ETV Bharat / state

10 वी निकाल: परभणी जिल्ह्यात 88.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींचीच बाजी - parbhani latest news

राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हा निकाल औरंगाबाद विभागात अखेरच्या म्हणजेच पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 88.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

10 the class result: average result of Parbhani district is 88.48 percent
विभागात परभणीचा खालून पहिला; 88.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
author img

By

Published : Jul 29, 2020, 5:50 PM IST

परभणी - आज (बुधुवार) राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हा निकाल औरंगाबाद विभागात अखेरच्या म्हणजेच पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 88.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींचा निकाल आठ टक्कांनी अधिक लागला आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.1 तर मुलांची 87.15 टक्के आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातील 32 हजार 73 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील प्रत्यक्ष 31 हजार 777 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील विशेष प्राविण्यासह 7 हजार 429 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत 8 हजार 447, द्वितीय श्रेणीत 7 हजार 169 आणि सर्वसाधारण श्रेणीत 4 हजार 766 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 28 हजार 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा हा निकाल 88.48 टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमधील निकालाच्या परंपरेप्रमाणे जिल्ह्यातील मुलींनी यावर्षीही आपली वरचढ गुणवत्ता कायम राखली आहे. मुलांच्या तुलनेत तब्बल आठ टक्क्यांनी मुली सरस ठरल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.15 इतके असताना मुली मात्र 95.1 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील नियमीत विद्यार्थ्यांचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. त्यातही मुलींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातील 423 केंद्रावरून दहावीची परीक्षा झाली होती. त्यासाठी 15 हजार 851 मुलांनी परीक्षा दिली. त्यातील 13 हजार 814 मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यांची ही टक्केवारी 87.15 टक्के आहे. तर 12 हजार 834 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यात 12 हजार 193 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे हे प्रमाण 95.01 टक्के इतके आहे.

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील 423 शाळांपैकी 69 शाळांनी निकालात घवघवीत यश मिळविले आहे. या शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये ग्रामीण भागातील शाळाही अव्वल राहिल्या आहेत. तर 90 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांचे प्रमाण लक्षवेधक आहे. औरंगाबाद विभागात जिल्ह्याचा निकाल सर्वात अखेरच्या स्थानावर राहिला असला तरी शालेयस्तरावरील निकाल चांगला लागला आहे.

परभणी - आज (बुधुवार) राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हा निकाल औरंगाबाद विभागात अखेरच्या म्हणजेच पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 88.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींचा निकाल आठ टक्कांनी अधिक लागला आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.1 तर मुलांची 87.15 टक्के आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातील 32 हजार 73 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील प्रत्यक्ष 31 हजार 777 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील विशेष प्राविण्यासह 7 हजार 429 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत 8 हजार 447, द्वितीय श्रेणीत 7 हजार 169 आणि सर्वसाधारण श्रेणीत 4 हजार 766 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 28 हजार 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा हा निकाल 88.48 टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमधील निकालाच्या परंपरेप्रमाणे जिल्ह्यातील मुलींनी यावर्षीही आपली वरचढ गुणवत्ता कायम राखली आहे. मुलांच्या तुलनेत तब्बल आठ टक्क्यांनी मुली सरस ठरल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.15 इतके असताना मुली मात्र 95.1 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील नियमीत विद्यार्थ्यांचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. त्यातही मुलींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातील 423 केंद्रावरून दहावीची परीक्षा झाली होती. त्यासाठी 15 हजार 851 मुलांनी परीक्षा दिली. त्यातील 13 हजार 814 मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यांची ही टक्केवारी 87.15 टक्के आहे. तर 12 हजार 834 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यात 12 हजार 193 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे हे प्रमाण 95.01 टक्के इतके आहे.

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील 423 शाळांपैकी 69 शाळांनी निकालात घवघवीत यश मिळविले आहे. या शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये ग्रामीण भागातील शाळाही अव्वल राहिल्या आहेत. तर 90 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांचे प्रमाण लक्षवेधक आहे. औरंगाबाद विभागात जिल्ह्याचा निकाल सर्वात अखेरच्या स्थानावर राहिला असला तरी शालेयस्तरावरील निकाल चांगला लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.