ETV Bharat / state

परभणीत संचारबंदीमध्ये आणखी २ दिवस वाढ; रविवारी मध्यरात्रीपर्यंत 'लॉकडाऊन'ची शक्यता..!

author img

By

Published : Jul 15, 2020, 8:09 PM IST

परभणी जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि. १५ जुलै) सायंकाळी बजावलेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच शनिवारी व रविवारी कडक संचारबंदीचे आदेश दिले होते. परिणामी ही संचारबंदी राविवारपर्यंत असणार आहे.

Parbhani
परभणीतील दृश्य

परभणी - जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि. 15 जुलै) सायंकाळी बजावलेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेल्या शनिवार-रविवार या नियमित संचारबंदी प्रमाणे रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या एक तारखेपासून परभणीत तब्बल पावणेदोनशे कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी सारख्या उपाययोजना करून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

जिल्ह्यात गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मागच्या ८ दिवसात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनात चिंता निर्माण झाली. त्याामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक शनिवार, रविवार जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार मागच्या आठवड्यातील शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यात रविवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश बजावत आणखी ३ दिवस संचारबंदी लागू केली. त्यानुसार जिल्ह्यातील गंगाखेड वगळता इतर ३ तालुक्यांच्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून आज बुधवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली होती. मात्र सतत पाच दिवस संचारबंदी लावून सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत नाही, उलट रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आज बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे दोन दिवस संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार-रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात नियमित संचारबंदी राहील, असे जाहीर केले होते. त्यानुसार पुन्हा दोन दिवस संचारबंदी लागून रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन राहण्याची शक्यता आहे. तसेच गंगाखेड तालुक्यात एका विवाह स्वागत समारंभामुळे प्रचंड प्रमाणात वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी रविवार (19 जुलै) पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदीच्या या काळात कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नयेे, तसे आढळून आल्यास त्या लोकांवर दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हे देखील दाखल होतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संचारबंदीतूून अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही कार्यालये व सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध सेवाभावी संस्था, आरोग्य संदर्भातील सेवा, सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्तकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने याांना सूट देेण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकाना केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाद्वारे रोकड भरणा करण्यासाठी तर ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे.

परभणी - जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि. 15 जुलै) सायंकाळी बजावलेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेल्या शनिवार-रविवार या नियमित संचारबंदी प्रमाणे रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जुलै महिन्याच्या एक तारखेपासून परभणीत तब्बल पावणेदोनशे कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी सारख्या उपाययोजना करून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

जिल्ह्यात गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मागच्या ८ दिवसात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनात चिंता निर्माण झाली. त्याामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक शनिवार, रविवार जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार मागच्या आठवड्यातील शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यात रविवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश बजावत आणखी ३ दिवस संचारबंदी लागू केली. त्यानुसार जिल्ह्यातील गंगाखेड वगळता इतर ३ तालुक्यांच्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून आज बुधवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली होती. मात्र सतत पाच दिवस संचारबंदी लावून सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत नाही, उलट रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आज बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे दोन दिवस संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार-रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात नियमित संचारबंदी राहील, असे जाहीर केले होते. त्यानुसार पुन्हा दोन दिवस संचारबंदी लागून रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन राहण्याची शक्यता आहे. तसेच गंगाखेड तालुक्यात एका विवाह स्वागत समारंभामुळे प्रचंड प्रमाणात वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी रविवार (19 जुलै) पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदीच्या या काळात कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नयेे, तसे आढळून आल्यास त्या लोकांवर दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हे देखील दाखल होतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संचारबंदीतूून अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधे आणि इतर काही कार्यालये व सेवांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध सेवाभावी संस्था, आरोग्य संदर्भातील सेवा, सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्तकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने याांना सूट देेण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकाना केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाद्वारे रोकड भरणा करण्यासाठी तर ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.