ETV Bharat / state

पालघर तिहेरी हत्याप्रकरण : सीआयडीने आणखी 24 आरोपींना केली अटक

author img

By

Published : Oct 22, 2020, 1:13 PM IST

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने एकूण 208 आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

gadchinchale monk issue
गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण : सीआयडीने 24 नव्या आरोपींना केली अटक

पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणात सीआयडीने नव्या 24 आरोपींना अटक केली असून लवकरच डहाणू न्यायालयात हजर करणार आहेत. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती.

या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने एकूण 208 आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यापैकी 50 जणांना सीआयडीने ताब्यात घेतल्याचे कळते. यापैकी 24 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज डहाणू न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात आधीपासून अटकेत असलेल्या 62 आरोपींच्या जामिनावर ठाण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे.

असे आहे गडचिंचले प्रकरण -

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सीआयडीने जवळपास 178हून आरोपींना अटक केली आहे. यापैकी 11 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आला.

याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.

पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणात सीआयडीने नव्या 24 आरोपींना अटक केली असून लवकरच डहाणू न्यायालयात हजर करणार आहेत. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती.

या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने एकूण 208 आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यापैकी 50 जणांना सीआयडीने ताब्यात घेतल्याचे कळते. यापैकी 24 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज डहाणू न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात आधीपासून अटकेत असलेल्या 62 आरोपींच्या जामिनावर ठाण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे.

असे आहे गडचिंचले प्रकरण -

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सीआयडीने जवळपास 178हून आरोपींना अटक केली आहे. यापैकी 11 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आला.

याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.