ETV Bharat / state

'शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते तर अर्जुन खोतकर माझे चांगले मित्र'

author img

By

Published : Nov 24, 2020, 8:46 PM IST

Updated : Nov 24, 2020, 9:42 PM IST

शरद पवार व अर्जुन खोतकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर न देता रावसाहेब दानवे यांनी दोन पावले माघार घेत शरद पवारांना महाराष्ट्राचे मोठे नेते व अर्जुन खोतकर यांना मित्र संबोधले.

Raosaheb Danve
रावसाहेब दानवे

उस्मानाबाद - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हे सरकार दोन महिन्यात नाही तर कधीही पडू शकते आणि भाजप सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर शरद पवार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलेल्या टीके संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले शरद पवार यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही असे म्हणत शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले तर अर्जुन खोतकर यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर देत अर्जुन खोतकर हे माझे जवळचे मित्र आहेत. माझ्या आणि त्यांच्यात नेहमी चर्चा होत असतात. त्यांच्यामुळे मला ताकद मिळते व माझ्यामुळे खोतकर यांना ताकद मिळत असल्याचे सांगत अर्जुन खोतकर आणि शरद पवार यांनी केलेल्या टीकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर देणे टाळले.

पत्रकार परिषदेत बोलताना रावसाहेब दानवे
शरद पवार काय म्हणाले..रावसाहेब दानवे राजकारणात कधी 'ज्योतिषी' म्हणून ओळखले जात नव्हते. पण, आता मला माहीत झाले की त्यांच्यात ही प्रतिभादेखील आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देणे रावसाहेब दानवे यांनी टाळले असून ते महाराष्ट्राचे नेते असल्याचे सांगत चार पावले मागे घेतले.अर्जुन खोतकर काय म्हणाले - भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. स्वतःच्या पक्षातील आमदार टिकवून ठेवण्यासाठी उसने अवसान आणण्याचा प्रयत्न भाजप करत असून त्यामुळेच सरकारबद्दल काहीही बोललं जात आहे. तसेच आलेली सरकार टिकवता आले नाही आणि 2 महिन्यात सरकार स्थापनेचे स्वप्न पाहत आहेत. दोन महिने वाट पाहा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही.अशी अप्रत्यक्ष टीका अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली. या टीकेला दानवे यांनी सॉफ्ट कॉर्नर देत अर्जुन खोतकर माझे मित्र असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

उस्मानाबाद - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हे सरकार दोन महिन्यात नाही तर कधीही पडू शकते आणि भाजप सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर शरद पवार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलेल्या टीके संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले शरद पवार यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही असे म्हणत शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले तर अर्जुन खोतकर यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर देत अर्जुन खोतकर हे माझे जवळचे मित्र आहेत. माझ्या आणि त्यांच्यात नेहमी चर्चा होत असतात. त्यांच्यामुळे मला ताकद मिळते व माझ्यामुळे खोतकर यांना ताकद मिळत असल्याचे सांगत अर्जुन खोतकर आणि शरद पवार यांनी केलेल्या टीकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर देणे टाळले.

पत्रकार परिषदेत बोलताना रावसाहेब दानवे
शरद पवार काय म्हणाले..रावसाहेब दानवे राजकारणात कधी 'ज्योतिषी' म्हणून ओळखले जात नव्हते. पण, आता मला माहीत झाले की त्यांच्यात ही प्रतिभादेखील आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देणे रावसाहेब दानवे यांनी टाळले असून ते महाराष्ट्राचे नेते असल्याचे सांगत चार पावले मागे घेतले.अर्जुन खोतकर काय म्हणाले - भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. स्वतःच्या पक्षातील आमदार टिकवून ठेवण्यासाठी उसने अवसान आणण्याचा प्रयत्न भाजप करत असून त्यामुळेच सरकारबद्दल काहीही बोललं जात आहे. तसेच आलेली सरकार टिकवता आले नाही आणि 2 महिन्यात सरकार स्थापनेचे स्वप्न पाहत आहेत. दोन महिने वाट पाहा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही.अशी अप्रत्यक्ष टीका अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली. या टीकेला दानवे यांनी सॉफ्ट कॉर्नर देत अर्जुन खोतकर माझे मित्र असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
Last Updated : Nov 24, 2020, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.