ETV Bharat / state

नाशिक पुराच्या जुन्या आठवणी; नारोशंकराच्या घुमटावर चढून धर्मराज पाटलांनी वाचवले होते साधूंचे प्राण

1939 साली गोदावरी नदीला महापूर आला होता. यावेळी पाण्यात अडकलेल्या काही साधूंना वाचवण्याचे काम धर्मराज पाटलांनी आपल्या सहकार्यांसमवेत केले होते.

author img

By

Published : Aug 6, 2019, 10:06 AM IST

धर्मराज पाटील

नाशिक- 1939 सालची घटना. दिवस-रात्र नुसता पाऊस कोसळत होता. अखंड पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. पंचवटी येथील सरकार वाड्याच्या 11 पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या. थेट चांदवडकर लेन पर्यंत पाणी आले होते. महापुरामुळे दुतोंड्या मारुती बुडाला होता. नारोशंकराच्या घुमटावर काही साधू जीव वाचवण्यासाठी चढले होते. परंतु पाणी वाढतच गेल्यामुळे हे साधू महापुरात अडकून गेले होते. त्यांना वाचवायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, अशा वेळेस जीवाची पर्वा न करता चिवडा उद्योगाचे संचालक तसेच अभिनेता आणि पैलवान असलेले धर्मराज पाटील यांनी त्यांचे सहकारी साथीदार मोहन प्यारे यांच्यासमवेत विक्टोरिया(आताचा अहिल्याबाई होळकर) पुलावरून उड्या घेतल्या आणि पोहत नारोशंकराच्या मंदिराचा घुमट गाठला. अथक प्रयत्न करून ह्या दोघांनी साधूंना वाचवले.

नाशिक पुराच्या जुन्या आठवणी

पुरात येणाऱ्या भोवऱ्याला चुकवून पोहणे म्हणजे साक्षात मृत्यूला चकवा देणे. मात्र अशा परिस्थितीत धर्मराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि आत्मविश्वासामुळे त्या काळी अनेकांना जीवदान मिळाले. या शौर्यासाठी ब्रिटिश सरकारकडून सोन्याचा मुलामा असलेला भोपळा धर्मराज पाटील यांना बक्षीस म्हणून देण्यात आला होता. इतक्या वर्षांनी आलेल्या महापुरामुळे आज धर्मराज पाटील यांच्या आठवणींना मुलगी योजना बुरकुले यांनी उजाळा दिला...

नाशिक- 1939 सालची घटना. दिवस-रात्र नुसता पाऊस कोसळत होता. अखंड पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. पंचवटी येथील सरकार वाड्याच्या 11 पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या. थेट चांदवडकर लेन पर्यंत पाणी आले होते. महापुरामुळे दुतोंड्या मारुती बुडाला होता. नारोशंकराच्या घुमटावर काही साधू जीव वाचवण्यासाठी चढले होते. परंतु पाणी वाढतच गेल्यामुळे हे साधू महापुरात अडकून गेले होते. त्यांना वाचवायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, अशा वेळेस जीवाची पर्वा न करता चिवडा उद्योगाचे संचालक तसेच अभिनेता आणि पैलवान असलेले धर्मराज पाटील यांनी त्यांचे सहकारी साथीदार मोहन प्यारे यांच्यासमवेत विक्टोरिया(आताचा अहिल्याबाई होळकर) पुलावरून उड्या घेतल्या आणि पोहत नारोशंकराच्या मंदिराचा घुमट गाठला. अथक प्रयत्न करून ह्या दोघांनी साधूंना वाचवले.

नाशिक पुराच्या जुन्या आठवणी

पुरात येणाऱ्या भोवऱ्याला चुकवून पोहणे म्हणजे साक्षात मृत्यूला चकवा देणे. मात्र अशा परिस्थितीत धर्मराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि आत्मविश्वासामुळे त्या काळी अनेकांना जीवदान मिळाले. या शौर्यासाठी ब्रिटिश सरकारकडून सोन्याचा मुलामा असलेला भोपळा धर्मराज पाटील यांना बक्षीस म्हणून देण्यात आला होता. इतक्या वर्षांनी आलेल्या महापुरामुळे आज धर्मराज पाटील यांच्या आठवणींना मुलगी योजना बुरकुले यांनी उजाळा दिला...

Intro:जीवाची पर्वानं करता धर्मराज पाटील यांनी वाचवले होते अनेक साधूंचे प्राण..पुराच्या जुन्या आठवणींना उजाळा...


Body:नाशिकची 1939 सालची घटना,देश पारतंत्र्यात होता,पावसाळ्याला सुरूवात होऊन, पावसाने थैमान मांडायला सुरुवात केली होती, दिवस-रात्र नुसता पाऊस कोसळत होता ,त्या काळीसुद्धा पावसाचं रुद्ररूप भयंकर होतं,अखंड पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला महापुर आला होता,पंचवटी येथील सरकार वाड्याच्या 11 पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या,थेट चांदवडकर लेन पर्यंत पाणी आलं होतं, त्या काळी फक्त विक्टोरिया ब्रिज होता, म्हणजे सध्याचा अहिल्याबाई होळकर ब्रिज, त्याकाळी रामसेतू पुल आणि गाडगे महाराज पूल सुद्धा अस्तित्वात नव्हते,अहोरात्र पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीला महापूर आला होता, विक्टोरिया पूल पर्यंत पाणी आलं होतं, नाशिक शहरात सर्वत्र बचाव कार्य आणि मदतकार्य सुरू झालं होतं,

धर्मराज पाटील हे नवीन चिवडा या सुप्रसिद्ध चिवडा उद्योगाचे संचालक तसेच अभिनेता आणि पैलवान सुद्धा,महापुरामुळे दुतोंड्या मारुती बुडाला होता, नारोशंकराच्या घुमटावर काही साधू जीव वाचवण्यासाठी चढले चालू ,परंतु पाणी वाढतच गेल्यामुळे हे साधू महापुरात बुडुन अडकून गेले होते,त्यांना वाचवायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालायचा,अशा वेळेस जीवाची पर्वा न करता धर्मराज पाटील यांनी त्यांचे सहकारी साथीदार मोहन प्यारे पैलवान यांनी विक्टोरिया पुलावरून उड्या घेतल्या आणि पोहत नारोशंकराच्या मंदिरच्या घुमटा पर्यंत पोहोचले आणि अथक प्रयत्न करून ह्या दोघांनी साधूंना वाचवले, नेहमी पोहणं आणि पुराच्या पाण्यात पोहून यात जमीस्मानचा फरक आहे, पुरात येणाऱ्या भोवऱ्याला चुकवून पोहणे म्हणजे साक्षात मृत्यूला चकवा देणे, मात्र अशा परिस्थितीत धर्मराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि आत्मविश्वास मुळे त्या काळी त्यांनी अनेकांना जीवदान मिळालं, यात या शौर्यासाठी ब्रिटिश सरकारकडून सुद्धा त्यांना सोन्याचा मुलामा असलेला भोपळा भेट धर्मराज पाटील यांना बक्षीस म्हणून देण्यात आला होता, इतक्या वर्षांनी आलेल्या महापुरामुळे आज धर्मराज पाटील यांच्या आठवणींना मुलगी योजना बुरकुले यांनी उजाळा दिला...
बाईट योजना बुरकुले
वासुदेव दशपुत्रे जेष्ठ नागरिक
टीप सोबत धर्मराज पाटील यांचा फोटो जोडला आहे..


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.