ETV Bharat / state

परभणीत अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

गेल्या 3 दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे.

author img

By

Published : Jun 20, 2019, 5:26 PM IST

परभणीत अभियांत्रिका प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

परभणी - गेल्या 3 दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. ज्या ऑनलाईन सेंटरवरून ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असून गेल्या 3 दिवसात केवळ 13 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

त्यामुळे शहरातील शिवाजी महाविद्यालयात गेल्या 3 दिवसांपासून हजारो विद्यार्थी आणि पालक फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ प्रवेश प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

परभणीत अभियांत्रिका प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

यावर्षी शासनाने बारावीनंतरच्या विविध कोर्सेससाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. मात्र, ही प्रक्रिया प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र न ठेवता सामायिक केली आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुविशारद, वैद्यकशास्त्र तसेच इतर 53 शाखेचे प्रवेश या एकाच पोर्टलवरून करून घेतले जात आहेत. यासाठी प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र, प्राथमिक फेरीतच असा गोंधळ उडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडून कुठलीच ठोस माहिती दिली जात नसल्याचे सांगितले. तर महाविद्यालयाने केवळ इंटरनेट समस्या असून त्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगितले. काही विद्यार्थी आणि पालक गेल्या 3 दिवसांपासून परभणीत मुक्कामी आहेत, तर अनेकजण तालुक्याहुन आलेले विद्यार्थी दररोज ये-जा करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया हवी- पाथरीकर

शासनाने पूर्वीप्रमाणेच प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवायला हवी. त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा शिवाजी महाविद्यालयाचे अभियांत्रिकी शाखेचे संचालक आनंद पाथरीकर यांनी व्यक्त केली आहे. तर पालकांनी तत्काळ प्रवेश प्रक्रियाची पद्धत सुरळीत करण्याची मागणी केली आहे. एकूणच हा प्रकार असाच चालू राहिला तर येणाऱ्या काही दिवसात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

परभणी - गेल्या 3 दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. ज्या ऑनलाईन सेंटरवरून ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असून गेल्या 3 दिवसात केवळ 13 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

त्यामुळे शहरातील शिवाजी महाविद्यालयात गेल्या 3 दिवसांपासून हजारो विद्यार्थी आणि पालक फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ प्रवेश प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

परभणीत अभियांत्रिका प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

यावर्षी शासनाने बारावीनंतरच्या विविध कोर्सेससाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. मात्र, ही प्रक्रिया प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र न ठेवता सामायिक केली आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुविशारद, वैद्यकशास्त्र तसेच इतर 53 शाखेचे प्रवेश या एकाच पोर्टलवरून करून घेतले जात आहेत. यासाठी प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र, प्राथमिक फेरीतच असा गोंधळ उडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडून कुठलीच ठोस माहिती दिली जात नसल्याचे सांगितले. तर महाविद्यालयाने केवळ इंटरनेट समस्या असून त्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगितले. काही विद्यार्थी आणि पालक गेल्या 3 दिवसांपासून परभणीत मुक्कामी आहेत, तर अनेकजण तालुक्याहुन आलेले विद्यार्थी दररोज ये-जा करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया हवी- पाथरीकर

शासनाने पूर्वीप्रमाणेच प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवायला हवी. त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा शिवाजी महाविद्यालयाचे अभियांत्रिकी शाखेचे संचालक आनंद पाथरीकर यांनी व्यक्त केली आहे. तर पालकांनी तत्काळ प्रवेश प्रक्रियाची पद्धत सुरळीत करण्याची मागणी केली आहे. एकूणच हा प्रकार असाच चालू राहिला तर येणाऱ्या काही दिवसात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

Intro:परभणी - परभणीत गेल्या तीन दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. ज्या ऑनलाईन सेंटरवरून ही प्रवेश प्रक्रिया होत आहे, त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असून, गेल्या तीन दिवसात केवळ 13 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया होऊ शकल्या. ज्यामुळे परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून हजारो विद्यार्थी आणि पालक रेंगाळले आहेत. यामुळे शासनाने तात्काळ या प्रवेश प्रक्रिया सुरळीत कराव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.


Body:यावर्षी शासनाने बारावीनंतरच्या विविध कोर्सेससाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. मात्र ही प्रक्रिया प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र न ठेवता सामायिक केली आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुविशारद, वैद्यकशास्त्र तसेच इतर 53 शाखेचे प्रवेश या एकाच पोर्टलवरून करून घेतल्या जात आहेत. यासाठी प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र प्राथमिक फेरीतच असा गोंधळ उडत असल्याने चिंता व्यक्त केल्या जाऊ लागली आहे.
परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वैद्यकशास्त्र आणि वास्तुविशारद या शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 17 जूनपासून सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया सुरुवातीपासूनच ठप्प पडल्याचे दिसून येते. गेल्या तीन दिवसात केवळ तेरा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी झाली आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या काही दिवसात याच पोर्टलवरून सुमारे 52 शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसे झाल्यास या गोंधळात किती भर पडेल, हा विचारच करायला नको.
दरम्यान, या संदर्भात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडून कुठलीच ठोस माहिती दिल्या जात नसल्याचे सांगितले. केवळ इंटरनेट समस्या असून त्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगितल्या जात आहे. काही विद्यार्थी आणि पालक गेल्या तीन दिवसांपासून परभणीत मुक्कामी आहेत, तर अनेक तालुक्याहुन आलेले विद्यार्थी दररोज ये-जा करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी प्रवेशासाठी रेंगाळले असून मनस्तापाचा सामना करत आहेत.

"स्वतंत्र प्रक्रिया हवी- संचालक पाथरीकर"

शासनाने पूर्वीप्रमाणेच प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवायला हवी. त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा शिवाजी महाविद्यालयाचे अभियांत्रिकी शाखेचे संचालक आनंद पाथरीकर यांनी व्यक्त केली, तर पालकांनी तात्काळ प्रवेश प्रक्रियाची पद्धत सुरळीत करण्याची मागणी केली आहे. एकूणच हा प्रकार असाच चालू राहिला तर येणाऱ्या काही दिवसात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत vis, 1to1 & byte.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.