ETV Bharat / state

परभणीत 'जमीयत उलेमा ए हिंद'च्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा - Jamiat_Ulema-e-Hind parbhani

केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी परभणी शहरासह जिंतूर व मानवत येथे मुस्लीम समाजाच्या 'जमीयत उलेमा ए हिंद'च्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

citizen amendment act
परभणीत 'जमियत उलेमा ए हिंद'च्या वतीने 'कॅब' विरोधात मोर्चा
author img

By

Published : Dec 13, 2019, 9:36 PM IST

परभणी - केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी परभणी शहरासह जिंतूर व मानवत येथे मुस्लीम समाजाच्या 'जमीयत उलेमा ए हिंद'च्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रत्येक ठिकठिकाणी झालेल्या सभेत मुस्लीम मौलाना आणि नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कायद्याला विरोध करत तो तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा - 'नागरिकत्व सुधारणा कायद्या'चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत

जिंतूर शहरातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता जामा मशिद प्रांगणातून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना मौलाना तजमुल अहमद खान म्हणाले, 'देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील मुस्लीम धर्मीय नागरिक वगळता इतर सर्व समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेत केल्यामुळे देशातील मुस्लीम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे विधेयक ताबडतोब मागे घेण्यात यावे, अन्यथा देशात अराजकता माजेल.' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच मौलाना अब्दुल जलील, मौलाना सिराजुद्दीन यांचेही भाषण झाले. त्यानंतर नायब तहसीलदार गावंडे यांना सर्व समाज बांधवांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अब्दुल रहमान, कपील फारुकी, मिर्झा शाहेद बेग, जाकेर लाला, सोहेल अहेमद, शोएब जानिमिया, एम. एजाज जिंतुरकर, अब्दुल मुखींद, अहमद बागवान व समाज बांधव उपस्थित होते.

citizen amendment act in parbhani
परभणीत 'जमीयत उलेमा ए हिंद'च्या वतीने 'कॅब' विरोधात मोर्चा

तसेच मानवत येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या ठिकाणी 'जमीयत उलेमा ए हिंद'चे अध्यक्ष मौलाना सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. दुपारी २ वाजल्यापासून तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. हा कायदा भारतीय समाजात जाती-धर्माच्या आधारावर दुभाजकाचे काम करणारे असून संविधान विरोधी असल्याचे आंदोलकांचे म्हणने होते. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

citizen amendment act in parbhani
परभणीत 'जमियत उलेमा ए हिंद'च्या वतीने 'कॅब' विरोधात मोर्चा

तसेच परभणी शहरात देखील 'जमियत-ए-उलेमा हिंद'च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन दिले. या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या विधेयकाचा विरोध करत ते रद्द करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. तसेच अनेक मौलानांनी आपले मत देखील व्यक्त केले. यावेळी एम. ए.रहीम खान, शेख राजाक, सय्यद अकबर, शेख मुखीद आदींसह मौलाना आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद

परभणी - केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी परभणी शहरासह जिंतूर व मानवत येथे मुस्लीम समाजाच्या 'जमीयत उलेमा ए हिंद'च्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रत्येक ठिकठिकाणी झालेल्या सभेत मुस्लीम मौलाना आणि नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कायद्याला विरोध करत तो तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा - 'नागरिकत्व सुधारणा कायद्या'चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत

जिंतूर शहरातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता जामा मशिद प्रांगणातून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना मौलाना तजमुल अहमद खान म्हणाले, 'देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील मुस्लीम धर्मीय नागरिक वगळता इतर सर्व समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेत केल्यामुळे देशातील मुस्लीम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे विधेयक ताबडतोब मागे घेण्यात यावे, अन्यथा देशात अराजकता माजेल.' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच मौलाना अब्दुल जलील, मौलाना सिराजुद्दीन यांचेही भाषण झाले. त्यानंतर नायब तहसीलदार गावंडे यांना सर्व समाज बांधवांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अब्दुल रहमान, कपील फारुकी, मिर्झा शाहेद बेग, जाकेर लाला, सोहेल अहेमद, शोएब जानिमिया, एम. एजाज जिंतुरकर, अब्दुल मुखींद, अहमद बागवान व समाज बांधव उपस्थित होते.

citizen amendment act in parbhani
परभणीत 'जमीयत उलेमा ए हिंद'च्या वतीने 'कॅब' विरोधात मोर्चा

तसेच मानवत येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या ठिकाणी 'जमीयत उलेमा ए हिंद'चे अध्यक्ष मौलाना सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. दुपारी २ वाजल्यापासून तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. हा कायदा भारतीय समाजात जाती-धर्माच्या आधारावर दुभाजकाचे काम करणारे असून संविधान विरोधी असल्याचे आंदोलकांचे म्हणने होते. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

citizen amendment act in parbhani
परभणीत 'जमियत उलेमा ए हिंद'च्या वतीने 'कॅब' विरोधात मोर्चा

तसेच परभणी शहरात देखील 'जमियत-ए-उलेमा हिंद'च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन दिले. या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या विधेयकाचा विरोध करत ते रद्द करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. तसेच अनेक मौलानांनी आपले मत देखील व्यक्त केले. यावेळी एम. ए.रहीम खान, शेख राजाक, सय्यद अकबर, शेख मुखीद आदींसह मौलाना आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद

Intro:परभणी - केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी आज परभणी शहरासह जिंतूर व मानवत येथे मुस्लिम समाजाच्या जमियत उलेमा ए हिंद च्या वतीने मोर्चे काढून तसेच धरणे आंदोलन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रत्येक ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेत मुस्लिम मौलाना आणि नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विधेयकाला विरोध करत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी लावून धरली होती.Body:

जिंतूर शहरात जमियत उलेमा ए हिंद च्या वतीने आज (शुक्रवार) दुपारी तीन वाजता जामा मस्जिद प्रागणातून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना मौलाना तजमुल अहमद खान म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील मुस्लिम धर्मीय नागरिक वगळता इतर सर्व समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेत केल्यामुळे देशातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे विधेयक ताबडतोब मागे घेण्यात यावे, अन्यथा देशात अराजकता माजेल, अशी भीती व्यक्त केली. तसेच मौलाना अब्दुल जलील, मौलाना सिराजुद्दीन यांचेही भाषण झाले. त्यानंतर नायब तहसीलदार गावंडे यांना सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अब्दुल रहमान, कपील फारुकी, मिर्झा शाहेद बेग, जाकेर लाला, सोहेल अहेमद, शोएब जानिमिया, एम. एजाज जिंतुरकर, अब्दुल मुखींद, अहमद बागवान व समाज बांधव उपस्थित होते.
तसेच मानवत येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या ठिकाणी जमियत उलमा ए हिंद चे अध्यक्ष मौलाना सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. हे विधायक भारतीय समाजात जाती-धर्माच्या आधारावर दुभाजकाचे काम करणारे असून संविधान विरोधी आहे, त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती विधायकाचा या वेळी निषेध करण्यात आला.
तसेच परभणी शहरात देखील जमियत-ए-उलेमा हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन दिले. या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या विधेयकाचा विरोध करत ते रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. तसेच अनेक मौलानांनी आपले मत देखील व्यक्त केले. यावेळी एम. ए.रहीम खान, शेख राजाक, सय्यद अकबर, शेख मुखीद आदींसह मौलाना आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo :- परभणी जमियत उल्लेमा निवेदन & vis:- जिंतूर मोर्चाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.