ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळाचा फळबागांना तडाखा; डाळिंब अन् केळीच्या बागा भुईसपाट - cyclone nisarga Damage to orchards

चक्रीवादळामुळे जुन्नरमधील ओतूर, खामूंडी, आळेफाटा परिसरातील डाळिंब व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेली पीक भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकरी
शेतकरी
author img

By

Published : Jun 5, 2020, 1:17 PM IST

पुणे - चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. जुन्नरमधील ओतूर, खामूंडी, आळेफाटा परिसरातील डाळिंब व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे काढणीला आलेली केळी व डाळींब गळुन पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे केळी व डाळिंबावर रोगराई पसरली होती. यामुळे केळी व डाळिंबाचे गाळप 50 ट्क्यांनी घटले.

फळबागांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुणे - चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. जुन्नरमधील ओतूर, खामूंडी, आळेफाटा परिसरातील डाळिंब व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे काढणीला आलेली केळी व डाळींब गळुन पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे केळी व डाळिंबावर रोगराई पसरली होती. यामुळे केळी व डाळिंबाचे गाळप 50 ट्क्यांनी घटले.

फळबागांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.