ETV Bharat / state

परभणीत मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस; बळीराजाला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा

परभणीत शनिवारी पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. पण मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील साठे वाढविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 12:50 PM IST

परभणीत मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस

परभणी - जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे. पण मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील साठे वाढविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडल्यानंतरच खऱ्याअर्थाने शेतकरी सुखावेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.

परभणीत मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस
दरम्यान, परभणीत आतापर्यंत सरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस झाला. तर गेल्या चोवीस तासात 5.43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या केवळ 49.7 टक्केच पाऊस झाला. यामुळे परभणी जिल्ह्यात निम्म्या पावसाची तूट असून याचा परिणाम पिकांवर झालेला आहे. शिवाय अजूनही म्हणावे तसे पाणी साठवले गेले नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. मागच्या दिड महिन्यात एकही दमदार पाऊस पडला नाही, परिणामी, कोठेही पाण्याचा साठा दिसून येत नाही.
पडलेला पाऊस जमिनीत मुरला पण त्यानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे जमिनी कोरड्या पडायला लागल्या होत्या. मात्र, काल सायंकाळनंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात पालम व सोनपेठ याठिकाणी 10 ते 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित जिल्ह्यात केवळ 1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या परभणीत सर्वदूर पाऊस पडत असून, याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांना तग धरण्यासाठी याचा फायदा होईल तर, उशीराने पेरणी झालेल्या पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस लाभदायक असणार आहे. पण तरीही नदी-नाले, ओढे भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असून त्याची सर्वानाच प्रतिक्षा आहे.

परभणी - जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे. पण मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील साठे वाढविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडल्यानंतरच खऱ्याअर्थाने शेतकरी सुखावेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.

परभणीत मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस
दरम्यान, परभणीत आतापर्यंत सरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस झाला. तर गेल्या चोवीस तासात 5.43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या केवळ 49.7 टक्केच पाऊस झाला. यामुळे परभणी जिल्ह्यात निम्म्या पावसाची तूट असून याचा परिणाम पिकांवर झालेला आहे. शिवाय अजूनही म्हणावे तसे पाणी साठवले गेले नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. मागच्या दिड महिन्यात एकही दमदार पाऊस पडला नाही, परिणामी, कोठेही पाण्याचा साठा दिसून येत नाही.
पडलेला पाऊस जमिनीत मुरला पण त्यानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे जमिनी कोरड्या पडायला लागल्या होत्या. मात्र, काल सायंकाळनंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात पालम व सोनपेठ याठिकाणी 10 ते 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित जिल्ह्यात केवळ 1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या परभणीत सर्वदूर पाऊस पडत असून, याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांना तग धरण्यासाठी याचा फायदा होईल तर, उशीराने पेरणी झालेल्या पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस लाभदायक असणार आहे. पण तरीही नदी-नाले, ओढे भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असून त्याची सर्वानाच प्रतिक्षा आहे.
Intro:परभणी - परभणी जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यात सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर वाढला आहे. परंतु मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील साठे वाढविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडल्यासच खऱ्या अर्थाने शेतकरी सुखावेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.


Body:दरम्यान, परभणी आतापर्यंत सरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 5.43 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 1 जूनपासून आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या केवळ 49.7 टक्केच पाऊस झाला आहे. ज्यामुळे परभणी जिल्ह्यात निम्म्या पावसाची तूट असून याचा परिणाम पिकांवर झाला आहे. शिवाय अजूनही म्हणावे तसे पाणी साठवले गेले नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. मागच्या दिड महिन्यात एकही दमदार पाऊस पडला नाही, परिनामी, कोठेही पाण्याचा साठा दिसून येत नाही. पडलेला पाऊस जमिनीत मुरला आहे ; परंतु त्यानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे जमिनी कोरड्या पडू लागल्या होत्या. मात्र काल सायंकाळनंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे गेल्या चोवीस तासात पालम व सोनपेठ याठिकाणी 10 ते 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित जिल्ह्यात केवळ 1 ते 1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या परभणीत सर्वदूर पाऊस पडत असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सुरुवातीला केलेले पेरणीची पिके मना टाकू लागली होती. त्यांना जीवदान मिळेल तर उशिरा झालेल्या पेरण्यातील पिकांना उगवण्यासाठी हा पाऊस पोषक आहे. एकूणच या पावसाचा सर्वांनाच लाभ होणार आहे. परंतु नदी-नाले, ओढे भरण्यासाठी दमदार पाऊस आवश्यक असून याची सर्वानाच प्रतिक्षा आहे.

- गिरीराज भगत, भगत.
- सोबत व वीस pkg


Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.