ETV Bharat / state

'त्या' आठ गावांचा मतदानावर बहिष्कार; असंतोषातून असहकार

author img

By

Published : Oct 21, 2019, 3:16 PM IST

Updated : Oct 21, 2019, 3:21 PM IST

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वैतागलेल्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या आठ गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे.

'त्या' आठ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी - रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वैतागलेल्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या आठ गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे. दुपारपर्यंत या आठ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या पाच मतदान केंद्रांवर अद्याप एकाही मताची नोंद झालेली नाही.

'त्या' आठ गावांचा मतदानावर बहिष्कार

लासीना, थडीउक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावांचा बहिष्कारात समावेश आहे. या आठ गावांमधील मतदारांनी रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याची भूमिका घेतली. या गावांना जोडणाऱ्या मार्गाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने 26 सप्टेंबरला थडी उक्कडगाव येथे गोदाकाठच्या आठ गावांनी पंचायत घेऊन राजकीय पदाधिकाऱ्यांनाही गावबंदी केली आहे.

प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी चौकशीही न केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थडी उक्कडगाव येथे या आठ गावातील नागरीकांनी एक बैठक घेऊन रस्त्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार कायम ठेऊन असहकार पुकारले.

परभणी - रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वैतागलेल्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या आठ गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे. दुपारपर्यंत या आठ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या पाच मतदान केंद्रांवर अद्याप एकाही मताची नोंद झालेली नाही.

'त्या' आठ गावांचा मतदानावर बहिष्कार

लासीना, थडीउक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावांचा बहिष्कारात समावेश आहे. या आठ गावांमधील मतदारांनी रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याची भूमिका घेतली. या गावांना जोडणाऱ्या मार्गाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने 26 सप्टेंबरला थडी उक्कडगाव येथे गोदाकाठच्या आठ गावांनी पंचायत घेऊन राजकीय पदाधिकाऱ्यांनाही गावबंदी केली आहे.

प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी चौकशीही न केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थडी उक्कडगाव येथे या आठ गावातील नागरीकांनी एक बैठक घेऊन रस्त्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार कायम ठेऊन असहकार पुकारले.

Intro:परभणी - रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वैतागलेल्या सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या आठ गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतू प्रशासनाने त्यांची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपला बहिष्कार कायम ठेवल्याने दुपारपर्यंत या आठ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या पाच मतदान केंद्रांवर आज दुपारपर्यंत एकही मत नोंदविण्यात आले नाही. या मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी मतदाराच्या प्रतीक्षेत बसून आहेत.Body:मतदानावर बहिष्कार टाकणार्‍या गावांमध्ये लासीना, थडीउक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गोदाकाठच्या या आठ गावातील मतदारांनी रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याच्या भूमिका घेतली आहे. या आठ गावांना जोडणाऱ्या मार्गाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर कुठलीच उपाययोजना न झाल्याने २६ सप्टेंबर रोजी थडी उक्कडगाव येथे गोदाकाठच्या आठ गावांनी महापंचायत घेवून मतदानावर बहिष्कार करत राजकीय पदाधिकारी व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावबंदी केली आहे.
प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त कोणत्याही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी चौकशीही न केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुध्दा या गावांना भेट देणे टाळले. या गावातील तरुणांनी प्रत्येक गावात सभा बैठका घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याचा ठाम निर्धार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थडी उक्कडगाव येथे या आठ गावातील नागरीकांनी एक बैठक घेऊन रस्त्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार कायम ठेऊन प्रशासनाशी असहकार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार एकही ग्रामस्थ आज मतदानासाठी बाहेर पडला नाही. गावातील नागरिक प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. विशेषतः तरुणांमध्ये अधिक राग दिसून येत असून ते रास्ता होत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवू अशी भूमिका मांडत आहेत.
दरम्यान, या आठ गावांच्या मतदानासाठी 5 मध्यवर्ती ठिकाणी मतदानाचे केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. परंतु या एकाही केंद्रावर मतदार फिरकला नाही. परिणामी मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या प्रतीक्षेत बसून आहेत. तर या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत करून घ्यावी, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
सोबत :- रस्त्यांच्या दुर्दशेचे 2 vis. & voting_both_vis & villegars_byteConclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.