ETV Bharat / state

'मनसेने अमराठी भाषिकांबद्दलची भूमिका बदलल्यास त्यावर नेतृत्व निर्णय घेईल'

author img

By

Published : Jan 16, 2020, 5:52 PM IST

मनसेच्याबाबतीमध्ये भाजपच्या नेत्यांनी बसून विचार करायचा आहे. मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला त्यांची अमराठी भाषिकांच्या बद्दलची भूमिका आहे, ती स्वाभाविकपणे त्यांना बदलावी लागेल.

chandrakant patil (bjp state president, maharashtra)
चंद्रकांत पाटील (भाजप, प्रदेशाध्यक्ष)

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी त्यांच्या अमराठी भाषिकांबद्दल भूमिका बदलली, तर त्यावर पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आज (गुरुवारी) चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

चंद्रकांत पाटील (भाजप, प्रदेशाध्यक्ष)

मनसेच्या बाबतीमध्ये भाजपच्या नेत्यांनी बसून विचार करायचा आहे. मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. अमराठी भाषिकांच्या बद्दलची मनसेची भूमिका त्यांना स्वाभाविकपणे बदलावी लागेल. 80 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाल्यानंतर 20 टक्के व्यक्तींमध्ये अमराठी येणार की नाही? अमराठी कुठल्यातरी पाकिस्तान आणि बांगलादेश मधले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. ही भूमिका जर त्यांनी बदलली तर आमचे नेतृत्व बसून निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी त्यांच्या अमराठी भाषिकांबद्दल भूमिका बदलली, तर त्यावर पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आज (गुरुवारी) चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

चंद्रकांत पाटील (भाजप, प्रदेशाध्यक्ष)

मनसेच्या बाबतीमध्ये भाजपच्या नेत्यांनी बसून विचार करायचा आहे. मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. अमराठी भाषिकांच्या बद्दलची मनसेची भूमिका त्यांना स्वाभाविकपणे बदलावी लागेल. 80 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाल्यानंतर 20 टक्के व्यक्तींमध्ये अमराठी येणार की नाही? अमराठी कुठल्यातरी पाकिस्तान आणि बांगलादेश मधले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. ही भूमिका जर त्यांनी बदलली तर आमचे नेतृत्व बसून निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध

Intro:mh_pun_01_avb_mns_mhc10002Body:mh_pun_01_avb_mns_mhc10002

Anchor:- महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. येणाऱ्या काळात मसने आणि भाजपा एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. मसने कडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. मनसे बरोबर युती करताना त्यांची अमराठी भाषिकांच्या बद्दलची भूमिका आम्हाला विचारात घ्यावी लागेल अस पाटील म्हणाले आहेत.

मनसेच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बसून विचार करायचा आहे. मनसे कडून अजून प्रस्ताव आलेला नाही. मात्र, आम्हाला हे विचारात घ्यावे लागेल की, त्यांची अमराठी भाषिकांच्या बद्दल ची भूमिका आहे. ती स्वाभाविक पणे त्यांना बदलावी लागेल...म्हणजे ऐंशी टक्के स्थानिक व्यक्तींना नोकरी मिळाल्यानंतर वीस टक्के व्यक्तींमध्ये अमराठी येणार. अमराठी कुठल्यातरी पाकिस्तान आणि बांगलादेश मधले आहेत का? असा सवाल त्यांनी केला असून ही भूमिका जर त्यांनी बदलली तर आमचं नेतृत्व बसून निर्णय घेईल. परंतु, राज ठाकरे यांच्याकडून तसा काही प्रस्ताव आलेला नाही असे ही स्पष्ट केले आहे.

बाईट:- चंद्रकांत पाटील- प्रदेशाध्यक्ष




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.