ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात भाजपपेक्षा सेना ठरतेय सरस; विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार?

author img

By

Published : Jun 18, 2019, 1:00 PM IST

पालघर जिल्ह्यात मंत्री रूपाने भाजपच सत्ताकेंद्र गेले आहे. तर शिवसेनेने या भागात कार्यकर्त्यांना महामंडळाच्या रूपाने बहाल केलेली पदे आणि खासदार यामुळे येथील शिवसेनेची सत्ताकेंद्र भाजपपेक्षा सरस आहेत. हा सरसपणा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकेल. तसेची ती सेनेची वाटाघाटीची शक्ती वाढणारी असल्याचे राजकीय तज्ञांकडून मांडले जात आहे.

मंत्री विष्णु सवरा यांची राजीनामा

पालघर (वाडा) - राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पालघर जिल्ह्यातील भाजपचे सत्ताकेंद्राचे बळ कमी झाले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सत्तेचेबळ वाढलेले पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित युतीने लढत आहेत. असे असले तरी या सत्ताकेंद्र बळाच्या जोरावर आगामी विधानसभा जागा वाटपात भाजपपेक्षा शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये आघाडीवर राहणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे.

दिवंगत माधवराव काने यांच्या शिष्यापैंकी एक असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या यशात जुन्या जवळच्या सहकारी निष्ठावान कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. पुढे विधानसभा पुनर्रचनेनंतर भिवंडी व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व केले. सन १९९५-९६ च्या युती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री पद सांभाळले. याच काळात जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन नव्या विक्रमगड तालुक्याची निर्मिती केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे होते.

यानंतर त्यांना दुसऱ्यांदा महायुतीच्या सरकारात आदिवासी विकासमंत्री पद दिर्घकाळ मिळाले. मंत्री पद मिळताच त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी असलेला पेसा कायदा संमत केला. हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जातो. अनेक निर्णय घेत असताना आदिवासी मुलांना उत्तम दर्जाच्या इंग्रजी शाळेत शिकविण्यासाठी विविध ठिकाणी त्यांनी मुलांना प्रवेश देऊ केला. तर या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभागाने उचलली. याचबरोबर पालघर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्राकडून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला.

अशातच त्यांच्यावर पालघर जिल्ह्य़ातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी विरोधकांकडून भडीमार केला. नंतर तोही विरोध थंड झाल्याचे पहावयास मिळाले. पुढे त्यांची प्रकृती ढासळली होती. दौरेही थंडावले. त्यानंतर राज्य विस्ताराच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्विकारला.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपचे दोन आमदार व शिवसेनेचा एक व तीन बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. तर विष्णू सवरांच्या राजीनाम्याने पालघर जिल्ह्य़ातील भाजपचे सत्ता केंद्र कमी झाले आहे. शिवसेनेने पालघरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी दोन महामंडळे दिली. त्याचप्रमाणे भाजपची पालघर लोकसभा जागा हिसकावून शिवसेना खासदार निवडून आला. तर पालघर जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजपची जोडी सत्तेत आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासह भाजपची सत्ताकेंद्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात कमी झाल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे.

पालघर जिल्ह्यात मंत्री रूपाने सत्ताकेंद्र गेल्याने आणि शिवसेनेने या भागात कार्यकर्त्यांना महामंडळाच्या रूपाने बहाल केलेली पदे आणि खासदार यामुळे येथील शिवसेनेची सत्ताकेंद्र भाजपपेक्षा सरस आहेत. हा सरसपणा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकेल. तसेची ती सेनेची वाटाघाटीची शक्ती वाढणारी असल्याचे राजकीय तज्ञांकडून मांडले जात आहे.

तर याविषयी वाडा तालुक्यातील राजकीय विश्लेषक समीर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील सेनेची सत्तास्थाने विश्लेषण केली. आगामी काळात सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

पालघर (वाडा) - राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पालघर जिल्ह्यातील भाजपचे सत्ताकेंद्राचे बळ कमी झाले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सत्तेचेबळ वाढलेले पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित युतीने लढत आहेत. असे असले तरी या सत्ताकेंद्र बळाच्या जोरावर आगामी विधानसभा जागा वाटपात भाजपपेक्षा शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये आघाडीवर राहणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे.

दिवंगत माधवराव काने यांच्या शिष्यापैंकी एक असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या यशात जुन्या जवळच्या सहकारी निष्ठावान कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. पुढे विधानसभा पुनर्रचनेनंतर भिवंडी व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व केले. सन १९९५-९६ च्या युती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री पद सांभाळले. याच काळात जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन नव्या विक्रमगड तालुक्याची निर्मिती केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे होते.

यानंतर त्यांना दुसऱ्यांदा महायुतीच्या सरकारात आदिवासी विकासमंत्री पद दिर्घकाळ मिळाले. मंत्री पद मिळताच त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी असलेला पेसा कायदा संमत केला. हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जातो. अनेक निर्णय घेत असताना आदिवासी मुलांना उत्तम दर्जाच्या इंग्रजी शाळेत शिकविण्यासाठी विविध ठिकाणी त्यांनी मुलांना प्रवेश देऊ केला. तर या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभागाने उचलली. याचबरोबर पालघर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्राकडून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला.

अशातच त्यांच्यावर पालघर जिल्ह्य़ातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी विरोधकांकडून भडीमार केला. नंतर तोही विरोध थंड झाल्याचे पहावयास मिळाले. पुढे त्यांची प्रकृती ढासळली होती. दौरेही थंडावले. त्यानंतर राज्य विस्ताराच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्विकारला.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपचे दोन आमदार व शिवसेनेचा एक व तीन बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. तर विष्णू सवरांच्या राजीनाम्याने पालघर जिल्ह्य़ातील भाजपचे सत्ता केंद्र कमी झाले आहे. शिवसेनेने पालघरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी दोन महामंडळे दिली. त्याचप्रमाणे भाजपची पालघर लोकसभा जागा हिसकावून शिवसेना खासदार निवडून आला. तर पालघर जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजपची जोडी सत्तेत आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासह भाजपची सत्ताकेंद्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात कमी झाल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जात आहे.

पालघर जिल्ह्यात मंत्री रूपाने सत्ताकेंद्र गेल्याने आणि शिवसेनेने या भागात कार्यकर्त्यांना महामंडळाच्या रूपाने बहाल केलेली पदे आणि खासदार यामुळे येथील शिवसेनेची सत्ताकेंद्र भाजपपेक्षा सरस आहेत. हा सरसपणा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकेल. तसेची ती सेनेची वाटाघाटीची शक्ती वाढणारी असल्याचे राजकीय तज्ञांकडून मांडले जात आहे.

तर याविषयी वाडा तालुक्यातील राजकीय विश्लेषक समीर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील सेनेची सत्तास्थाने विश्लेषण केली. आगामी काळात सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Intro:मंञी विष्णू सवरांचा राजीनामा आणि भाजपचा पालघर जिल्हा
सत्ताकेंद्रात भाजपपेक्षा सेना ठरतेय सरस, आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सेनेची
बार्गेनिंग पाॅवर वाढणार?

पालघर (वाडा) - संतोष पाटील

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा राज्याच्या नव्याने होणाऱ्या मंञीमंडळाच्या विस्तारापुर्वी प्रकृती अस्वस्थतामुळे राजीनामा दिल्याची माहिती सुञांकडून मिळतेय.त्यांच्या या राजीनामा मुळे पालघर जिल्ह्यातील भाजपचे सत्ताकेंद्राचे बळ कमी झाले असुन मिञपक्ष असलेल्या शिवसेनेचे सत्तेचेबळ वाढलेले पहायला मिळतेय. आगामी विधानसभा निवडणुकीत तुझ्या गळा आणि माझ्या गळा,गुंफून .... माळा या गाण्याच्या ओळी प्रमाणे भाजप आणि शिवसेना एकञीत युतीने लढवीत असले तरी या हे सत्ताकेंद्र बळाच्या जोरावर आगामी विधानसभा जागा वाटपात भाजपपेक्षा शिवसेना बार्गेनिंग पाॅवरमध्ये आघाडीवर राहणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जातेय.

स्वर्गीय माधवराव काने यांचे शिष्यापैंकी एक असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे सहा वेळा आमदार निवडून आले. यात त्यांच्या यशात जुन्या जवळच्या सहकारी निष्ठावान कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे.अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले.पुढे विधानसभा पुनर्रचने नंतर भिवंडी व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व केले.सन 1995-96 च्या युती सरकारमध्ये आदिवासी विकास मंञी पद सांभाळल. याच काळात जव्हार तालुक्याचे विभाजन होऊन नव्या विक्रमगड तालुक्याची निर्मिती केली.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे होते.
या नंतर त्यांना दुसऱ्यांदा महायुतीच्या सरकारात आदिवासी विकास मंत्री पद दिर्घ काळ मिळाले.
मंञी पद मिळताच त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी असलेला पैसा कायदा संमत केला.हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जातो. अनेक निर्णय घेत असताना आदिवासी मुलांना उत्तम दर्जाच्या इंग्रजी शाळेत शिकविण्यासाठी विवीध ठिकाणी या मुलांसाठी प्रवेश देवू केला आणि त्याच्या शिक्षणाची
जबाबदारी आदिवासी विकास विभागाने उचलली.
याचबरोबर पालघर जिल्ह्य़ातील रस्ते विकासासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिला.
अशातच त्यांच्यावर पालघर जिल्ह्य़ातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी विरोधकांकडून भडीमार केला.नंतर तोही विरोध नंतर थंड झाल्याचे पहावयास मिळाले.
पुढे प्रकृती त्यांची ढासळली होती. दौरेही थंडावले आणि राज्य विस्ताराच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.आणि तो मुख्यमंत्र्यांनी स्विकारला आहे.
त्यांच्या राजीनाम्याने पालघर जिल्ह्य़ातील भाजपचे सत्ता केंद्र कमी झालेय.शिवसेनेने येथे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी दोन महामंडळे दरम्यानच्या काळात दिली.त्याचप्रमाणे भाजपची पालघर लोकसभा जागा हिसकावून शिवसेना खासदार निवडून आला. त्याचप्रमाणे इथल्या जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपच्या जोडीने सत्तेत आहे. आजघडीला पालघर जिल्हासह संपुर्ण कोकणासह भाजपची सत्ताकेंद्र मंञीमंडळाच्या विस्तारात कमी झाल्याचे राजकीय तज्ञांकडून सांगितले जाते.
यातच पालघर जिल्ह्यात भाजप-युती सरकारमधील असलेले वाडा तालुक्यातील सत्तेचे केंद्र मंञी विष्णू सवरा यांच्या रूपाने कमी झाले आहे.
पालघर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय भाजपचे दोन आमदार व शिवसेनेचा एक व तीन बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत.
मंञी रूपाने सत्ताकेंद्र गेल्याने आणि शिवसेनेने या भागात कार्यकर्त्यांना महामंडळाच्या रूपाने बहाल केलीली पदे,आणि खासदार यामुळे येथील शिवसेनेची सत्ताकेंद्र भाजपपेक्षा सरस आहेत.हा सरसपणा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकेल? आणि सेनेची वाटाघाटीची शक्ती वाढणारी असल्याचे राजकीय तज्ञांकडून मांडले जातेय.
तर याविषयी वाडा तालुक्यातील राजकीय विश्लेषक समीर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील सेनेची सत्तास्थाने विश्लेषण करून आगामी काळात सेनेची बार्गेनिंग पाॅवर वाढणार असल्याचे त्यांनी यावेळी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले. Body:YConclusion:Y
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.