ETV Bharat / state

सदानंद बाबांचा आश्रम वाचवण्यासाठी अनेकजणांचा पुढाकार; नेतेमंडळीसह नागरिकांचे आंदोलन

तुंगारेश्वर पर्वतावरील सदानंद बाबांचे आश्रम तोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. त्याचा निषेध म्हणून कोणतीही तोडफोड किंवा रास्ता रोको न करता शांततेच्या वातावरणात भजन करत अनोखे आंदोलन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

author img

By

Published : Aug 22, 2019, 9:11 PM IST

अनोखे आंदोलन

पालघर - वसईतील तुंगारेश्वर पर्वतावरील सदानंद बाबांचे आश्रम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यानंतर बाबांच्या भाविकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचा निषेध म्हणून कोणतीही तोडफोड किंवा रास्ता रोको न करता शांततेच्या वातावरणात भजन करत अनोखे आंदोलन केले. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, आमदार नरेंद्र मेहता, गायक दादुस पाटील, भिवंडी आगरीसेना अध्यक्ष सोन्या पाटील, जनार्धन पाटील, कैलास पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

नेतेमंडळीसह भक्त व गायकांनी केले आंदोलन

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, सदानंद बाबांचे आश्रम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. न्यायालयाचा आदर ठेवून चांगले वकील उभे करू, तसेच न्यायालयात कागदपत्रांचा न्यायालयात पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हरियाणाच्या धर्तीवर याचिका दाखल करु. केंद्र सरकारने तिथल्या अश्रामाबाबत जो निर्णय घ्यायचा ठरला आहे. तशा पद्धतीने याही ठिकाणी निर्णय घ्यावा. बालयोगी आश्रमाविषयी योग्यप्रकारे सुप्रीम कोर्टात मांडणी न केल्याने हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून त्याला पर्यायी मार्ग काढू. हा आश्रम वाचवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार गावित यांनी दिले. यावेळी बाबांचा भक्त आगरी लोकसंगीताचा गायक दादुस यांनी येथील माहोल पाहून आश्रमाला न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त केली आहे.

पालघर - वसईतील तुंगारेश्वर पर्वतावरील सदानंद बाबांचे आश्रम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यानंतर बाबांच्या भाविकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचा निषेध म्हणून कोणतीही तोडफोड किंवा रास्ता रोको न करता शांततेच्या वातावरणात भजन करत अनोखे आंदोलन केले. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, आमदार नरेंद्र मेहता, गायक दादुस पाटील, भिवंडी आगरीसेना अध्यक्ष सोन्या पाटील, जनार्धन पाटील, कैलास पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

नेतेमंडळीसह भक्त व गायकांनी केले आंदोलन

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, सदानंद बाबांचे आश्रम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. न्यायालयाचा आदर ठेवून चांगले वकील उभे करू, तसेच न्यायालयात कागदपत्रांचा न्यायालयात पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हरियाणाच्या धर्तीवर याचिका दाखल करु. केंद्र सरकारने तिथल्या अश्रामाबाबत जो निर्णय घ्यायचा ठरला आहे. तशा पद्धतीने याही ठिकाणी निर्णय घ्यावा. बालयोगी आश्रमाविषयी योग्यप्रकारे सुप्रीम कोर्टात मांडणी न केल्याने हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून त्याला पर्यायी मार्ग काढू. हा आश्रम वाचवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार गावित यांनी दिले. यावेळी बाबांचा भक्त आगरी लोकसंगीताचा गायक दादुस यांनी येथील माहोल पाहून आश्रमाला न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त केली आहे.

Intro:सद्नंद बाबांचा आश्रम वाचवण्यासाठी पालकमंत्री,खासदार,आमदारांसह गायक दासुस,धावले.Body:सद्नंद बाबांचा आश्रम वाचवण्यासाठी पालकमंत्री,खासदार,आमदारांसह गायक दासुस,धावले.
विपुल पाटील
पालघर / वसई .... वसईतील तुंगारेश्वर पर्वतावरील सदानंद बाबांचा आश्रम तोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्या नंतर बाबांच्या भाविकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचा निषेध म्हणून कोणतीही तोडफोड,रास्ता रोको न करता भक्तिभावाने भजन करून कोणालाही त्रास न देता संताना शोभेल असेच अनोखे आंदोलन केले. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,खासदार राजेंद्र गावित,प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,आमदार नरेंद्र मेहता. आगरी लोकगीतांचा गायक दादुस पाटील,भिवंडी अगरीसेना अध्यक्ष सोन्या पाटील ,जनार्धन पाटील,कैलास पाटील. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदानंद बाबांचा आश्रम हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे असे आवाहन केले न्यायालयाचा आदर ठेवून चांगले वकील उभेकरून कागदपत्रे न्यायालयात सादर करून पाठपुरवा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तयी जाहीर केले. तसेच खासदार राजेंद्र गावित यांनी सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे त्याचा मानसन्मान ठेवून मुख्यंमत्री आणि केंद्रसरकारच्या माध्यमातून हरियाणाच्या धर्तीवर याचिका दाखल करून केंद्रसरकारने तिथल्या अश्रामाबाबत जो निर्णय घ्यायचा ठरला आहे.तशा पद्धतीने याही ठिकाणी निर्णय घ्यावा. आणि खऱ्या अर्थाने बालयोगी आश्रम तांत्रिक दृष्ट्या वनविभागाने समाविष्ठ केला आहे.त्याची योग्यप्रकारे सुप्रीम कोर्टात मांडणी न केल्याने हा टेक्निकल मुद्दा क्रियेट झाला आहे.सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून त्याला पर्यायी मार्ग काढून हे आश्रम वाचवण्यासाठी निच्छित प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार गावित यांनी दिले. यावेळी बाबांचा भक्त आगरी लोकसंगीताचा गायक दादुस यांनी येथील माहोल पाहून आश्रमाला न्याय मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे.
BYTE .... रवींद्र चव्हाण (पालकमंत्री पालघर जिल्हा )
BYTE .... राजेंद्र गावित (खासदार पालघर )
BYTE .... दादुस पाटील (गायक )
BYTE .... जनार्धन पाटील (भाविक -आगरी सेना पालघर जिल्हाध्यक्ष ) Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.