ETV Bharat / state

परभणी-जिंतूर 'महामार्गा'वर चिखल; वाहने अडकल्याने वाहतुकीची कोंडी

शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. लहान-मोठी वाहने या रस्त्यावर घसरत आहेत. तर आज सकाळी झरी गावाजवळ रस्त्यावरच्या चिखलात एक ट्रॅव्हल्स आणि ट्रक अडकला आहे. यामुळे आता हा रस्ता वाहतुकीसाठी २ ते ३ तास ठप्प झाला होता.

author img

By

Published : Jul 27, 2019, 1:36 PM IST

परभणी-जिंतूर महामार्गावर वाहतूक कोंडी

परभणी - परभणी ते जिंतूर या महामार्गचे काम गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. अर्धवट तयार झालेल्या या रस्त्यावरील मुरुमाची माती झाली आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे या मातीचे आता चिखलात रुपांतर झाले आहे. परिणामी या चिखलात मोठी वाहने अडकत आहेत. तर लहान वाहने घसरल्याने अपघात होत आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद - नांदेड या राज्य महामार्गांतर्गत जिंतूर ते परभणी या सुमारे पावणेतीनशे करोड रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे काम 2017 साली सुरू करण्यात आले होते. या कामाला 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. पण गेल्या एक वर्षापासून हे काम बंद पडलेले आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या रस्त्यावर ठिक-ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. परंतु या रस्त्यावरुन वाहनांची रहदारी असल्याने या मुरुमाची आता माती झाली आहे. परिणामी त्यावर पडलेल्या थोड्याशा पावसाने देखील या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते, मोठी वाहने या रस्त्यावर घसरतात, तर दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

परभणी-जिंतूर महामार्ग चिखलात रखडला


दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. लहान-मोठी वाहने या रस्त्यावर घसरत आहेत. तर आज सकाळी झरी गावाजवळ रस्त्यावरच्या चिखलात एक ट्रॅव्हल्स आणि ट्रक अडकला आहे. यामुळे आता हा रस्ता वाहतुकीसाठी २ ते ३ तास ठप्प झाला होता.

हा प्रकार नित्याचाच झाला असून यामुळे आता या रस्त्यावर दररोज प्रवास करणारे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी या रस्त्याच्या कामात वैयक्तिक लक्ष घालून हे काम एका कंत्राटदाराला दिले होते. मात्र यानंतरही हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

परभणी - परभणी ते जिंतूर या महामार्गचे काम गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. अर्धवट तयार झालेल्या या रस्त्यावरील मुरुमाची माती झाली आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे या मातीचे आता चिखलात रुपांतर झाले आहे. परिणामी या चिखलात मोठी वाहने अडकत आहेत. तर लहान वाहने घसरल्याने अपघात होत आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद - नांदेड या राज्य महामार्गांतर्गत जिंतूर ते परभणी या सुमारे पावणेतीनशे करोड रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे काम 2017 साली सुरू करण्यात आले होते. या कामाला 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. पण गेल्या एक वर्षापासून हे काम बंद पडलेले आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या रस्त्यावर ठिक-ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. परंतु या रस्त्यावरुन वाहनांची रहदारी असल्याने या मुरुमाची आता माती झाली आहे. परिणामी त्यावर पडलेल्या थोड्याशा पावसाने देखील या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते, मोठी वाहने या रस्त्यावर घसरतात, तर दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

परभणी-जिंतूर महामार्ग चिखलात रखडला


दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. लहान-मोठी वाहने या रस्त्यावर घसरत आहेत. तर आज सकाळी झरी गावाजवळ रस्त्यावरच्या चिखलात एक ट्रॅव्हल्स आणि ट्रक अडकला आहे. यामुळे आता हा रस्ता वाहतुकीसाठी २ ते ३ तास ठप्प झाला होता.

हा प्रकार नित्याचाच झाला असून यामुळे आता या रस्त्यावर दररोज प्रवास करणारे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी या रस्त्याच्या कामात वैयक्तिक लक्ष घालून हे काम एका कंत्राटदाराला दिले होते. मात्र यानंतरही हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Intro:परभणी - परभणी ते जिंतूर हा महामार्ग गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळला आहे. अर्धवट झालेल्या या रस्त्यावरील मुरमाची आता माती बनली आहे. त्याचे पावसामुळे चिखलात रूपांतर झाले आहे. त्यात मोठी वाहने फसत असून अनेक लहान गाड्या स्लिप होऊन त्यांचा अपघात होत आहे. परिणामी काल (शुक्रवारी) झालेल्या पावसाने ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाश्यांना चांगलीच कसरत करत मार्ग काढावा लागल्याने ते आता अक्षरशः वैतागले आहेत.Body:औरंगाबाद-नांदेड या राज्य महामार्ग अंतर्गत जिंतूर ते परभणी हा सुमारे पावणेतीनशे करोड रुपयांचा सिमेंट रस्ता 2017 साली सुरू करण्यात आला होता. या कामाला 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करायचे आदेश आहेत. परंतु गेल्या एक वर्षापासून हे काम बंद आहे. अर्धवट झालेल्या रस्त्यावर ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे ; परंतु त्यावर वाहनांची वाहतूक झाल्याने या मुरमाची आता माती झाली आहे. परिणामी त्यावर पडलेल्या थोड्याशा पावसामुळे देखील हा रस्ता चिखलयुक्त बनतो. परिणामी वाहनधारकांना त्यावरून जाताना कसरत करावी लागते मोठी वाहने जागेवरच स्लिप होतात, तर दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना जखमी व्हावे लागले. दरम्यान, काल शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. लहान-मोठी वाहने जागेवरच स्लीप होत आहेत. झरी जवळ असलेल्या रस्त्यावर असाच चिखल झाला असून त्यावर एक ट्रॅव्हल्स आणि टिप्पर अडकून बसले आहे. ज्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. सकाळी नऊच्या सुमारासही परिस्थिती निर्माण झाली होती, पुढे 2 ते 3 तास हे वाहने जागेवरून हलले नाहीत. ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार नित्याचाच झाला असून यामुळे आता या रस्त्यावर दैनिक दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी प्रचंड वैतागले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी या रस्त्या कामात वैयक्तिक लक्ष घालून हे काम अन्य का गुत्तेदार दाराला देण्यात आले होते. परंतु त्याच्याकडूनही हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येते.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत :- pbn_NH_block_vis_vo_pkgConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.