यानं अनेक विक्रम केले. तर रांजणगाव, लोहगाव, चऱ्होली, सारख्या 65 हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या. तसंच महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणून नाव लौकिक मिळवला होता. या बैलानं केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर जाधव कुटुंबीयांनं आपल्या घराशेजारीच त्याचा दफन विधी केली. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

बैलगाडा शर्यतीत मिळवून दिले पुरस्कार : जाधव कुटुंबीयांनी खंड्याला एखाद्या मुलाप्रमाणं जोपासलं, त्याचा सांभाळ केला. खंड्यानं बैलगाडा शर्यत असो किंवा शेतात शेती कसायला जोतला असता त्यानं कधीच मान खाली जाऊ दिली नाही. बैलगाडा शर्यतीत अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्याचबरोबर त्यानं 'घाटाचा राजा' हा मान जाधव कुटुंबीयांना मिळवून दिला; मात्र अचानक त्याच्या जाण्यानं सर्वत्र शोक पसरला असून तो पुन्हा कोणत्यातरी रूपानं आमच्या घरात यावा अशा भावना माजी महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

  1. पंजाबमध्ये धुक्याचा कहर! रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसची धडक ; चार पोलिसांचा मृत्यू
  2. 'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे
  3. शिंदे गटाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; 'हे' दिले महत्त्वाचे निर्देश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.