ETV Bharat / state

निकृष्ट बांधकामामुळे ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली

author img

By

Published : Jul 10, 2019, 8:15 AM IST

टाकीचे बांधकाम झाल्यापासून आत्तापर्यंत तिच्यात पाणी भरण्यात आले नव्हते. मात्र, मंगळवारी रात्रच्या सुमारास पाणी भरताच ही टाकी कोसळली. टाकी कोसळली तेव्हा तीन प्रवासी टाकी जवळील रस्त्याने जात होते...

टाकी कोसळली

पालघर - '२६ गाव पाणीपुरवठा योजने'अंतर्गत बांधण्यात आलेली ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. माहीम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधण्यात आली होती. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली.

अजय किणी, ग्रामस्थ

घटनेच्या वेळी तीन प्रवासी टाकी जवळील रस्त्याने जात होते. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. पाच-सहा वर्षांपूर्वी ही टाकी बांधण्यात बांधण्यात आली होती. मात्र, टाकीचे बांधकाम झाल्यापासून आत्तापर्यंत या टाकीत पाणी भरण्यात आले नव्हते.

मंगळवारी सकाळी टाकीत पाणी भरले असता रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली. टाकी कोसळली असात परिसरात मोठा आवाज झाला, त्यामुळे नागरिक धावत घराबाहेर आले. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळली आहे. टाकी बांधताना हलक्या दर्जाचे स्टील वापरल्यामुळेच ती पडली. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पालघर - '२६ गाव पाणीपुरवठा योजने'अंतर्गत बांधण्यात आलेली ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. माहीम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधण्यात आली होती. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली.

अजय किणी, ग्रामस्थ

घटनेच्या वेळी तीन प्रवासी टाकी जवळील रस्त्याने जात होते. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. पाच-सहा वर्षांपूर्वी ही टाकी बांधण्यात बांधण्यात आली होती. मात्र, टाकीचे बांधकाम झाल्यापासून आत्तापर्यंत या टाकीत पाणी भरण्यात आले नव्हते.

मंगळवारी सकाळी टाकीत पाणी भरले असता रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली. टाकी कोसळली असात परिसरात मोठा आवाज झाला, त्यामुळे नागरिक धावत घराबाहेर आले. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळली आहे. टाकी बांधताना हलक्या दर्जाचे स्टील वापरल्यामुळेच ती पडली. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:Exclusive: पालघर 26 गाव पाणीपुरवठा योजने अंतर्गत माहीम ग्रामपंचायतीच्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली; कोणतीही जिवीतहानी नाही, मोठी दुर्घटना टळलीBody:Exclusive: पालघर 26 गाव पाणीपुरवठा योजने अंतर्गत माहीम ग्रामपंचायतीच्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली; कोणतीही जिवीतहानी नाही, मोठी दुर्घटना टळली

नमित पाटील,
पालघर, दि. 10/7/2019

पालघर 26 गाव पाणीपुरवठा योजने अंतर्गत माहीम ग्रामपंचायतीच्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. या घटनेच्यावेळी तीन प्रवासी याच रस्त्याने जात होते मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून टाकी कोसळण्याच्या वेळी या परिसरात कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली.

पाच-सहा वर्षांपूर्वी ही 80 हजार लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात बांधण्यात आली होती. मात्र टाकीचे बांधकाम झाल्यापासून आजवर या टाकीत पाणी भरण्यात आले नव्हते. आज सकाळी या टाकीत पाणी भरले असता रात्री 10च्या सुमारास ही टाकी खाली कोसळली. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळल्याने ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Byte- अजय किणी- ग्रामस्थConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.