पुणे : भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. राज्य आणि देशभरातून हजारो लोक येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. २०१८ साली काही कारणांमुळे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले (Vivek Bhai Chavan criticized Ajay Sengar) होते. त्यानंतर झालेले शौर्य दिन शांततेत पार पडले आहेत. मात्र यावर्षी पुन्हा एकदा वाद निर्माण होताना दिसत आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी केलेल्या एका मागणीमुळे वादाला तोंड फुटले आहे. यावर दलीत कोर्ब्राचे अध्यक्ष विवेक चव्हाण यांनी (Dalit Korbra President Vivek Bhai Chavan) सर्व भीम अनुयायी यांना आवाहन केले आहे की, त्यांनी याकडे दुर्लक्ष करून आपला कार्यक्रम शांततेत पार पाडावा.
विविध स्तरातून टिका : अजय सेंगर यांनी एक वक्तव्य केले आहे (statement over Bhima Koregaon Valor Day) की, इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा शौर्य दिन कसा काय साजरा होऊ शकतो ? आम्ही मागणी करत आहोत की, गद्दारांचा शौर्य दिन साजरा होऊ नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत की, राज्य सरकारने बुलडोझर लावून पाडून टाकावा. ही जातीय लढाई नव्हती. ही इंग्रजांविरोधात केलेली लढाई होती. याला जातीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी देशातील समस्त हिंदू, बौद्ध यांना केली आहे. हिंदू-बौद्ध एकतेसाठी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या १ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी, असे वक्तव्य सेंगर यांनी केल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टिका होत (Ajay Sengar contravesial statement) आहे. पण या शौर्य दिनावर आणि त्या दिवशी होणाऱ्या शासकीय कामांवर बंदी घालावी, तेथील विजय स्तंभ काढून टाकावा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी केली आहे.
अभिवादनाचा कार्यक्रम : यावर भाई चव्हाण म्हणाले की, अजय सेंगर यांनी याआधी देखील विजय स्तंभ आणि माझ्यावर चुकीचे वक्तव्य केले (Ajay Sengar contravesial statement) आहे. पुन्हा त्यांनी चुकीचे वक्तव्य करून 1 जानेवारीच्या कार्यक्रमात गोंधळ घालून या राज्यातील कायदा व संस्था बिघडवण्याचे प्रयत्न करत आहे. माझी सर्व आंबेडकरी जनतेने या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपला कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने होईल, हे लक्ष द्यावे. कोणीही आक्रमक न होता शांततेत विजयस्तंभ येथे येऊन अभिवादनाचा कार्यक्रम पार पाडावा, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले (Vivek Bhai Chavan criticized Ajay Sengar) आहे.