ETV Bharat / state

बारामतीत युवा शेतकऱ्याची 2 एकर केळी जमीनदोस्त, 7 लाखाचे नुकसान

author img

By

Published : May 30, 2021, 2:55 AM IST

गेल्या 2 दिवसात इंदापूर व बारामती तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुजित मासाळ या युवा शेतकऱ्याची तर 2 एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. यात त्याचे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

baramati
बारामती

बारामती - मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपिट व कोरोना संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. या संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून सावरत असतानाच मागील दोन दिवसात इंदापूर व बारामती तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बारामतीत युवा शेतकऱ्याची 2 एकर केळी जमीनदोस्त, 7 लाखाचे नुकसान

6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान

बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांना कालच्या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. येथील सुजित मासाळ या युवा शेतकऱ्याची तर 2 एकर केळीची बाग या वादळी पावसाने जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हाता तोंडातला घास हिरावला

'केळी विक्रिला आली होती. व्यापाऱ्याने 8 रुपये किलोच्या दराने घेऊन जाण्याचा व्यवहारही केला होता. मात्र वादळी पावसाने बाग जमीनदोस्त झाली. त्यामुळे माझे प्रचंड नुकसान झाले', अशी कैफियत युवा शेतकरी सुजित मासाळ याने व्यक्त केली आहे.

मदतीची मागणी

'2 एकर केळी बागेसाठी मासाळने तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च केला होता. या नैसर्गिक संकटामुळे त्याची विक्रिला आलेली केळी जमीनदोस्त झाली. यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ त्यांना मदत करावी', अशी मागणी युवा शेतकरी मासाळने केली आहे.

हेही वाचा - 'क्या हुवा तेरा वादा' म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर टीका

बारामती - मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपिट व कोरोना संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. या संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून सावरत असतानाच मागील दोन दिवसात इंदापूर व बारामती तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बारामतीत युवा शेतकऱ्याची 2 एकर केळी जमीनदोस्त, 7 लाखाचे नुकसान

6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान

बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांना कालच्या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. येथील सुजित मासाळ या युवा शेतकऱ्याची तर 2 एकर केळीची बाग या वादळी पावसाने जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हाता तोंडातला घास हिरावला

'केळी विक्रिला आली होती. व्यापाऱ्याने 8 रुपये किलोच्या दराने घेऊन जाण्याचा व्यवहारही केला होता. मात्र वादळी पावसाने बाग जमीनदोस्त झाली. त्यामुळे माझे प्रचंड नुकसान झाले', अशी कैफियत युवा शेतकरी सुजित मासाळ याने व्यक्त केली आहे.

मदतीची मागणी

'2 एकर केळी बागेसाठी मासाळने तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च केला होता. या नैसर्गिक संकटामुळे त्याची विक्रिला आलेली केळी जमीनदोस्त झाली. यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ त्यांना मदत करावी', अशी मागणी युवा शेतकरी मासाळने केली आहे.

हेही वाचा - 'क्या हुवा तेरा वादा' म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.