ETV Bharat / state

'तोंडात येईल ते बोलून चालत नाही'

author img

By

Published : Jan 16, 2020, 9:48 PM IST

महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून जय भगवान गोयलच्या पुस्तकावरून वाद सुरू आहे. या प्रकरणाला हळूहळू वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणही मलीन झाले आहे. या सर्व प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

पुणे - छत्रपतींच्या घराण्याबाबत काय पुरावे द्यायचे? तोंडात येईल ते बोलून चालत नाही, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती तुळापूर येथे आले होते.

महाराष्ट्रातील वातावरण मलीन झाल्याने अस्वस्थ झालो


महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून जय भगवान गोयलच्या पुस्तकावरून वाद सुरू आहे. या प्रकरणाला हळूहळू वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणही मलीन झाले आहे. या सर्व प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

हेही वाचा - राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचे राज्यभरात पडसाद; उदयनराजे समर्थक रस्त्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरूबद्दल केलेल्या वक्तव्याचे संभाजीराजे यांनी समर्थन केले आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराराजांचे गुरू नसून महाराजांचे खरे गुरू हे तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊच आहेत, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी लाखो शंभू भक्तांनी तुळापूर येथे गुरुवारी सकाळपासून गर्दी केली होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, आमदार सिद्दार्थ शिरोळे, आमदार अशोक पवार हे या सोहळ्याला उपस्थित होते.

पुणे - छत्रपतींच्या घराण्याबाबत काय पुरावे द्यायचे? तोंडात येईल ते बोलून चालत नाही, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती तुळापूर येथे आले होते.

महाराष्ट्रातील वातावरण मलीन झाल्याने अस्वस्थ झालो


महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून जय भगवान गोयलच्या पुस्तकावरून वाद सुरू आहे. या प्रकरणाला हळूहळू वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणही मलीन झाले आहे. या सर्व प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

हेही वाचा - राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचे राज्यभरात पडसाद; उदयनराजे समर्थक रस्त्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरूबद्दल केलेल्या वक्तव्याचे संभाजीराजे यांनी समर्थन केले आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराराजांचे गुरू नसून महाराजांचे खरे गुरू हे तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊच आहेत, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी लाखो शंभू भक्तांनी तुळापूर येथे गुरुवारी सकाळपासून गर्दी केली होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, आमदार सिद्दार्थ शिरोळे, आमदार अशोक पवार हे या सोहळ्याला उपस्थित होते.

Intro:Anc: छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आज महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूर येथे संपन्न झाला राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शंभू भक्तांनी तुळापूर येथे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.या राज्याभिषेक सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले,अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,सत्यजीत तांबे, आमदार सिद्दार्थ शिरोळे यांच्या सह स्थानिक आमदार अशोक पवार उपस्थित होते.

Vo_ यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी महाराष्ट्रात गेली आठवडाभरा पासून पुस्तकावरुन सुरु झालेल्या वादंगावर बोलताना मी या सर्व प्रकरणावर अस्वस्थ झालोय त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण हे मलीन झाले आहे...

Byte_छत्रपती संभाजीराजे भोसले_खासदार

Vo__या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू बद्दल केलेल्या वक्तव्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पवारांच्या वक्तव्याचे समर्थन करत रामदास स्वामी हे शिवाजी महाराराजांचे गुरू असूच शकत नसून महाराजांचे खरे गुरू हे तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊ ह्याच असल्याचे विधान केले आहे.

Byte__छत्रपती संभाजीराजे भोसले_खासदार

Vo_तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागितलेल्या छत्रपती घराण्याच्या पुराव्या बद्दल बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी छत्रपतींच्या घराण्याबाबत काय पुरावे द्यायचे तोंडात येईल ते काहीही बोलून चालत नसल्याचे विधान खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी छत्रपती संभाजी महारारांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळापूर येथे आले असताना माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे.

Byte_छत्रपती संभाजीराजे भोसले_खासदारBody:...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.