ETV Bharat / state

संतप्त महिलांनी उस्मानाबाद नगरपरिषदेला ठोकले टाळे, कर्मचाऱ्यांना कोंडले!

मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी 20 नोव्हेंबरला महिलांनी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट नगरपरिषदेलाच कुलूप लावले.

author img

By

Published : Dec 27, 2019, 6:32 PM IST

आंदोलन
आंदोलन

उस्मानाबाद - नगरपरिषदेत शुक्रवारी महिलांनी जोरदार गोंधळ घातला. मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी 20 नोव्हेंबरला महिलांनी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट नगरपरिषदेलाच कुलूप लावले.

महिलांनी उस्मानाबाद नगरपरिषदेला कुलूप लावले


शहरातील वासुदेव वाडी या भागात 18 नोव्हेंबरला सात वर्षीय चैत्राली सिंगनाथ या मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाला होता. या परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळेच चैत्रालीला डेंग्यु झाला आहे. चैत्रालीच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषदच जबाबदार असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या महिलांनी केली. या अधिकाऱ्यांवर 302 कलमप्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, परिसराची स्वच्छता करावी, वेळेवर पाणी पुरवठा करावा, घंटागाडी दररोज पाठवावी या विविध मागण्यांसाठी हे निवेदन दिले होते.

हेही वाचा - ब्रिटिशकालीन मंडईचे रूपडे पालटणार, लक्ष्मी मंडई होणार अत्याधुनिक

महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून अधिकाऱ्यांना आत कोंडले. काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दरवाजा आतून जोरात ओढल्याने दरवाजाची कडी मोडली. यानंतर या अधिकाऱ्यांची सुटका झाली. आंदोलक महिला आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, महिलांनी आपला रुद्रावतार दाखवल्यानंतर नगरपरिषदेने मागण्या लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले.

उस्मानाबाद - नगरपरिषदेत शुक्रवारी महिलांनी जोरदार गोंधळ घातला. मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी 20 नोव्हेंबरला महिलांनी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट नगरपरिषदेलाच कुलूप लावले.

महिलांनी उस्मानाबाद नगरपरिषदेला कुलूप लावले


शहरातील वासुदेव वाडी या भागात 18 नोव्हेंबरला सात वर्षीय चैत्राली सिंगनाथ या मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाला होता. या परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळेच चैत्रालीला डेंग्यु झाला आहे. चैत्रालीच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषदच जबाबदार असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या महिलांनी केली. या अधिकाऱ्यांवर 302 कलमप्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, परिसराची स्वच्छता करावी, वेळेवर पाणी पुरवठा करावा, घंटागाडी दररोज पाठवावी या विविध मागण्यांसाठी हे निवेदन दिले होते.

हेही वाचा - ब्रिटिशकालीन मंडईचे रूपडे पालटणार, लक्ष्मी मंडई होणार अत्याधुनिक

महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून अधिकाऱ्यांना आत कोंडले. काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दरवाजा आतून जोरात ओढल्याने दरवाजाची कडी मोडली. यानंतर या अधिकाऱ्यांची सुटका झाली. आंदोलक महिला आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, महिलांनी आपला रुद्रावतार दाखवल्यानंतर नगरपरिषदेने मागण्या लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले.

Intro:नगरपालिका कर्मचाऱ्यांनाच कोंडले नगरपरिषदेत;शहरातील महिलांचा मूलभूत सुविधेसाठी संताप


उस्मानाबाद- नगरपालिकेत आज महिलांनी तुफान राडेबाजी केली. मूलभूत सोयी सुविधांसाठी शहरातील महिलांनी नगरपरिषद कुलूप लावून बंद केली. 20 नोव्हेंबर रोजी महिलांनी निवेदन दिले होते याला जिजाऊ ब्रिगेड नाही समर्थन देत मूलभूत सोयी सुविधा व विविध मागण्यासाठी निवेदन दिले होते या निवेदनात,शहरातील वासुदेव वाडी या भागात 18 नोव्हेंबर रोजी सात वर्षीय चैत्राली सिंगनाथ या चिमुरड्या मुलीचा डेंगूमुळे मृत्यू झाला होता परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे चैत्रालीला डेंगू झाला. त्यामुळे चैत्रालीच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपालिका जबाबदार असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भरती कारवाई करावी, 302 प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच परिसरातील स्वच्छता करावी,वेळेवर पाणी पुरवठा करावा, घंटागाडी दररोज पाठवावी अश्या विविध मागण्यांसाठी हे निवेदन दिले होते मात्र तरीही नगरपरिषदेने कुठलीही पावले उचलले नाहीत त्यामुळे आज महिलांनी नगरपरिषदे वरती येऊन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत नगर परिषदेच्या मुख्य मुख्य दरवाजाला कुलूप लावतात नगर परिषद बंद केली यावेळी काही अधिकाऱ्यांना आत मध्ये कोंडले. शेवटी काही वेळानी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेचा दरवाजा आत मधून ओढला यावेळी दरवाजे ची कोंडी मोडली त्यानंतर या अधिकाऱ्यांची सुटका झाली मात्र तरीही महिलांनी दरवाजा का लावला असे म्हणत आंदोलन महिलांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक झटापट झाली मात्र महिलांनी आपला इंगा दाखवल्यानंतर नगरपरिषदेला जाग आली आणि तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले या महिलांनी तब्बल एक तास नगरपरिषदेला कुलूप घातल्याने शहरातही या आंदोलनाची चर्चा झाली


Body:हे पॅकेज व्हिओ देऊन एडिट करून


Conclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.