ETV Bharat / state

उस्मानाबादेत पाच दिवसापासून पावसाची रिपरिप सुरुच; शेतकऱ्यांना दिलासा

author img

By

Published : Aug 3, 2019, 7:42 AM IST

गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण जिल्हाभर वरुणराजा चांगला बरसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरी तर एकदमच धो-धो पडणारा पाऊस, यामुळे नागरिक सुखावले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

उस्मानाबाद - दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाभर वरुणराजा चांगला बरसत आहे. ढगाळ वातावरण असल्याने गेल्या पाच दिवसापासून उस्मानाबादकरांना सूर्यदर्शनही मिळालेले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरी तर एकदमच धो-धो पडणारा पाऊस, यामुळे नागरिक सुखावले आहे.

उस्मानाबाद शहराने पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी सर्वांनीच वरुण राजाकडे हात जोडले. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले तरीही जिल्ह्यात पाऊस पडत नव्हता. परिणामी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गेल्या पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे तात्पुरता का होईना पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटेल, अशी अशा लागली आहे. शिवाय पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

उस्मानाबाद - दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाभर वरुणराजा चांगला बरसत आहे. ढगाळ वातावरण असल्याने गेल्या पाच दिवसापासून उस्मानाबादकरांना सूर्यदर्शनही मिळालेले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरी तर एकदमच धो-धो पडणारा पाऊस, यामुळे नागरिक सुखावले आहे.

उस्मानाबाद शहराने पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी सर्वांनीच वरुण राजाकडे हात जोडले. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले तरीही जिल्ह्यात पाऊस पडत नव्हता. परिणामी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गेल्या पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे तात्पुरता का होईना पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटेल, अशी अशा लागली आहे. शिवाय पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

Intro:जिल्ह्यात पाच दिवसापासून सूर्यदर्शन नाही ..

उस्मानाबाद- दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना संपूर्ण जिल्हाभर वरुणराजा चांगला बरसत आहे त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून उस्मानाबाद करांना सूर्यदर्शनही मिळालेली नाही दिवसभर ढगाळ वातावरण तर अधूनमधून येणारे रिमझिम सरी तर एकदमच धो धो पडणारा पाऊस त्याच्यामुळे जिल्हावासीय सुखावले आहेत उस्मानाबादकरांना पाणीटंचाईने सतावले होते त्याच्यामुळे पाऊस पडावा यासाठी सर्वांनीच निसर्ग राजा कडे हात जोडले मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले तरीही ही जिल्ह्यात पाऊस पडत नव्हता त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या तर आज घडीला ही 200 पेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता मात्र गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तात्पुरता का होईना पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटेल अशी अशा लागली आहे तर पिकांना थोडाबहुत आधार भेटला आहे


Body:यात vis आहेत


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.