ETV Bharat / state

पालिकेच्यावतीने खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, सोशल मिडियावर खिल्ली - मनमाड नगरपालिका

'गोलमाल हैं, भाई सब गोलमाल है' या गाण्याला कामाच्या व्हिडिओशी एडिट करून सध्या फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटरवर व्हायरल केले जात आहे. यानंतर तरी पालिकेने कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणीही सोशल मीडियावर केली जात आहे.

मनमाड पालिकेच्यावतीने खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, सोशल मिडियावर खिल्ली
author img

By

Published : Nov 8, 2019, 8:19 PM IST

नाशिक - मनमाड नगरपालिकेतर्फे सध्या शहरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले गेले आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पालिकेच्यावतीने या खड्ड्यात मुरुमाच्या नावाखाली फक्त माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार होते. या कामाची दखल आता शहरातील युवा पिढीने हाती घेतली असून या कामाचा व्हिडिओ तयार करून सध्या सोशल मीडियावर पालिकेच्या या कामाची खिल्ली उडवली जात आहे.

मनमाड पालिकेच्यावतीने खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, सोशल मिडियावर खिल्ली

मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली होती. याबाबत वेळोवेळी तक्रारी गेल्यानंतर पालिकेकडून या रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली गेली. मात्र, या डागडुजीत मुरुमाच्या ऐवजी फक्त मातीचा वापर होत आहे. यामुळे पाऊस आल्यावर पुन्हा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन खड्डे पुन्हा तयार होत आहेत. याबाबत कुणीही काही बोलण्यास तयार नसल्याने शहरातील तरुण वर्गाने या कामाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून पालिकेला ट्रोल करण्याचा सपाटा लावला आहे. 'गोलमाल हैं, भाई सब गोलमाल है' या गाण्याला कामाच्या व्हिडीओशी एडिट करून सध्या फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटरवर व्हायरल केला जात आहे. यानंतर तरी पालिकेने कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणीही सोशल मीडियावर केली जात आहे.

मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, पालिकेकडून खडी, डांबर या वस्तू न वापरता फक्त माती टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पुन्हा खड्डे तयार होतील. त्यामुळे किमान पालिकेने या खड्ड्यात खडी टाकून रोलर फिरवावे, अशी मागणी जनता करत आहे.

नाशिक - मनमाड नगरपालिकेतर्फे सध्या शहरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले गेले आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पालिकेच्यावतीने या खड्ड्यात मुरुमाच्या नावाखाली फक्त माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार होते. या कामाची दखल आता शहरातील युवा पिढीने हाती घेतली असून या कामाचा व्हिडिओ तयार करून सध्या सोशल मीडियावर पालिकेच्या या कामाची खिल्ली उडवली जात आहे.

मनमाड पालिकेच्यावतीने खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, सोशल मिडियावर खिल्ली

मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली होती. याबाबत वेळोवेळी तक्रारी गेल्यानंतर पालिकेकडून या रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली गेली. मात्र, या डागडुजीत मुरुमाच्या ऐवजी फक्त मातीचा वापर होत आहे. यामुळे पाऊस आल्यावर पुन्हा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन खड्डे पुन्हा तयार होत आहेत. याबाबत कुणीही काही बोलण्यास तयार नसल्याने शहरातील तरुण वर्गाने या कामाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून पालिकेला ट्रोल करण्याचा सपाटा लावला आहे. 'गोलमाल हैं, भाई सब गोलमाल है' या गाण्याला कामाच्या व्हिडीओशी एडिट करून सध्या फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटरवर व्हायरल केला जात आहे. यानंतर तरी पालिकेने कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणीही सोशल मीडियावर केली जात आहे.

मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, पालिकेकडून खडी, डांबर या वस्तू न वापरता फक्त माती टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पुन्हा खड्डे तयार होतील. त्यामुळे किमान पालिकेने या खड्ड्यात खडी टाकून रोलर फिरवावे, अशी मागणी जनता करत आहे.

Intro:मनमाड नगरपालिकेतर्फे सध्या शहरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले गेले आहे.मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन पालिकेच्या वतीने या खड्ड्यात मुरुमाच्या नावाखाली फक्त माती टाकण्यात येत असल्याने पाऊस आल्यानंतर पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार होते या कामाची दखल आता शहरातील युवा पिढीने हाती घेतली असुन या कामाचा व्हिडीओ तयार करून सध्या सोशल मीडियावर पालिकेच्या या कामाची खिल्ली उडवली जात आहे.Body:मनमाड शहरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली होती याबाबत वेळोवेळी तक्रारी गेल्यानंतर पालिकेच्या वतीने आता कुठे या रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली मात्र या डागडुजीत मुरुमाच्या ऐवजी फक्त मातीचा वापर होत आहे.यामुळे पाऊस आल्यावर पुन्हा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन खड्डे पुन्हा तयार होतील याबाबत मात्र कुणीही काही बोलण्यास तयार नसल्याने शहरातील तरुण वर्गाने या कामाचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून पालिकेला ट्रोल करण्याचा सपाटा लावला आहे गोलमाल हैं भाई सब गोलमाल है या गाण्याला कामाच्या व्हिडीओशी एडिट करून सध्या फेसबुक व्हाट्सएप ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर व्हायरल करून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे तसेच आता तरी पालिकेने कामाचा दर्जा सुधारावा अशी मागणीही सोशल मीडियावर केली जात आहेConclusion:मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे रस्त्यावर पडलेली खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे मात्र पालिकेने खडी डांबर या वस्तू न वापरता फक्त माती टाकण्याचे काम सुरू आहे यामुळे पाऊस पडला तर मोठया प्रमाणात चिखल होऊन पुन्हा खड्डे वर येतील त्यामुळे किमान पालिकेने या खड्ड्यात खडी टाकून रोलर फिरवावे अशी मागणी जनता करत आहे
आमिन शेख मनमाड
बाईट
कादिर शेख नागरिक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.