पालघर - गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या संदभार्त आढावा व उपाययोजना करण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महसूल व मनपा अधिकारीही उपस्थित होते.
शहरातील सनसिटी गास रस्ता, वसई पूर्वेकडील मिठागर, नालासोपारा परिसारत त्यांनी भेट दिली. यावेळी ठिकाठिकाणी पाणी साचलेल्या परिसरात त्यांनी पाहणी केली. तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, वसईकरांवर दरवर्षी उद्भवणारे जलसंकट हे शहरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदा मातीभरावाची परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.