ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एकाच दिवशी विनयभंगाच्या तीन तक्रारी - usmanabad crime news

हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरण ताजे असताना गुरुवारी उस्मानाबाद जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

3-case-of-harassment-registered-in-usmanabad-in-one-day
उस्मानाबादमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एकाच दिवशी विनयभंगाच्या तीन तक्रारी
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:12 AM IST

उस्मानाबाद - हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरण ताजे असताना गुरुवारी जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - ..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम

शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणीच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उमेश पवारसह अन्य तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. ढोकी पोलीस ठाणे येथे पप्पू दगडू कांबळेविरुध्द महिलेला जिवंत ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तर अशीच घटना भूम येथे घडली असून बाबासाहेब यशवंता कुटेविरुध्द महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तीन विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकारामुळे महिलांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंगाच गुन्हा दाखल झाला असला तरी जिल्ह्यात अशा तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

उस्मानाबाद - हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरण ताजे असताना गुरुवारी जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - ..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम

शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणीच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उमेश पवारसह अन्य तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. ढोकी पोलीस ठाणे येथे पप्पू दगडू कांबळेविरुध्द महिलेला जिवंत ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तर अशीच घटना भूम येथे घडली असून बाबासाहेब यशवंता कुटेविरुध्द महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तीन विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकारामुळे महिलांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंगाच गुन्हा दाखल झाला असला तरी जिल्ह्यात अशा तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

Intro:जिल्ह्यात एकाच दिवशी तीन विनयभंगाच्या तक्रारी; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


उस्मानाबाद- हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरण ताजं असताना आज जिल्ह्यामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत उस्मानाबाद शहरात आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये एका तरुणीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उमेश पवार व अन्य तिघांविरुद्ध मारहाण शिवीगाळ तसेच अश्लील पद्धतीने हात लावून एका तरुणीचा विनयभंग केल्या असल्याची नोंद आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे तर जिल्ह्यातील ढोकी पोलिस स्टेशन येथे पप्पू दगडू कांबळे याने महिलेला जिवंत ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केला असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे तर अशीच घटना भूम येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून बाबासाहेब यशवंता कुटे याने लैंगिक उद्देशाने महिलेला पकडून तिचा विनयभंग केला अशा आशयाची याची तक्रार महिलेने दिली आहे आज जवळपास जिल्ह्यात तीन विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाले असून महिलांबद्दलच्या कायदा व सुव्यवस्था याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे उमेश पवार पप्पू कांबळे व बाबासाहेब कुटे या तिघांविरुद्ध जरी विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी जिल्ह्यात अशा तक्रारींचे प्रमाण वाढत आहेBody:हे एडिट pkg पाठवत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.