ETV Bharat / state

मनमाड जंक्शन पूर्वपदावर येण्यास सुरुवात; सुरक्षेचे नियम पाळत प्रवासी वाहतूक सुरु

author img

By

Published : Jun 3, 2020, 6:47 PM IST

रेल्वे प्रशासनाने २०० प्रवासी गाड्या सुरू केल्या आहेत.यापैकी १९ गाड्या मनमाड स्थानकावर थांबून जाणार आहेत.या गाड्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे.

manmad railway junction
मनमाड रेल्वे जंक्शन
Manmad
मनमाड रेल्वे जंक्शन

मनमाड(नाशिक)- उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या मनमाड जंक्शन स्थानकावर तब्बल अडीच महिन्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. रेल्वेने सुरू केलेल्या २०० गाड्यापैकी जवळपास १९ गाड्या मनमाड स्थानकावरून ये जा करण्यास सुरवात झाली आहे.त्या गाड्यामधून प्रवासी येण्या आणि जाण्यास सुरुवात झालीय. मनमाड मधून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासाच्या किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक असून आल्यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप करणे व सामान सॅनिटायझ करूनच त्यांना स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

भारताच्या टॉप १०० रेल्वे स्थानकाच्या सूचित स्थान असलेले मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक आहे. येथून दररोज जवळपास १५० च्या वर प्रवासी गाड्या ये जा करतात.यातून हजारो प्रवासी देखील प्रवास करतात.अनेकांना शिर्डी,शनिशिंगणापूर, औरंगाबाद मनमाड येथील गुरुद्वारा आदी ठिकाणच्या धार्मिक स्थळांवर जाण्यासाठी हे महत्वाचे आणि अत्यंत सोयीचे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकास विशेष महत्व आहे.

रेल्वे प्रशासनाने जवळपास २०० प्रवासी गाड्या सुरू केल्या आहेत.यापैकी १९ गाड्या या मनमाड स्थानकावर थांबून जाणार आहेत.या गाड्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासाचे तिकीट आरक्षित असले तरच सध्या स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.

स्थानकावर जाण्याआधी प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेल्या मेडिकल चेकअप केंद्रावर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून आजारी असल्यास प्रवास करणाऱ्यास मनाई करण्यात येत आहे. प्रवाशांच्या साहित्यावर सॅनिटायझर मारून ते निर्जंतुकीकरण करूनच प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

सध्या प्रवाशांना एकाच ठिकाणावरुन प्रवेश देण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमी असल्याने आता अडचण नाही. मात्र,भविष्यात यासाठी अजून जास्त कर्मचारी व यंत्रणा राबवावी लागणार आहे.मात्र, कायम हजारो लोकांची वर्दळ असणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकावर अडीच महिन्याच्या ब्रेकनंतर पुन्हा रेलचेल सुरू झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवासासाठी दीड तास आगोदर यावे लागणार स्थानकावर......!

सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असुन प्रवासी रेल्वे सुरू केल्यानंतर प्रवास करण्यासाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. त्यानुसार गाडी सुटण्याच्या वेळेच्या सुमारे दीड तास अगोदर स्थानकावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे.दीड तास आगोदर येऊन मेडिकल तपासणी करूनच प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

विमानतळासारखी व्यवस्था

विमानाने प्रवास करण्यासाठी जसे दीड तास अगोदर जाणे बंधनकारक आहे. तसेच रेल्वे स्थानकावर देखील करण्यात आले आहे. यामुळे प्रवास करताना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. सुरक्षित प्रवास होण्यास निश्चितच फायदा होईल.आमचे सामान आणि आमची तपासणी झाल्यानंतरच प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.रेल्वेचा निर्णय योग्य आहे, असे सुरेखा भावसार या प्रवासी महिलेने सांगितले.

Manmad
मनमाड रेल्वे जंक्शन

मनमाड(नाशिक)- उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या मनमाड जंक्शन स्थानकावर तब्बल अडीच महिन्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. रेल्वेने सुरू केलेल्या २०० गाड्यापैकी जवळपास १९ गाड्या मनमाड स्थानकावरून ये जा करण्यास सुरवात झाली आहे.त्या गाड्यामधून प्रवासी येण्या आणि जाण्यास सुरुवात झालीय. मनमाड मधून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासाच्या किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक असून आल्यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप करणे व सामान सॅनिटायझ करूनच त्यांना स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

भारताच्या टॉप १०० रेल्वे स्थानकाच्या सूचित स्थान असलेले मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक आहे. येथून दररोज जवळपास १५० च्या वर प्रवासी गाड्या ये जा करतात.यातून हजारो प्रवासी देखील प्रवास करतात.अनेकांना शिर्डी,शनिशिंगणापूर, औरंगाबाद मनमाड येथील गुरुद्वारा आदी ठिकाणच्या धार्मिक स्थळांवर जाण्यासाठी हे महत्वाचे आणि अत्यंत सोयीचे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकास विशेष महत्व आहे.

रेल्वे प्रशासनाने जवळपास २०० प्रवासी गाड्या सुरू केल्या आहेत.यापैकी १९ गाड्या या मनमाड स्थानकावर थांबून जाणार आहेत.या गाड्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासाचे तिकीट आरक्षित असले तरच सध्या स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.

स्थानकावर जाण्याआधी प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेल्या मेडिकल चेकअप केंद्रावर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून आजारी असल्यास प्रवास करणाऱ्यास मनाई करण्यात येत आहे. प्रवाशांच्या साहित्यावर सॅनिटायझर मारून ते निर्जंतुकीकरण करूनच प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

सध्या प्रवाशांना एकाच ठिकाणावरुन प्रवेश देण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमी असल्याने आता अडचण नाही. मात्र,भविष्यात यासाठी अजून जास्त कर्मचारी व यंत्रणा राबवावी लागणार आहे.मात्र, कायम हजारो लोकांची वर्दळ असणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकावर अडीच महिन्याच्या ब्रेकनंतर पुन्हा रेलचेल सुरू झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवासासाठी दीड तास आगोदर यावे लागणार स्थानकावर......!

सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असुन प्रवासी रेल्वे सुरू केल्यानंतर प्रवास करण्यासाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. त्यानुसार गाडी सुटण्याच्या वेळेच्या सुमारे दीड तास अगोदर स्थानकावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे.दीड तास आगोदर येऊन मेडिकल तपासणी करूनच प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

विमानतळासारखी व्यवस्था

विमानाने प्रवास करण्यासाठी जसे दीड तास अगोदर जाणे बंधनकारक आहे. तसेच रेल्वे स्थानकावर देखील करण्यात आले आहे. यामुळे प्रवास करताना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. सुरक्षित प्रवास होण्यास निश्चितच फायदा होईल.आमचे सामान आणि आमची तपासणी झाल्यानंतरच प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.रेल्वेचा निर्णय योग्य आहे, असे सुरेखा भावसार या प्रवासी महिलेने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.