ETV Bharat / state

आर्थिक परिस्थितीमुळे चक्क चारा छावणीतच केला विवाह

उस्मानाबादपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरे येथे असेच हटक्या पद्धतीने लग्न झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे चक्क जनावरांच्या चारा छावणीत लग्न केले आहे.

author img

By

Published : May 29, 2019, 11:31 PM IST

Updated : May 30, 2019, 12:02 AM IST

चारा छावणीतच केला विवाह


उस्मानाबाद - लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. आपले लग्न कायम लक्षात राहावे, यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करतात. उस्मानाबादपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरे येथे असेच हटक्या पद्धतीने लग्न झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे चक्क जनावरांच्या चारा छावणीत लग्न केले आहे. सतीश सोमण यांच्या पुढाकाराने हा लग्न सोहळा पार पडला.

जनावरांच्या चारा छावणीत मंडप आणि लोकांची गर्दी पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलीची लग्न या चारा छावणीत पार पडत आहेत. लग्नासाठी बँड-बाजा, जेवण, स्टेज, वऱ्हाडी मंडळी, मंडप या सगळ्या काही गोष्टींची तयारी याच छावणीत करण्यात आली होती.

सध्या मराठवाड्यासह विदर्भातल्या काही भागांमध्ये भयाण दुष्काळ आहे. या दुष्काळाने घरातील मुलींची लग्न होत नसल्याने, अनेक शेतकरी आपल्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे, अशी घरच्यांची इच्छा असते. मात्र, दुष्काळामुळे अतिशय थाटामाटात लग्न करणे अशक्य झाले आहे. सतीश सोमण यांनी मोडीत निघालेली दोन लग्न जुळवली. आज त्यांनी दोन्ही लग्न चारा छावणीत लावून दिली. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी चारा छावणीत लावण्यात आलेले लग्न हा महाराष्ट्रातील एकमेव प्रयोग असेल.

मोठा खर्च करून करण्यात येत असलेल्या लग्नाला फाटा देत कमी खर्चात सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न व्हायला पाहिजेत. गावात प्रतिष्ठा राखण्यासाठी अगदी कर्ज काढूनही लग्न केली जातात. मात्र, या चारा छावणीत केलेले हे लग्न महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते.


उस्मानाबाद - लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. आपले लग्न कायम लक्षात राहावे, यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करतात. उस्मानाबादपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरे येथे असेच हटक्या पद्धतीने लग्न झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे चक्क जनावरांच्या चारा छावणीत लग्न केले आहे. सतीश सोमण यांच्या पुढाकाराने हा लग्न सोहळा पार पडला.

जनावरांच्या चारा छावणीत मंडप आणि लोकांची गर्दी पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलीची लग्न या चारा छावणीत पार पडत आहेत. लग्नासाठी बँड-बाजा, जेवण, स्टेज, वऱ्हाडी मंडळी, मंडप या सगळ्या काही गोष्टींची तयारी याच छावणीत करण्यात आली होती.

सध्या मराठवाड्यासह विदर्भातल्या काही भागांमध्ये भयाण दुष्काळ आहे. या दुष्काळाने घरातील मुलींची लग्न होत नसल्याने, अनेक शेतकरी आपल्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे, अशी घरच्यांची इच्छा असते. मात्र, दुष्काळामुळे अतिशय थाटामाटात लग्न करणे अशक्य झाले आहे. सतीश सोमण यांनी मोडीत निघालेली दोन लग्न जुळवली. आज त्यांनी दोन्ही लग्न चारा छावणीत लावून दिली. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी चारा छावणीत लावण्यात आलेले लग्न हा महाराष्ट्रातील एकमेव प्रयोग असेल.

मोठा खर्च करून करण्यात येत असलेल्या लग्नाला फाटा देत कमी खर्चात सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न व्हायला पाहिजेत. गावात प्रतिष्ठा राखण्यासाठी अगदी कर्ज काढूनही लग्न केली जातात. मात्र, या चारा छावणीत केलेले हे लग्न महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते.

Intro:हे pkg आहेत व त्यासाठी लागणारे byte व vis आहेत


अँकर- उस्मानाबाद- लग्न म्हटलं की प्रत्येकाची एक वेगळी इच्छा असते आज काल एक वेगळाच ट्रेंड निघतोय कोणी विमानात लग्न करतोय तर कोणी समुद्रात. लग्नाची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून हटके फंडे वापरले जातात उस्मानाबाद पासून वीस किलोमीटर असलेल्या तेरे येथे अशाच हटक्या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे मात्र याचं कारण आर्थिक गरिबी आहे


व्हिओ- या माळरानावर टी जनावरांच्या चारा छावणीत मंडप आणि लोकांची गर्दी पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटत असेल पण होय ही कमान आणि हा मंडप येथे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आहेत आणि लोक एकमेकांची पाहुणे आहेत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील आई चारा छावणीत जनावरे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीची लग्न या चारा छावणीत पार पडत आहेत. लग्नासाठी बँड- बाजा, जेवण, नवरा नवरी चा नट्टापट्टा,स्टेज, वऱ्हाडी मंडळी, मंडप या सगळ्या काही गोष्टींची तयारी ह्याच छावणीत करण्यात आली चारा चवणी होत असलेले हे लग्न इतर लग्नाप्रमाणेच होत असल्याने नवरा नवरी आनंदी झाले आहेत


byte- नवरी (सोनाली)

byte- नवरी (निकिता)

व्हिओ- दुष्काळ माणसाच्या जीवावर उठलाय या दुष्काळाने घरातील मुलींची लग्न होत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या गळ्याभोवती मृत्यूचा फास अवळतात त्याचबरोबर नवरदेव आणि नवरदेवा कडील मंडळींची आपल्या मुलाच लग्न मोठ व्हावं अशाच अशा-अपेक्षा असतात मात्र सध्याच्या दुष्काळामुळे लग्न करणं आणि अतिशय थाटामाटात करणे अशक्य झाले आहे असंच मोडीत निघाले लग्न सतीश सोमण यांनी जुळवून याच मंडपात दोन जोडपी विवाहबद्ध केली आहेत संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी या चारा छावणीत लावण्यात आलेल्या लग्न महाराष्ट्रातील एकमेव प्रयोग असेल

byte- नवरदेव

byte- नवरदेव

byte- सतीश सोमाणी


व्हिओ- भला मोठा खर्च करून करण्यात येत असलेली लग्न याला फाटा देत कमी खर्चात सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न व्हायला पाहिजेत गावात प्रतिष्ठा राखण्यासाठी अगदी कर्ज काढूनही लग्न केली जातात मात्र या चारा छावणीत केलेले हे लग्न महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते


Body:सर्व byte व vis आहेत


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : May 30, 2019, 12:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.