उस्मानाबाद - गोरोबांच्या नगरीमध्ये साहित्याचा मेळा भरला आहे. उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागात अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, उद्घाटन कार्यक्रम आणि निमंत्रितांचे कवी संमेलनाचे कार्यक्रम पार पडले. याच पार्श्वभूमीवर साहित्य रसिकांशी आणि साहित्यिकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी चर्चा केली.
हेही वाचा - 'मी येथे आलोय.. तुमच्या समोर आहे..पाहून घ्या'
या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने अजूनही ग्रामीण साहित्याची भूक कायम असल्याची भावना येथील रसिकांनी व्यक्त केली. या साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थितीमुळे त्यांच्यात सहित्याची भर नक्कीच पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. साहित्य संमेलनाने खूप काही दिले आहे. उस्मानाबादकरांचे प्रेम आणि महामंडळाच्या सहकार्याने हा अभूतपूर्व सोहळा पार पडत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी कवी उद्धव कानडे यांनी कविताही सादर केली.