ETV Bharat / state

परभणी लॉकडाऊन; 30 एप्रिलपर्यंत मेडिकल - बँका वगळता सर्वकाही राहणार बंद

author img

By

Published : Apr 25, 2021, 8:46 AM IST

Updated : Apr 25, 2021, 9:08 AM IST

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचे आदेश शनिवारी रात्री बजावले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक आरोग्यसेवा आणि बँकेची कामे वगळता संपूर्ण बाजारपेठेतील व्यवहार आणि आस्थापना बंद राहणार आहेत.

लॉकडाऊन, lockdown
लॉकडाऊन

परभणी - कोरानाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला 22 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, संसर्ग थांबत नसल्याने त्यात वाढ करून हे निर्बंध 25 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 30 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याचे आदेश शनिवारी रात्री बजावले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक आरोग्यसेवा आणि बँकेची कामे वगळता संपूर्ण बाजारपेठेतील व्यवहार आणि आस्थापना बंद राहणार आहेत.

पहा काय राहणार सुरू, काय बंद-

लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा, मेडिकल दुकाने आणि बॅंकांची सेवा सर्वसामान्यांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या शिवाय बँकेचे अंतर्गत कामे आणि केवळ पेट्रोलपंप, गॅस एजन्सी यांचे बॅक व्यवहार, करोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना व सर्व शासकीय चालान आदी कामकाज करण्यासाठी सुरू राहणार आहेत. तर बाजारपेठेतील इतर दुकानांसह किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची अत्यावश्यक दुकाने आता 25 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (बुधवारी) संध्याकाळी बजावले आहेत.

वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे निर्बंधांमध्ये वाढ -

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 14 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवेत ज्या बांबीचा समावेश केला आहे. त्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची होणारी गर्दी व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बँका व आरोग्यसेवानिगडित मेडिकल वगळता किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने, आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने या आस्थापनावर र्निबंध घालणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण दी. म. मुगळीकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अधिन राहून त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारातून हा निर्णय घेतला आहे.

यांच्यावर दिली जबाबदारी -

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बैंका (अंतर्गत कामे, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी यांचे बैंक व्यवहार, कोरोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना यांचे व्यवहार व सर्व शासकीय चालान इ. कामकाज वगळता), किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची बाब दुकाने या आस्थापना 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त आणि जिल्ह्यातील सर्व नगर परीषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांवर राहणार आहे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंंड संहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे दंडनिय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिला आहे.

परभणी - कोरानाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला 22 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, संसर्ग थांबत नसल्याने त्यात वाढ करून हे निर्बंध 25 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 30 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याचे आदेश शनिवारी रात्री बजावले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक आरोग्यसेवा आणि बँकेची कामे वगळता संपूर्ण बाजारपेठेतील व्यवहार आणि आस्थापना बंद राहणार आहेत.

पहा काय राहणार सुरू, काय बंद-

लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा, मेडिकल दुकाने आणि बॅंकांची सेवा सर्वसामान्यांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या शिवाय बँकेचे अंतर्गत कामे आणि केवळ पेट्रोलपंप, गॅस एजन्सी यांचे बॅक व्यवहार, करोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना व सर्व शासकीय चालान आदी कामकाज करण्यासाठी सुरू राहणार आहेत. तर बाजारपेठेतील इतर दुकानांसह किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची अत्यावश्यक दुकाने आता 25 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (बुधवारी) संध्याकाळी बजावले आहेत.

वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे निर्बंधांमध्ये वाढ -

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 14 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवेत ज्या बांबीचा समावेश केला आहे. त्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची होणारी गर्दी व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बँका व आरोग्यसेवानिगडित मेडिकल वगळता किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने, आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने या आस्थापनावर र्निबंध घालणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण दी. म. मुगळीकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अधिन राहून त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारातून हा निर्णय घेतला आहे.

यांच्यावर दिली जबाबदारी -

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बैंका (अंतर्गत कामे, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी यांचे बैंक व्यवहार, कोरोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना यांचे व्यवहार व सर्व शासकीय चालान इ. कामकाज वगळता), किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची बाब दुकाने या आस्थापना 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त आणि जिल्ह्यातील सर्व नगर परीषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांवर राहणार आहे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंंड संहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे दंडनिय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिला आहे.

Last Updated : Apr 25, 2021, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.