ETV Bharat / state

'अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यानंतर सरकारला जाग येणार?'

author img

By

Published : Sep 24, 2020, 10:29 PM IST

संपूर्ण राज्यात कोविड केअर केंद्रांमध्ये आतापर्यंत 12 विनयभंगाच्या तर दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कोविड केअर केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांसाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात त्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. पण, सरकार याविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

चित्रा वाघ
चित्रा वाघ

पुणे - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विलगीकरण केंद्रांमध्ये महिला सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. अजून किती महिलांवर विलगीकरण केंद्रांमध्ये अत्याचार झाल्यावर सरकार नियमावली जाहीर करणार आहे? असा प्रश्न भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'मधून प्रिया गायकवाड ही तरुणी गायब झाल्याचा आरोप करत तिचे आई-वडील उपोषणाला बसले आहेत. या मुद्द्यावर वाघ यांनी त्यांची भेट घेतली.

माहिती देताना चित्रा वाघ

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्याच्या वेगवेगळ्या कोविड केअर केंद्रांमध्ये दाखल झालेल्या कोरोनाबाधित महिलांना कशाप्रकारे हाताळले जाते, त्याचे हे उदाहरण आहे. पुण्यातील ही पहिलीच घटना नाही, याआधी अशा प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. संपूर्ण राज्यात कोविड केअर केंद्रांमध्ये आतापर्यंत 12 विनयभंगाच्या तर दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कोविड केअर केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांसाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात त्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. परंतु, त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा किती घटना घडल्यानंतर सरकारला जाग येईल? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - भिवंडी इमारत दुर्घटना : १० तास ढिगाऱ्याखाली अडकून डोळ्यांनी पाहिला मृत्यू, मात्र...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी ही त्यांची जबाबदारी आहे. महिलांची 50 टक्के लोकसंख्या असलेल्या राज्यातील ही अवस्था आहे. रुग्ण म्हणून येणाऱ्या महिलांसोबत असे प्रकार होत असतील तर या सर्व गोष्टींचा धिक्कार आहे. सरकारला महिलांना संरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात येऊच नये, असे जाहीर करावे असे आव्हान चित्रा वाघ यांनी सरकारला केले.

पुणे - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विलगीकरण केंद्रांमध्ये महिला सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. अजून किती महिलांवर विलगीकरण केंद्रांमध्ये अत्याचार झाल्यावर सरकार नियमावली जाहीर करणार आहे? असा प्रश्न भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'मधून प्रिया गायकवाड ही तरुणी गायब झाल्याचा आरोप करत तिचे आई-वडील उपोषणाला बसले आहेत. या मुद्द्यावर वाघ यांनी त्यांची भेट घेतली.

माहिती देताना चित्रा वाघ

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्याच्या वेगवेगळ्या कोविड केअर केंद्रांमध्ये दाखल झालेल्या कोरोनाबाधित महिलांना कशाप्रकारे हाताळले जाते, त्याचे हे उदाहरण आहे. पुण्यातील ही पहिलीच घटना नाही, याआधी अशा प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. संपूर्ण राज्यात कोविड केअर केंद्रांमध्ये आतापर्यंत 12 विनयभंगाच्या तर दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कोविड केअर केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांसाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात त्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. परंतु, त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा किती घटना घडल्यानंतर सरकारला जाग येईल? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - भिवंडी इमारत दुर्घटना : १० तास ढिगाऱ्याखाली अडकून डोळ्यांनी पाहिला मृत्यू, मात्र...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी ही त्यांची जबाबदारी आहे. महिलांची 50 टक्के लोकसंख्या असलेल्या राज्यातील ही अवस्था आहे. रुग्ण म्हणून येणाऱ्या महिलांसोबत असे प्रकार होत असतील तर या सर्व गोष्टींचा धिक्कार आहे. सरकारला महिलांना संरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात येऊच नये, असे जाहीर करावे असे आव्हान चित्रा वाघ यांनी सरकारला केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.