ETV Bharat / state

पालघर लवकरच प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल - पालकमंत्री चव्हाण

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले.

author img

By

Published : Aug 16, 2019, 8:43 AM IST

Updated : Aug 16, 2019, 9:05 AM IST

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले.

पालघर - भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू असून लवकरच आपला जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले.

पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण होत असून लवकरच जिल्हा प्रशासनाचे काम नवीन इमारतीतून सुरू होईल. पुढील वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोहळा हा नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणावर होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील पर्जन्यमानाविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे मृत झालेल्या व्यक्तींना 48 लाखाची मदत देण्यात आली आहे. तसेच मृत जनावरांच्या कुटुंबांना नुकसानीपोटी 1 लाख 98 हजार रुपये, तर पावसाळ्यात पडझड झालेल्या 600 घरांना 33 लाख 56 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने पूर्ण करुन घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाच्या धक्क्यांमुळे बाधित 1793 घरांना शासन निर्णयानुसार 6 हजार रुपयांप्रमाणे 1 कोटी 7 लाख 58 हजारांची तर दोन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.

आदिवासी बहुल जिल्हा असूनही औद्योगिकरणात राज्यात पालघर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे, असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील मनोर येथे दोनशे खाटांचे सामान्य रुग्णालय व वीस खाटांचे ट्रॉमा केअरचे बांधकाम सुरू झाले आहे. तसेच पालघर येथे दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मंजूरी मिळाली असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध आहे. बोईसर व वाणगाव येथेही प्रत्येकी 30 खाटांच्या रुग्णालयाचे विस्तारीकरण सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील केळवा, बोर्डी, डहाणू या ठिकाणचे समुद्रकिनारे विकसित करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येत असून यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. पालघर पोलीस दलाच्यावतीने स्वतंत्र डिजीटल दूरसंचार व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पालघर पोलीस मुख्यालय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी सदैव संपर्कात राहून यापुढे पालघर पोलीस दल जास्तीत जास्त लोकाभिमूख होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालघर - भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू असून लवकरच आपला जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले.

पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण होत असून लवकरच जिल्हा प्रशासनाचे काम नवीन इमारतीतून सुरू होईल. पुढील वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोहळा हा नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणावर होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील पर्जन्यमानाविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे मृत झालेल्या व्यक्तींना 48 लाखाची मदत देण्यात आली आहे. तसेच मृत जनावरांच्या कुटुंबांना नुकसानीपोटी 1 लाख 98 हजार रुपये, तर पावसाळ्यात पडझड झालेल्या 600 घरांना 33 लाख 56 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने पूर्ण करुन घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाच्या धक्क्यांमुळे बाधित 1793 घरांना शासन निर्णयानुसार 6 हजार रुपयांप्रमाणे 1 कोटी 7 लाख 58 हजारांची तर दोन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.

आदिवासी बहुल जिल्हा असूनही औद्योगिकरणात राज्यात पालघर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे, असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील मनोर येथे दोनशे खाटांचे सामान्य रुग्णालय व वीस खाटांचे ट्रॉमा केअरचे बांधकाम सुरू झाले आहे. तसेच पालघर येथे दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मंजूरी मिळाली असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध आहे. बोईसर व वाणगाव येथेही प्रत्येकी 30 खाटांच्या रुग्णालयाचे विस्तारीकरण सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील केळवा, बोर्डी, डहाणू या ठिकाणचे समुद्रकिनारे विकसित करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येत असून यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. पालघर पोलीस दलाच्यावतीने स्वतंत्र डिजीटल दूरसंचार व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पालघर पोलीस मुख्यालय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी सदैव संपर्कात राहून यापुढे पालघर पोलीस दल जास्तीत जास्त लोकाभिमूख होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:पालघर लवकरच प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वासBody: पालघर लवकरच प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

नमित पाटील,
पालघर, दि. 15/8/2019

भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू असून लवकरच आपला जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार असून सर्वांनी मिळून एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देवू या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले. केद्र सरकाने कश्मीर बाबत 370 व 35 ए हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन करून आभार मानले.

पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालयाचे बांधकाम पुर्ण होत लवकरच जिल्हा प्रशासनाचे काम नवीन इमारतीतून सुरु होईल पुढील वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोहळा हा नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणावर होईल विश्वास पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

जिल्ह्यात सरासरी 2451.15 (141.9 टक्के) मिमी पावसाची नोंद झाल्याने सर्व धरणांमध्ये मूबलक पाणी साठा आहे. 3 व 4 ऑगस्ट या कालावधीतील अतिवृष्टीमूळे पुरात अडकलेल्या वसई, वाडा व पालघर तालुक्यातील 805 लोकांची सुटका करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी NDRF, भारतीय तट रक्षक दल, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा व स्थनिकांनी मोलाची मदत केली आहे. पुरपरिस्थिती मुळे मयत झालेल्या व्यक्तींना 48 लाखाची मदत देण्यात आली. मयत जनावरांच्या कुटूबांना नुकसानीपोटी 1 लाख 98 हजार रुपये, तर पावसाळ्यात पडझड झालेल्या 600 घरांना 33 लाख 56 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे बाधीत 3280 कुटूबांना प्रत्येकी 10 किलो तांदुळ, गहु व 5 लिटर केरोसीनची मदत देण्यात आली आहे. तसेच पिकांचे नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने पूर्ण करुन घेण्यात येत आहे.

जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाच्या धक्क्यांमुळे बाधित 1793 घरांना शासन निर्णयानुसार 6 हजार रुपयांप्रमाणे 1 कोटी 7 लाख 58 हजारांची तर दोन मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी दिली. भूकंपग्रस्त भागात NDRF चे 200 तंबू, 1219 टार्पोलिन शिट व बांबू तर 9 आश्रमशाळांसाठी मोठ्या तंबूंचे वाटप करण्यात आले आहे. 9 ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले असून नागरी संरक्षण दल व NDRF मार्फत जनजागृती सुरु आहे. भूकंपापासून सुरक्षिततेबाबत 10 हजार माहिती पुस्तिकांचे वाटपही करण्यात आले आहे. आयआयटीच्या प्रा. रवी सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण सुरु असल्याचे पालकमंत्र्यांंनी सांगितले.

आदिवासी बहुल जिल्हा असूनही औद्योगिकरणात राज्यात पालघर जिल्ह्याचा चौथा क्रमांक असून तारापूर औद्योगिक वसाहतीत होणारे प्रदूषण कमी करण्याबाबत MPCB कडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत. जिल्ह्यात 44384 वनहक्क दावे निकाली काढण्यात आले असून केवळ 1600 वैयक्तिक वनहक्क दावे प्रलंबित आहेेेत, हे दावे लवकरच निकाली काढण्यात येतील असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील मनोर येथे दोनशे खाटांचे सामान्य रुग्णालय व वीस खाटांचे ट्रॉमा केअरचे बांधकाम सुरु झाले आहे. तसेच पालघर येथे दोनशे खाटांचे जिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मंजूरी मिळाली असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध आहे. बोईसर व वाणगांव येथे प्रत्येकी 30 खाटांच्या रुग्णालयाचे विस्तारीकरण सुरु आहे. यामुळे नागरिकांना शाश्वत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहता या उद्योगासही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याने केळवा, बोर्डी, डहाणू या ठिकाणचे समुद्रकिनारे विकसित करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येत आहे, यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

पालघर पोलीस दलाच्या वतीने स्वतंत्र डिजीटल दूरसंचार व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पालघर पोलीस मुख्यालय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी सदैव संपर्कात राहून यापुढे पालघर पोलीस दल जास्तीत जास्त लोकाभिमूख होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.



Conclusion:
Last Updated : Aug 16, 2019, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.